शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघातात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 00:43 IST

राज्यमार्गावरील दुर्गा मंदिर ते गभणे सभागृहापर्यंतच्या दुहेरी रस्त्याचे काम कासवगतीने सुरु करण्यात आले. मात्र वाहतूक सुरु असलेला एकेरी मार्ग वाहतूक योग्य न बनविल्याने पावसाळ्यात अपघाताच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने गांधारीची भूमिका घेतल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : एकेरी मार्गावर खड्डेच खड्डे, तुमसरमध्ये रस्त्यांची चाळणी

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : राज्यमार्गावरील दुर्गा मंदिर ते गभणे सभागृहापर्यंतच्या दुहेरी रस्त्याचे काम कासवगतीने सुरु करण्यात आले. मात्र वाहतूक सुरु असलेला एकेरी मार्ग वाहतूक योग्य न बनविल्याने पावसाळ्यात अपघाताच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने गांधारीची भूमिका घेतल्याचे दिसून येते.शासनाच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये समाविष्ट करून दुर्गा मंदिर ते गभणे सभागृहपर्यंत दुहेरी रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याची लगीनघाई संबंधित कंत्राटदाराला झाल्याने मार्गाचे काम सुरु करण्यापूर्वी व खोदकाम करण्यापूर्वी वाहतुकीसाठी मार्गाची उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसे अंदाजपत्रकामध्ये अट घालण्यात येते. असे असतानाही संबंधित कंत्राटदाराने दुहेरी मार्ग सुरु असलेल्या मार्गावर आधिच मोठमोठे खड्डे असताना एक मार्ग बंद करून रस्ता खोदकामास भर पावसाळ्यात सुरुवात केली. त्यामुळे एकेरी मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचले आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना तर सोडाच पादचाऱ्यांनाही त्या रस्त्यावरून चालणे कठीण झाल्यामुळे दिवसेंगणिक अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे.असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. दुर्गा मंदिर ते गभणे सभागृहापर्यंतचा रस्ता १ कि.मी. जवळपास आहे. परंतु तो रस्ता सर करण्यास दुचाकी व चारचाकी धारकाला १५ मिनिटांचा अवधी लागतो. यावरून त्या रस्त्याची कशी चाळण झाली आहे हे समजते. सार्वजनिक बांधकाम विभागाने जोपर्यंत रस्ता तयार होणार नाही तोपर्यंत वाहतुकीस रस्ताच तयार करणार नाही अशी भूमिका दबावापोटी घेतल्याचे सांगण्यात येत आहे.या अपघातात एखाद्याला आपले जीव गमवावे लागले तर यास लोकप्रतिनिधीला कंत्राटदाराला की सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरावे याचा खुलासा करण्यात यावा अशी संतप्त प्रतिक्रिया तुमसरवासीयांनी ‘लोकमत’ला दिली आहे.कोणतेही रस्ता बांधकाम करण्याअगोदर सबवे तयार केला जातो. मात्र सदर रस्त्यावरची डागडुजी ही करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यावरचा रस्ताच गहाळ झाला आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. मोठा अपघात झाल्यास नगराध्यक्ष व आमदारांनाच जबाबदार धरण्यात येईल.-इंजि.अभिषेक कारेमोरे, प्रदेश सरचिटणीस, राकाँ.

टॅग्स :Rainपाऊस