शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

११६ कोटींमधून होणार ८६ गावांचा कायापालट

By admin | Updated: March 4, 2015 00:55 IST

आगामी पाच वर्षात महाराष्ट्र राज्य टंचाईमुक्त करुन सर्वांसाठी पाणी उपलब्ध करण्याबरोबर

जलयुक्त शिवार अभियान : जिल्हाधिकाऱ्यांची माहितीभंडारा : आगामी पाच वर्षात महाराष्ट्र राज्य टंचाईमुक्त करुन सर्वांसाठी पाणी उपलब्ध करण्याबरोबर सिंचन क्षेत्रात वाढ व इतर उद्देश हाती घेण्यात आले आहे. यासाठी जलयुक्त शिवार अभियानातून जिल्हयातील ८६ गावांमधील दुष्काळे परिस्थिती निवारणासाठी ११६ कोटींचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.जलयुक्त शिवार अभियानातून टंचाईग्रस्त गावांना मुक्त करण्यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे. या अभियानातून पावसाचे पाणी गावशिवारात अडविणे, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे, बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजनेचे पुनर्जीवन करुन विकेंद्रीत पाणी साठे निर्माण करणे, पाणी साठवण क्षमतेची नविन कामे हाती घेणे, वृक्ष लागवडील प्रोत्साहन अशा उद्देशाने हे अभियान राबविले जाणार आहे. त्या अंतर्गत ग्रामपंचायत, वनविभाग, कृषी, पाटबंधारे, जलसंपदा व सामाजिक वणिकरण विभागामार्फत ही कामे केली जाणार आहे.भंडारा तालुक्यातील १५, तुमसर तालुक्यातील १९, मोहाडी १५, पवनी १२, साकोली १०, लाखनी ९ व लाखांदूर तालुक्यातील ६ अश्या ८६ गावांची निवड करण्यात आली आहे. पुढील आर्थिक वर्षात संबंधित विभागाकडून ही कामे करण्यासाठी ११६ कोटी २१ लाख ४४ हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. त्याअंतर्गत पवनी तालुक्यात ६४९ कामे केली जाणार असून २२ कोटी ४९ लाख २८ हजार रुपयांचा निधी दिला जाणार आहे. भंडारा तालुक्यातील २६५ कामांसाठी १८ कोटी ९९ लाख ६४ हजार तर तुमसर २८४ कामांसाठी १७ कोटी ५६ लाख ७१ हजार, मोहाडी २६२ कामासांठी १५ कोटी ५ लाख ८४ हजार, साकोली ४८९ कामांसाठी १६ कोटी २ लाख ३५ हजार, लाखनी ३१७ कामांसाठी १८ कोटी ७७ लाख ८५ हजारांचा निधी उपलब्ध होणार आहे. लाखांदूर ३३८ कामांसाठी ७ कोटी २० लाख ७७ हजारांची तरतुद करण्यात आली आहे. ११६ कोटी २१ लाख ४४ हजार निधीतून जिल्हयातील ८६ गावात २६०४ कामे हाती घेतली जाईल. अभियानांतर्गत कृषी विभागाला ११२७ कामासांठी २८ कोटी ३९ लाख ३२ हजारांचा तर ग्राम पंचायतस्तरावर ८३३ कामांसाठी ४१ कोटी ३३ लाख ६९ हजारांचा निधी दिला जाईल. ७ कोटी ३३ लाख २१ हजारांच्या निधीतून वन विभागाला ३७८ कामे तर ३२ कोटी ९३ लाख ८४ हजारातून लघू पाटबंधारे विभागाला २२८ कामे करावयाची आहेत. जलसंपदा विभागाला १ कोटी ४८ लाख ५० हजारातून १० कामे व सामाजिक वनिकरण विभागाला १ कोटी ४० लाख २६ हजारातून २० कामे करावयाची आहेत. (शहर प्रतिनिधी)