शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
4
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
5
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
6
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
7
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
8
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
9
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
10
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
11
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
12
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
13
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
14
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
15
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
16
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी
17
WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल!
18
“त्रिभाषा प्रकरणी हरकती नोंदवण्याची मुदत वाढवावी, आडमार्गाने...”; मनसेचे समितीला पत्र
19
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
20
Saif Ali Khan : "तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर

११६ कोटींमधून होणार ८६ गावांचा कायापालट

By admin | Updated: March 4, 2015 00:55 IST

आगामी पाच वर्षात महाराष्ट्र राज्य टंचाईमुक्त करुन सर्वांसाठी पाणी उपलब्ध करण्याबरोबर

जलयुक्त शिवार अभियान : जिल्हाधिकाऱ्यांची माहितीभंडारा : आगामी पाच वर्षात महाराष्ट्र राज्य टंचाईमुक्त करुन सर्वांसाठी पाणी उपलब्ध करण्याबरोबर सिंचन क्षेत्रात वाढ व इतर उद्देश हाती घेण्यात आले आहे. यासाठी जलयुक्त शिवार अभियानातून जिल्हयातील ८६ गावांमधील दुष्काळे परिस्थिती निवारणासाठी ११६ कोटींचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.जलयुक्त शिवार अभियानातून टंचाईग्रस्त गावांना मुक्त करण्यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे. या अभियानातून पावसाचे पाणी गावशिवारात अडविणे, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे, बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजनेचे पुनर्जीवन करुन विकेंद्रीत पाणी साठे निर्माण करणे, पाणी साठवण क्षमतेची नविन कामे हाती घेणे, वृक्ष लागवडील प्रोत्साहन अशा उद्देशाने हे अभियान राबविले जाणार आहे. त्या अंतर्गत ग्रामपंचायत, वनविभाग, कृषी, पाटबंधारे, जलसंपदा व सामाजिक वणिकरण विभागामार्फत ही कामे केली जाणार आहे.भंडारा तालुक्यातील १५, तुमसर तालुक्यातील १९, मोहाडी १५, पवनी १२, साकोली १०, लाखनी ९ व लाखांदूर तालुक्यातील ६ अश्या ८६ गावांची निवड करण्यात आली आहे. पुढील आर्थिक वर्षात संबंधित विभागाकडून ही कामे करण्यासाठी ११६ कोटी २१ लाख ४४ हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. त्याअंतर्गत पवनी तालुक्यात ६४९ कामे केली जाणार असून २२ कोटी ४९ लाख २८ हजार रुपयांचा निधी दिला जाणार आहे. भंडारा तालुक्यातील २६५ कामांसाठी १८ कोटी ९९ लाख ६४ हजार तर तुमसर २८४ कामांसाठी १७ कोटी ५६ लाख ७१ हजार, मोहाडी २६२ कामासांठी १५ कोटी ५ लाख ८४ हजार, साकोली ४८९ कामांसाठी १६ कोटी २ लाख ३५ हजार, लाखनी ३१७ कामांसाठी १८ कोटी ७७ लाख ८५ हजारांचा निधी उपलब्ध होणार आहे. लाखांदूर ३३८ कामांसाठी ७ कोटी २० लाख ७७ हजारांची तरतुद करण्यात आली आहे. ११६ कोटी २१ लाख ४४ हजार निधीतून जिल्हयातील ८६ गावात २६०४ कामे हाती घेतली जाईल. अभियानांतर्गत कृषी विभागाला ११२७ कामासांठी २८ कोटी ३९ लाख ३२ हजारांचा तर ग्राम पंचायतस्तरावर ८३३ कामांसाठी ४१ कोटी ३३ लाख ६९ हजारांचा निधी दिला जाईल. ७ कोटी ३३ लाख २१ हजारांच्या निधीतून वन विभागाला ३७८ कामे तर ३२ कोटी ९३ लाख ८४ हजारातून लघू पाटबंधारे विभागाला २२८ कामे करावयाची आहेत. जलसंपदा विभागाला १ कोटी ४८ लाख ५० हजारातून १० कामे व सामाजिक वनिकरण विभागाला १ कोटी ४० लाख २६ हजारातून २० कामे करावयाची आहेत. (शहर प्रतिनिधी)