शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

खरीप हंगामासाठी ७० हजार २१० मेट्रिक टन खत साठा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:37 IST

भंडारा : आगामी खरीप हंगामाच्या नियोजनासाठी कृषी विभागाने कंबर कसली असून, खरिपासाठी जिल्ह्याला ७० हजार २१० मेट्रिक टन खतसाठा ...

भंडारा : आगामी खरीप हंगामाच्या नियोजनासाठी कृषी विभागाने कंबर कसली असून, खरिपासाठी जिल्ह्याला ७० हजार २१० मेट्रिक टन खतसाठा मंजूर झाला आहे. जिल्ह्यात एक लाख ८२ हजार ८३ हेक्टर क्षेत्र सर्वसाधारण असून, एक लाख ९५ हजार ४४९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र हे धान पिकाचे राहणार असून, २ लाख १३ हजार ८३७ हेक्टरवर धान, तर तूर पीक ११ हजार ८५४ हेक्टर, सोयाबीन ६०० हेक्‍टरवर पेरणी होणार आहे. गतवर्षी खरीप हंगामात महापूर, तुडतुडा रोगाने, अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांना चांगलाच फटका बसला होता. हे नुकसान भरून काढण्यासाठी कृषी विभागाकडून यावर्षी खरीप हंगामासाठी नव्या जोमाने नियोजन केले जात आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कुठेही खताची टंचाई भासू नये, यासाठी २०२१च्या खरीप हंगामासाठी जिल्हा कृषी विभागाने कृषी आयुक्तालयाकडे १ लाख १७ हजार ७०९ मेट्रिक टन खताची मागणी केली होती. त्यात गतवर्षीचा २३ हजार ८१३ मेट्रिक टन खत साठा शिल्लक आहे. तर यावर्षी नव्याने मंजूर झालेला ७० हजार २१० मेट्रिक टन म्हणजेच एकूण ९४ हजार २३ मेट्रिक टन खत साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जिल्ह्यात कुठेही खतांची टंचाई भासणार नसल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांनी सांगितले. यासोबतच कृषी केंद्र धारकांनी खताची विक्री पॉस मशीनवर ऑनलाइन पद्धतीनेच करण्याच्या सूचनाही कृषी विभागाने दिल्या आहेत. यावर्षी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात युरिया, डीएपी, एसओपी, एनपीके खते मुबलक उपलब्ध झाली आहेत.

जिल्ह्यात खरिपाच्या मशागत कामांना वेग आला असून, कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन आढावा सभा तसेच खरिपातील विविध पिकांच्या नियोजनाची कामे सुरू केली आहेत. त्यामुळे एकही शेतकरी बियाणे अथवा खतापासून वंचित राहणार नाही, यासाठी आढावा घेण्याच्या सूचना जिल्हा कृषी अधीक्षक यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीदरम्यान दिल्या आहेत.

बॉक्स

कृषी केंद्रांना ऑनलाइन खते विक्री अनिवार्य

जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्र यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन खतांच्या प्रिंटेड एमआरपीनुसारच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खताची विक्री करावी. याकरिता पॉस मशीनच्या माध्यमातूनच विक्रेत्यांनी खताची विक्री करण्याच्या सूचना कृषी विभागाने कृषी केंद्रांना दिल्या आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पॉस मशीन उपलब्ध करण्यात आले असून, ऑफलाइन पद्धतीने खताची विक्री केल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे खते बियाणे देतानाच शेतकऱ्यांना याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल, असे कृषी केंद्रांना सांगण्यात आले आहे.

बॉक्स

शेतकरी सन्मान कक्षातून होणार तक्रारींचे निवारण

शेतकऱ्यांच्या विविध अडीअडचणी तसेच तक्रारींच्या निवारणासाठी तालुकास्तरावर शेतकरी सन्मान कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. यासोबतच खते, बियाण्यांबाबतची कोणतीही तक्रार तालुकास्तरीय कृषी विभागाच्या कार्यालयात, पंचायत समिती कृषी विभाग अथवा जिल्हा स्तरावरील कृषी विभागाकडे शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त होताच त्यानुसार वरिष्ठांकडून चौकशी करीत शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण केले जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

कोट

येत्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला ७० हजार २१९ मेट्रिक टन मंजूर झाला आहे. याशिवाय २०२० - २१चा खतसाठा शिल्लक असल्याने जिल्ह्यात कुठेही खताची टंचाई भासणार नाही. यासोबतच खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कृषी कर्मचाऱ्यांना मार्फत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

हिंदुराव चव्हाण,

जिल्हा कृषी अधीक्षक, भंडारा