शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

लेखामेंढा, पाचगाव यांनी ग्रामस्वराज्याचे स्वप्न साकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 23:16 IST

भारतात आपापल्या सोयीकरिता तथाकथित गांधीभक्त गांधीजींच्या स्वप्नांच्या चुराडा करतांना दिसत असतांना लेखामेंढा आणि पाचगाव यांनी गांधीजींचे ग्राम-स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले. गांधी विचारांवर चालणे कठीण असले तरी अशक्य नाही.

ठळक मुद्देमधुकर निसळ : कोका येथील ‘गांधी जीवन व विचार’ शिबिराचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भारतात आपापल्या सोयीकरिता तथाकथित गांधीभक्त गांधीजींच्या स्वप्नांच्या चुराडा करतांना दिसत असतांना लेखामेंढा आणि पाचगाव यांनी गांधीजींचे ग्राम-स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले. गांधी विचारांवर चालणे कठीण असले तरी अशक्य नाही. शिबिरात 'विश्वास' म्हणजे गांधी 'निर्भयता' म्हणजे गांधी हे परवलीचे शब्दप्रयोग चर्चिल्या गेले. शिबिरार्थ्यांना गांधी मार्गावर चालण्याकरिता , तुमचे पहिले पाऊल मोलाचे ठरेल. गांधी होता येणार नाही, परंतु एक उत्तम नागरिक बनता येईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ सर्वोदयी विचारवंत मधुकर निसळ यांनी केले.कोका(जंगल) येथील 'गांधी जीवन व विचार 'शिबिराच्या समारोपप्रसंगी 'समग्र गांधी ' या विषयावर ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिबिरप्रमुख प्रा. वामन तुरिले होते. मधुकर निसळ म्हणाले, गांधी ७९ वर्षांर्च व्रतस्थ जीवन जगले. त्यांच्या अहिंसात्मक प्रतिकाराचा विजय केवळ भारताकरिता नाही, तर विश्वाकरिता असामान्य ठरला. आज जगातील बिकट समस्यांवर गांधी विचारच तोडगा वाटतो आहे. भ्रष्टाचारमुक्त भारत गांधींचे स्वप्न होते. युवकांनी निर्धार केला तर गांधीजींच्या स्वप्नांचा भारत बनू शकेल. प्रा. वामन तुरिले यांनी महात्मा गांधी यांच्या २ फेब्रुवारी १९२७ आणि १० नोव्हेंबर १९३३ च्या भंडारा दौऱ्याची व त्याप्रसंगी घडलेल्या विशेष घटनांची माहिती दिली. भंडारा जिल्ह्यातील स्वातंत्र्य चळवळीबद्दलही ते बोलले. आभार शिबिर सहप्रमुख महेश रणदिवे यांनी मानले.समारोप कार्यक्रमाचा प्रारंभ कवयित्री स्मिता गालफाडे यांनी स्वरबद्ध केलेल्या 'गांधीवाणी-गांधीवाणी ' या समूहगीतांनी झाला. सकाळच्या पहिल्या सत्रात डॉ. नितीन तुरस्कर यांनी 'कॅन्सर' आजाराविषयी माहिती दिली. प्रा. डॉ . दीपा भुरे -हटवार यांनी 'स्वेच्छा दारिद्र्य ' या विषयावर तर प्रा. डॉ . वंदना मोटघरे यांनी 'गांधीजींच्या कल्पनेतील भ्रष्टाचारमुक्त भारत' या विषयावर भाषण देत चर्चा घडवून आणली. अध्यक्षस्थानी शिबिर सहप्रमुख रामबिलास सारडा होते. ज्येष्ठ सर्वोदयी विचारवंत टी. आर. के. सोमैया यांच्या मार्गदर्शनाखाली २००४ मध्ये झालेल्या कोका येथील शिबिरातील विद्यार्थी-विद्यार्थिनी शिल्पा नाकतोडे, लखन चौरे, प्रिया क्षीरसागर, प्यारेलाल वाघमारे, विलास केझरकर यांनी जुन्या आठवणी आणि सोमैया यांचा त्यांच्यावरील प्रभाव यांचे वर्णन केले. यावेळी निळकंठ रणदिवे, डॉ. हेमंत चंदवासकर, शुभम साठवणे, आशिष भोंगाडे, निमिष माटे, सचिन कुंभरे प्रमाुख्याने उपस्थित होते. गीत गुंजनकर, चाहूल नागपुरे, अमन अतकरी, विनय मते, नीरज राजभोज यांच्या सहकार्याने शिबिरार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.शिबिरात रोगनिदानपतंजली हरिद्वार द्वारा प्रशिक्षित डॉ. दीप्ती बोहरे यांनी कोका व कोका परिसरातील अनेक रुग्णांना लाभ दिला. तसेच नॅशनल कॅन्सर इन्स्टिटयूट, नागपूर द्वारा शिबिरात आयोजित 'कर्करोगनिदान शिबिरात' उपस्थित रुग्णात कॅन्सरचा शोध डॉ. सुनीता सावनकर, डॉ. के. स्वामिनाथन, दीपक पेठे यांनी सहभाग घेतला. सर्व शिबिरार्थ्यांना 'गांधी गंगा' तसेच 'सात्विक जीवन पद्धती' आणि 'दीर्घायुष्य', ही पुस्तके भेट म्हणून देण्यात आली.