शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

७० गावांना मिळणार २६ कोटींची नुकसानभरपाई

By admin | Updated: July 5, 2017 00:57 IST

शेतकऱ्यांचा दृष्टचक्र कमी होत नाही. दुष्काळाचे संकट येवून पडते. शेतकरी मोडला जातो. दुष्काळ जाहीर होवूनही मदत वेळेवर मिळत नाही.

२०१५ च्या खरीप हंगामातील नुकसान : विभागीय आयुक्तांनी मागितला अहवाललोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : शेतकऱ्यांचा दृष्टचक्र कमी होत नाही. दुष्काळाचे संकट येवून पडते. शेतकरी मोडला जातो. दुष्काळ जाहीर होवूनही मदत वेळेवर मिळत नाही. दोन वर्षानंतर प्रशासन आता जागे झाले असून खरीप २०१५ ची नुकसान भरपाई मिळण्याचे संकेत मिळाले आहे. किती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी लागेल याची माहिती नागपूर विभागीय आयुक्तांनी मागितली आहे. तहसील कार्यालयाकडून माहिती गेली असून दोन वर्षानंतर नुकसानभरपाई मिळण्याची आशा बळावली आहे. २०१५ च्या खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ५० पैसे व त्यापेक्षा कमी आली होती. ती गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली. यात भंडारा तालुक्यातील चार गावे, तुमसर १२ गावे, मोहाडी ७० गावे, साकोली ९४ गावे, तुमसर १२ गावे, मोहाडी ७० गावे, साकोली ९४ गावे, लाखांदूर ८९ गावे, लाखनी १०२ अशी ३७१ गावे दुष्काळग्रस्त जाहीर केली होती. मोहाडी तालुक्यातील सिंचनाखाली पिकांच्या क्षेत्राखाली येणारे २२,६७९ शेतकरी तसेच कोरडवाहू पिकाखाली क्षेत्राखाली येणारे ११९२ शेतकरी अशा २३ हजार ८५१ शेतकऱ्यांना २५ कोटी ९६ लक्ष ६७ हजार रुपये दिले जाणार आहे. तहसीलदार यांनी नुकसान भरपाईकरिता तेवढ्या आवश्यक निधीची मागणी रक्कम जिल्हाधिकारी भंडारा यांना कळविली आहे. खरीप हंगाम २०१५ मध्ये ५० पैसेपेक्षा कमी असलेल्या गावामध्ये हिवरा, नवेगाव, रिठी, बच्छेरा, पांजराग्राम, कांद्री, बोथली रिठी, देऊळगाव, बिटेखारी, जांब, धुसाळा, बोंदरी, घोरपड, नवेगाव, खैरलांजी, काटी, धोप, ताडगाव, सिहरी, सकरला, मलदा, आंधळगाव, चिचोली, अकोला, सालई खुर्द, नेरला, रिठी, पालडोंगरी, उसर्रा, डाकला, काटेबाम्हणी, सालई बु., विहिरगाव, यंदा, भिकारखेडा, धर्मापूरी, डोंगरगाव, महालगाव, घाटकुरोडा, पांजरा, बोथली, माहेगाव, रोहणा, दहेगाव, देव्हाडा, नरसिंगटोला, देव्हाडा खु., निलज बु., जांभळापाणी, मोहगाव, उसरीपार, दवडीपार, ठाणेगाव, निलज खुर्द, मुंढरी, खु., मुंढरी, बु., कान्हळगाव, ढिवरवाडा, करडी, एकलाझरी, जांभोरा, किसनपूर, बोरी, पांजरा, पांजरा, खडकी, डोंगरदेव, बोंडे, पालोरा, केसलवाडा, लेंडेझरी, बोरगाव या गावांचा समावेश आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार असताना दुष्काळग्रस्त गावांची यादी जाहीर करण्यात आली होती.२०१५ चा खरीप हंगाम संपून दोन वर्ष संपली आहेत. २०१७ च्या खरीप हंगामाची लगबग सुरु झाली. सुलभ पीक कर्ज घेण्यासाठी शासनाने शिबिर लावली. पण, शेतकऱ्यांनी एप्रिल, मे मध्ये शेती पीक कर्जाची उचल केल्यानंतर, शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्यासाठी हालअपेष्टा सहन केल्यानंतर सुलभ पीककर्ज वाटप करण्याचे नाटके सुरु केल्या आहेत.