शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

अबब... भटईची एक रुपये किलो दराने विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 05:01 IST

लॉकडाऊनमुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. उन्हाळ्यात शेतकरी भटई वांग्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. मात्र लाखनीसह भंडारा बाजारात शेतकऱ्यांना भटई वांगे केवळ एक रुपया किलो दराने विक्री करण्याची वेळ आली. उन्हाळ्यात असणारे लग्न समारंभ, धार्मीक कार्यक्रम बंद झाल्याने वांग्याची मागणी घटली आहे. अतिशय चविष्ट व काळसर जांभळ्या रंगाच्या या वांग्याला मोठी मागणी असते.

ठळक मुद्देशेतकरी हतबल : कवडीमोल दराने होतेय भाजीपाला विक्री, उत्पादन खर्चही निघेना

चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढत चालल्याने राज्यात चौथा लॉकडाऊन सुरु झाला आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढत चालल्याने शेतकऱ्यांवर बिकट परिस्थिती ओढवली आहे. जिल्ह्याबाहेर होेणारी मालवाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला बाहेर निर्यात होणे बंद झाले आहे. याचा फटका भाजीपाला उत्पादन शेतकऱ्यांना बसत आहे.लॉकडाऊनमुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. उन्हाळ्यात शेतकरी भटई वांग्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. मात्र लाखनीसह भंडारा बाजारात शेतकऱ्यांना भटई वांगे केवळ एक रुपया किलो दराने विक्री करण्याची वेळ आली. उन्हाळ्यात असणारे लग्न समारंभ, धार्मीक कार्यक्रम बंद झाल्याने वांग्याची मागणी घटली आहे. अतिशय चविष्ट व काळसर जांभळ्या रंगाच्या या वांग्याला मोठी मागणी असते. या भटई वांग्याचे एक वैशिष्ट म्हणजे अतिशय आकर्षक असल्याने ग्राहकांची मागणी असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात भटई वांग्याची लागवड तालुक्यातच नाही तर जिल्ह्यातील अनेक शेतकरी करतात. लॉकडाऊनमुळे भाजीपाला उत्पादकांमध्ये मोठे संकट उभे राहिले आहे.मागणीअभावी शेतकऱ्यांना भाव मिळेनासा झाला. ठोक व्यापारी शेतकऱ्यांकडून एक ते चार रुपये इतक्या अल्पदराने वांग्याची मागणी करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अल्प दराने भाजीपाला विकावा लागत आहे.भटई वांगे तोडणीसाठी १२० रुपये मजुरांना मजुरी द्यावी लागते.शेतकऱ्याला तोडणी करणे, औषध फवारणी, निंदणी, लागवड खर्च, मशागतीचा खर्च, बिजायतीचा खर्च पकडला असता लाखो रुपयाचे नुकसान होत आहे. शासनाने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे.तालुक्यातील लाखनी, लाखोरी, सावरी, सोमलवाडा अशा अनेक गावांमध्ये भटई वांग्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. भेंडी, चवळी, शेंगा, पालक उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला बाजारात भाव मिळत नसल्याने शेतकरी कवडीमोल दराने भाजीपाला विक्री करीत असल्याने चिंतेत आहे.दर नसल्याने शेतकऱ्याला नैराश्य येत असून शेतकरी आपल्या गुरांना भाजीपाला टाकत असल्याचे चित्र तालुक्यातील अनेक शेतशिवारात दिसून येत आहे.शासनाने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी. कोरोना संकटामुळे शेतकºयांना मोठे संकट कोसळले असून शासनाच्या मदतीशिवाय शेतकरी उभा राहू शकणार नाही.-पुनेश्वर सिंगनजुडे,उपसरपंच लाखोरी.

टॅग्स :vegetableभाज्या