शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जिल्ह्यात निधीचा ठणठणाट; मोदी आवासची ९,८२१ बांधकामे अडचणीत

By युवराज गोमास | Updated: July 6, 2024 14:28 IST

लाभार्थ्यांत संताप : शासनाने तातडीने निधीची उपलब्धता करण्याची मागणी

युवराज गोमासे

भंडारा : जिल्ह्यात मोदी आवास योजनेंतर्गत ११,१०५ घरकुलांना लक्ष्यांक देण्यात आला. त्यापैकी शासन-प्रशासनाच्या वतीने यंदा ११,०३३ घरकुलांना मजुरी देण्यात आली. ३ जुलैपर्यंत या योजनेतील १२१२ घरकुल पूर्ण झाले आहेत, तर ९८२१ घरकुलांचे बांधकाम अद्यापही विविध टप्प्यावर आहेत; परंतु दोन महिन्यांपासून जिल्ह्यात मोदी आवास योजनेत निधीचा ठणठणाट आहे. परिणामी, हप्ते प्राप्त होण्यास विलंब होत असून बांधकामे अडचणीत सापडली आहेत.

राज्यातील ओबीसी प्रवर्गातील बेघर, कच्ची घरे व गरजवंत असलेल्यांना हक्काचा घरकुल मिळावे, या हेतूने राज्य शासनाने सन २०२४ मध्ये मोदी आवास योजनेची सुरुवात केली. ओबीसी प्रवर्गातील बेघर, कच्ची घरे असलेल्यांना हक्काचा घरकुल मिळावे, या हेतूने राज्य शासनाने सन २०२४ मध्ये मोदी आवास योजनेची सुरुवात केली. या योजनेत ओबीसीतील वंचित घटकांचा तसेच प्रलंबित 'ड' यादीतील घरकुल लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना अन्य योजनांप्रमाणे दीड लाखाचा निधी दिला जातो. सुमारे चार टप्प्यांत हा निधी प्रशासनाकडून वितरित केला जातो.

१,२१२ घरकुलांची बांधकामे पूर्ण

जिल्ह्यात मोदी आवास योजनेंतर्गत ११,०३३ घरकुलांना मंजुरी प्रदान करण्यात आली. त्यापैकी आतापर्यंत १,२१२ घरकुलांचे बांधकाम लाभार्थ्यांनी पूर्ण केले आहे. उर्वरित बांधकामे विविध टप्प्यांत असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. पूर्ण झालेली तालुकानिहाय बांधकामे याप्रमाणे. भंडारा १७३, लाखांदूर १६, लाखनी १७६, मोहाडी २००, पवनी १७७, साकोली १३२, तुमसर ३३८, एकूण १,२१२. 

सद्य:स्थितीत टप्पानिहाय बांधकामेतालुका           पहिला           दुसरा            तिसरा           चौथा

भंडारा               १४२८          ७१२              ३५९             १४लाखांदूर            ११७५          ७१०             ३२६              ००

लाखनी              १४४९         ७६४             ४०१              २७मोहाडी              २००९          ९५०            ४७०              २०

पवनी                 १४३७          ७५१            ४१७              १९साकोली             १०५३          ६१०             ३६८              ००

तुमसर               २३७७          १२६७         ७४१              ७९एकूण                १०९२८         ५७६४        ३०८२            १५९

घरकुल लाभार्थी म्हणतात...

मोदी आवास योजनेमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले घरकुलाचे बांधकाम पूर्ण होणार आहे. आतापर्यंत पहिला टप्पा मिळाला. दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम निधीअभावी थांबले आहे.- निर्मला कमाने, घरकुल लाभार्थी.

मोदी आवास योजनेमुळे माझे घरकुल पूर्ण झाले; परंतु शेवटचा टप्पा मिळालेला नाही. त्यामुळे शासनाने निधी पुरवठ्याकडे लक्ष द्यावे. महागाई लक्षात घेता घरकुलाचा निधी वाढवून द्यावा.- विष्णू हलमारे, घरकुल लाभार्थी.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाbhandara-acभंडारा