शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

राज्यमार्गावर घडताहेत अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 01:15 IST

रस्ता रूंदीकरणामुळे सर्वांनाच फायदा होणार असला तरी मात्र या सरू असलेल्या कामामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक, धारक तथा प्रवाशांनी मात्र जीव मुठीत घेऊन दररोज प्रवास करावा लागत आहे.

ठळक मुद्देरस्ता रूंदीकरणात धूळ आणि धोकाही कायम

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : रस्ता रूंदीकरणामुळे सर्वांनाच फायदा होणार असला तरी मात्र या सरू असलेल्या कामामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक, धारक तथा प्रवाशांनी मात्र जीव मुठीत घेऊन दररोज प्रवास करावा लागत आहे.दिवस उन्हाळ्याचे असले तरी धुळ होणार नाही आणि त्यामुळे अपघात होणार नाही. त्यासाठी कंत्राटदाराने काळजी घ्यावी, अशी मागणी सध्या जोर धरत आहे. ज्या ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत अशा मुरूम मातीच्या रस्त्यावर प्रमाणशीर नियमित पाण्याचा सिरकाव होणे गरजेचे आहे. आता अशा ठिकाणी कंत्राटदाराने तात्काळ वेळेच्या आधीच लक्ष घालण्याची मागणी यावेळी हजारो ग्रामस्थ व प्रवासी करताना दिसत आहे.या आधी काही दिवसाआधी याच रस्त्यावर अड्याळ येथील साहिता नगरजवळ एक अपघात घडला. त्यात दोघांचा नाहक बळी गेला. तसेच दोन दिवसाआधी नशिब बलवत्तर म्हणून चारही जीव वाचले. परंतु दुचाकीधारकांना आजही आणि पावसाळ्यात पुढेही सुद्धा असाच त्रास जर होत राहिला तर मग दुचाकीधारक चालकांनी करायेच तरी काय, असाही सवाल ग्रामस्थ विचारीत आहेत.रस्ता सुरू असलेल्या ठिकाणावरून प्रवास तथा दुचाकी चालकांनी जर डोक्यात हेल्मेट घातले असेल तर धुळीचा त्रास पाहिजे, त्या प्रमाणात होणार नाही आणि अपघात झाल्यास डोक्याची सुरक्षा होवून जीवही जावू शकणार नाही परंतु हेल्मेट सक्ती मोहीम शिथील झाली असली तरी आजही काही सुज्ञ दुचाकी वाहन चालक नेहमी हेल्मेटचा वापर करताना दिसतात.महामार्गाचे काम तब्बल दोन ते तीन वर्षे लागणार असल्याची प्राथमिक माहिती असली तरी कामात गती आणि अपघात वारंवार होणार नाही आणि त्यात नाहक एखाद्याचा जीव जाणार नाही याची काळजी घेणे हे अतिआवश्यक झाले आहे. कारण बºयाचदा अपघात झाल्यावर तथा अपघातात निष्पाप जीव गेल्यावर जनआक्रोशाचा सामना प्रशासनाला करावा लागत असला तरी त्याची झळ सामान्य माणसाच्या वाटेलाच येताना दिसते.

टॅग्स :highwayमहामार्ग