शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात १५ दिवसात ९९ व्यक्ती पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 14:36 IST

भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २७ एप्रिल रोजी आढळून आला. त्यानंतरही रुग्णवाढीचे प्रमाण अल्प होते. मात्र जुलै महिन्याला प्रारंभ झाला आणि कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेली.

ठळक मुद्देजुलैत वाढली संख्या दोघांचा मृत्यू, आतापर्यंत १७९ पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लॉकडाऊनच्या सुरुवातीला कोरोनामुक्त असलेल्या भंडारा जिल्ह्यासाठी जुलै महिना चिंतेत वाढ करणारा ठरला. पहिल्या १५ दिवसात तब्बल ९९ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. आतापर्यंत जिल्ह्यात १७९ व्यक्तींना कोरोना झाल्याचे पुढे आले असून ८७ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. विशेष म्हणजे ९ जुलै रोजी सर्वाधिक ४९ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या तर दोन दिवसात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली.

भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २७ एप्रिल रोजी आढळून आला. गराडा येथील महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली. त्यानंतरही रुग्णवाढीचे प्रमाण अल्प होते. उलट रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक होते. मात्र जुलै महिन्याला प्रारंभ झाला आणि कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेली. जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तब्बल ९९ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. त्यात १ जुलै रोजी ७, ४ जुलै रोजी ६, ६ जुलै रोजी ४, ७ जुलै रोजी १, ८ जुलै रोजी ८, ९ जुलै रोजी ४९, १० जुलै रोजी ६, ११ जुलै रोजी ३, १२ जुलै रोजी ६, १३ जुलै रोजी ४ आणि १४ जुलै रोजी ५ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. विशेष म्हणजे यातील बहुतांश रुग्ण हे महानगर व परप्रांतातून आलेले आहेत. विशेष म्हणजे रविवार आणि सोमवार या दोन दिवसात सलग दोन तरुणांचा मृत्यू झाला. एक भंडारा शहरातील तर एक शहरानजीकच्या गणेशपूर परिसरातील आहे.

जिल्ह्यात सुरुवातीला रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक होते. आतापर्यंत जिल्ह्यातील ८७ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. सुरुवातीला बरे होण्याचे प्रमाण ८६ टक्के होते. मात्र जुलै महिन्यात यात घट होऊन सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४८.६० टक्के आहे. जिल्ह्यात पुणे, मुंबई व इतर राज्यातून ४५ हजार १०९ व्यक्ती दाखल झाले आहेत. महानगरातून येणाऱ्या प्रत्येकाला संस्थात्मक क्वारंटाईन किंवा होम क्वारंटाईन केले जात आहे. आतापर्यंत ४३ हजार ४१ व्यक्तींचा होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाला आहे तर २०६८ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने आणखी भर पडली. विशेष म्हणजे जिल्ह्यात सीमावर्ती भागात नऊ चेक पोस्ट तयार करण्यात आले आहे. मात्र अलीकडच्या काही दिवसात याठिकाणी शिथीलता आल्याचे दिसत आहे.नागपूरातून येणारे कर्मचारी, अधिकारी बिनधास्तपणे भंडारा शहरासह जिल्ह्यात येत आहेत. यासोबत व्यवसाय आणि व्यापाराच्या निमित्ताने अनेकजण जिल्ह्यातील ग्रामीण भागात येत आहेत. त्यांची कोणतीही तपासणी होत नसल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.

आयसोलेशन वॉर्डात ९० कोरोनाबाधीतांवर उपचारभंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात सध्या ९९ व्यक्ती भरती असून त्यापैकी ९० कोरोना बाधीत आहेत. आतापर्यंत येथून ८७ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यातून ५ हजार ६२४ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ५ हजार २३१ नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर २१४ अहवालांची जिल्हा प्रशासनाला प्रतीक्षा आहे. तीव्र श्वासदाहचे १७२ व्यक्ती उपचारासाठी दाखल असून १७१ व्यक्तींचे नमुने तपासणीस पाठविण्यात आले होते. त्यापैकी १६७ नमुने निगेटिव्ह आले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस