अशोक पारधी ।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : विश्वस्तरावर महामारी म्हणून घोषीत केलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे प्रत्येक राज्य, जिल्हा, तालुका व ग्रामीण भागात संचारबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे. संचारबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नगरपरीषद प्रशासन व पोलीस यंत्रणा यांचे समन्वय ठेवून अविरत प्रयत्न सुरु आहेत. परिणामी कोरोनाला हरवण्यात प्रशासनाला एप्रिल अखेरपर्यंत यश आले आहे.ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या पवनी नगराचे संरक्षण करण्यासाठी इंग्रजी यू आकाराची मातीची भिंत (टेकडी) असल्याने नगरात प्रवेश करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात जवाहर गेट एकमेव मार्ग होते. लोकसंख्या वाढली, गरजा वाढल्या त्यामुळे भिंतीला खिंडार पाडून गावाचे सभोवताली रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे संचारबंदी असतांना नगरात वाट्टेल त्या मार्गाने प्रवेश करणे सोयीचे झाले होते. जिल्ह्याबाहेर असणारे नागरिक मोठ्या प्रमाणात नगरात शिरकाव करु लागले. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली. यावर मात करण्यासाठी नगरपरीषद व पोलीस यंत्रणा यांनी चंद्रपूर, गडचिरोली, पुणे व नागपूर येथून गावात येऊ पाहणाऱ्यांच्या चोरवाटा बंद करण्यासाठी कसोसीचे प्रयत्न केले. सुरुवातीला नगरवासीयांचा रोष पत्करावा लागला. परंतु आरोग्य सुरक्षित राहीले. त्यामुळे नागरिकांनी गावबंदी आनंदाने स्विकारली. जवाहर गेट ते वैनगंगा नदीपर्यंतचे सर्व रस्ते पाईप व बॅरीकेट लाऊन बंद केले. वाहनांची ये-जा बंद झाली. पोलिसांनी निष्टी गावाजवळ लावलेले चेकपोस्ट व जंगलातून चंद्रपूर, गडचिरोली, नागपूरकडून येण्यासाठी असलेल्या चोरवाटा जेसीबीच्या सहाय्याने आडवी नाली खोदून बंद केले. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहकार्य घेतले.ग्रामीण रुग्णालय व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या तपासणी पथकाने क्वारंटाइन करण्यात आलेल्या नागरिकांच्या गृहभेटी व तपासणी सुरु ठेवले. या सर्वांचा परिणाम असा झाला की नगरातील नागरिक सुरक्षित राहिले.पालिकेने शहर निर्जंतूक ठेवण्यासाठी गल्ली-बोळात फवारणी सुरु ठेवली. बाजार चौकातील गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी बाजाराचे विकेंद्रीकरण केले. शाळा व सार्वजनिक पटांगणावर नागरिकांचे सोयीसाठी भाजीपाला विक्रेत्यांना जागा निश्चित करुन दिली व फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करीत बाजार भरविण्यात आले. नियमितपणे सुरु असलेली मेडिकल स्टोअर्स व किराणा दुकान सर्व नियमाचे पालन करीत सुरु ठेवण्यासाठी व्यापारी वर्गाने सहकार्य केले. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले. त्यामुळे कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाला यश आले.पोलीस यंत्रणेकडे एक पोलीस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक व जेमतेम बत्तीस पोलीस कर्मचारी अशा तुटपुंज्या संख्येवर शहर व ग्रामीण भागाची सुरक्षा व परजिल्ह्यातून येणाºया नागरिकांचे आवागमन थांबविण्यासाठी कसोसीचे प्रयत्न केले व सुरु आहेत. या सर्वांचे प्रयत्न नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्वाचे ठरले आहे.पवनी नगराचे सातत्याने निर्जंतुकीकरण करुन नागरिकांनी घरातच राहावे, कामानिमित्त घराबाहेर पडल्यास मास्क, सॅनिटाइझरचा वापर करावा, फिजीकल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे. अशा सूचना वारंवार दिल्या. याला नागरिकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे पवनीकर नागरिक सुरक्षित आहेत.-रवींद्र ढाके, मुख्याधिकारी, नगरपरिषद, पवनी.नागरिकांची सुरक्षा व परजिल्ह्यातून येणाºया नागरिकांना योग्य त्या सुचना देण्यासाठी सहकारी पोलीस अधिकारी व कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. आडवाटा बंद केल्याने अनधिकृतपणे परजिल्ह्यातून येणाºया नागरिकांवर प्रतिबंध करण्यात आला आहे.-यशवंत सोलसे, पोलीस निरीक्षक, पवनी.
कोरोनाला हरवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:01 IST
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या पवनी नगराचे संरक्षण करण्यासाठी इंग्रजी यू आकाराची मातीची भिंत (टेकडी) असल्याने नगरात प्रवेश करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात जवाहर गेट एकमेव मार्ग होते. लोकसंख्या वाढली, गरजा वाढल्या त्यामुळे भिंतीला खिंडार पाडून गावाचे सभोवताली रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे संचारबंदी असतांना नगरात वाट्टेल त्या मार्गाने प्रवेश करणे सोयीचे झाले होते.
कोरोनाला हरवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु
ठळक मुद्देपवनी नगरपरिषद व पोलीस यंत्रणेचा पुढाकार : सुरक्षिततेसाठी नागरिकांचे सहकार्य गरजेचे