शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघातात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 00:43 IST

राज्यमार्गावरील दुर्गा मंदिर ते गभणे सभागृहापर्यंतच्या दुहेरी रस्त्याचे काम कासवगतीने सुरु करण्यात आले. मात्र वाहतूक सुरु असलेला एकेरी मार्ग वाहतूक योग्य न बनविल्याने पावसाळ्यात अपघाताच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने गांधारीची भूमिका घेतल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : एकेरी मार्गावर खड्डेच खड्डे, तुमसरमध्ये रस्त्यांची चाळणी

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : राज्यमार्गावरील दुर्गा मंदिर ते गभणे सभागृहापर्यंतच्या दुहेरी रस्त्याचे काम कासवगतीने सुरु करण्यात आले. मात्र वाहतूक सुरु असलेला एकेरी मार्ग वाहतूक योग्य न बनविल्याने पावसाळ्यात अपघाताच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने गांधारीची भूमिका घेतल्याचे दिसून येते.शासनाच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये समाविष्ट करून दुर्गा मंदिर ते गभणे सभागृहपर्यंत दुहेरी रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याची लगीनघाई संबंधित कंत्राटदाराला झाल्याने मार्गाचे काम सुरु करण्यापूर्वी व खोदकाम करण्यापूर्वी वाहतुकीसाठी मार्गाची उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसे अंदाजपत्रकामध्ये अट घालण्यात येते. असे असतानाही संबंधित कंत्राटदाराने दुहेरी मार्ग सुरु असलेल्या मार्गावर आधिच मोठमोठे खड्डे असताना एक मार्ग बंद करून रस्ता खोदकामास भर पावसाळ्यात सुरुवात केली. त्यामुळे एकेरी मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचले आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना तर सोडाच पादचाऱ्यांनाही त्या रस्त्यावरून चालणे कठीण झाल्यामुळे दिवसेंगणिक अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे.असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. दुर्गा मंदिर ते गभणे सभागृहापर्यंतचा रस्ता १ कि.मी. जवळपास आहे. परंतु तो रस्ता सर करण्यास दुचाकी व चारचाकी धारकाला १५ मिनिटांचा अवधी लागतो. यावरून त्या रस्त्याची कशी चाळण झाली आहे हे समजते. सार्वजनिक बांधकाम विभागाने जोपर्यंत रस्ता तयार होणार नाही तोपर्यंत वाहतुकीस रस्ताच तयार करणार नाही अशी भूमिका दबावापोटी घेतल्याचे सांगण्यात येत आहे.या अपघातात एखाद्याला आपले जीव गमवावे लागले तर यास लोकप्रतिनिधीला कंत्राटदाराला की सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरावे याचा खुलासा करण्यात यावा अशी संतप्त प्रतिक्रिया तुमसरवासीयांनी ‘लोकमत’ला दिली आहे.कोणतेही रस्ता बांधकाम करण्याअगोदर सबवे तयार केला जातो. मात्र सदर रस्त्यावरची डागडुजी ही करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यावरचा रस्ताच गहाळ झाला आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. मोठा अपघात झाल्यास नगराध्यक्ष व आमदारांनाच जबाबदार धरण्यात येईल.-इंजि.अभिषेक कारेमोरे, प्रदेश सरचिटणीस, राकाँ.

टॅग्स :Rainपाऊस