शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

निराधार योजनेतील ८९ हजार महिला मुकणार लाडकी बहीण योजनेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 13:09 IST

Bhandara : जिल्ह्यात फक्त पंधरा हजार महिलांना मिळणार लाभ

इंद्रपाल कटकवारलोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : राज्य शासनाच्या आर्थिक बजेटमध्ये 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ची घोषणा करण्यात आली. यात शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या १५०० पेक्षा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे म्हटले आहे. परिणामी भंडारा जिल्ह्यातील सरासरी ८९ हजार निराधार योजनेतील महिलाही या योजनेला आता मुकणार आहेत. संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना व श्रावण बाळ योजनेअंतर्गत या निराधार महिलांचा समावेश असतो.

निराधार योजनेतील महिला लाभार्थी संख्यासंजय गांधी योजना - ३८,३२५इंदिरा गांधी योजना - २५,७९६श्रावणबाळ योजना - ४१,१८८ 

राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर त्यात आता सुधारणा करण्यात आली आहे. योजनेची घोषणा झाल्यानंतर जिल्ह्यातील महिलावर्ग मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ घेण्यासाठी सेतू केंद्रात गर्दी करीत आहेत. राज्य शासनाने उत्पन्नाची अट शिथिल केल्यानंतर बुधवारी सेतू केंद्रात हवी तेवढी गर्दी दिसून आली नाही. मात्र, निराधार योजनेतील लाभार्थ्यांना वगळणार असल्याची चर्चा येथे ऐकावयास मिळाली. भंडारा जिल्ह्यातील हजारो महिला विविध निराधार योजनेचा लाभ घेत आहेत. राज्य शासनाच्या धोरणानुसार या योजनेतून निराधार महिला लाभार्थीही पात्र ठरणार नाहीत.

जिल्ह्यात संजय गांधी योजना अंतर्गत जवळपास ३८ हजार ३२५, इंदिरा गांधी योजना निराधार अंतर्गत सरासरी २५ हजार ७९६, तर श्रावण बाळ योजनेअंतर्गत जवळपास ४१ हजार १८८ निराधार महिला आहेत.

यापैकी यातील सरासरी १५ टक्के महिला या वयाची पासष्टी (६५) पार केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचाही येथे समावेश राहणार नाही. मात्र, २१ ते ६५ वयोगटांतर्गत जवळपास ८९ हजार ५१४ निराधार महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मुकणार आहेत. यामध्ये सर्वसाधारण लाभार्थ्यांसह अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीतील महिला निराधार लाभार्थ्यांचा समावेश राहणार आहे.

यावरही निर्णय घ्यावामंगळवारी लाडकी बहीण योजनेच्या काही अटी राज्य सरकारने शिथिल केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संबंधीची घोषणा केली.योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट, आदींबाबत घोषणा करण्यात आली. मात्र, निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांबाबत कुठलीही घोषणा करण्यात आली नाही. जिल्हा तसेच राज्यातही मोठ्या प्रमाणात विविध निराधार योजनेचे लाभ घेणाऱ्या लाखो महिला आहेत. किंबहुना निराधार योजनेच्या लाभात राज्य शासनाने वाढीची घोषणा करायला हवी होती किंवा योजनेत समावून घ्यायला हवे, असे या निराधार महिलांचे म्हणणे आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाMaharashtraमहाराष्ट्रbhandara-acभंडारा