शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघातात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 00:43 IST

राज्यमार्गावरील दुर्गा मंदिर ते गभणे सभागृहापर्यंतच्या दुहेरी रस्त्याचे काम कासवगतीने सुरु करण्यात आले. मात्र वाहतूक सुरु असलेला एकेरी मार्ग वाहतूक योग्य न बनविल्याने पावसाळ्यात अपघाताच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने गांधारीची भूमिका घेतल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : एकेरी मार्गावर खड्डेच खड्डे, तुमसरमध्ये रस्त्यांची चाळणी

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : राज्यमार्गावरील दुर्गा मंदिर ते गभणे सभागृहापर्यंतच्या दुहेरी रस्त्याचे काम कासवगतीने सुरु करण्यात आले. मात्र वाहतूक सुरु असलेला एकेरी मार्ग वाहतूक योग्य न बनविल्याने पावसाळ्यात अपघाताच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने गांधारीची भूमिका घेतल्याचे दिसून येते.शासनाच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये समाविष्ट करून दुर्गा मंदिर ते गभणे सभागृहपर्यंत दुहेरी रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याची लगीनघाई संबंधित कंत्राटदाराला झाल्याने मार्गाचे काम सुरु करण्यापूर्वी व खोदकाम करण्यापूर्वी वाहतुकीसाठी मार्गाची उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसे अंदाजपत्रकामध्ये अट घालण्यात येते. असे असतानाही संबंधित कंत्राटदाराने दुहेरी मार्ग सुरु असलेल्या मार्गावर आधिच मोठमोठे खड्डे असताना एक मार्ग बंद करून रस्ता खोदकामास भर पावसाळ्यात सुरुवात केली. त्यामुळे एकेरी मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचले आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना तर सोडाच पादचाऱ्यांनाही त्या रस्त्यावरून चालणे कठीण झाल्यामुळे दिवसेंगणिक अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे.असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. दुर्गा मंदिर ते गभणे सभागृहापर्यंतचा रस्ता १ कि.मी. जवळपास आहे. परंतु तो रस्ता सर करण्यास दुचाकी व चारचाकी धारकाला १५ मिनिटांचा अवधी लागतो. यावरून त्या रस्त्याची कशी चाळण झाली आहे हे समजते. सार्वजनिक बांधकाम विभागाने जोपर्यंत रस्ता तयार होणार नाही तोपर्यंत वाहतुकीस रस्ताच तयार करणार नाही अशी भूमिका दबावापोटी घेतल्याचे सांगण्यात येत आहे.या अपघातात एखाद्याला आपले जीव गमवावे लागले तर यास लोकप्रतिनिधीला कंत्राटदाराला की सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरावे याचा खुलासा करण्यात यावा अशी संतप्त प्रतिक्रिया तुमसरवासीयांनी ‘लोकमत’ला दिली आहे.कोणतेही रस्ता बांधकाम करण्याअगोदर सबवे तयार केला जातो. मात्र सदर रस्त्यावरची डागडुजी ही करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यावरचा रस्ताच गहाळ झाला आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. मोठा अपघात झाल्यास नगराध्यक्ष व आमदारांनाच जबाबदार धरण्यात येईल.-इंजि.अभिषेक कारेमोरे, प्रदेश सरचिटणीस, राकाँ.

टॅग्स :Rainपाऊस