शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

७० गावांना मिळणार २६ कोटींची नुकसानभरपाई

By admin | Updated: July 5, 2017 00:57 IST

शेतकऱ्यांचा दृष्टचक्र कमी होत नाही. दुष्काळाचे संकट येवून पडते. शेतकरी मोडला जातो. दुष्काळ जाहीर होवूनही मदत वेळेवर मिळत नाही.

२०१५ च्या खरीप हंगामातील नुकसान : विभागीय आयुक्तांनी मागितला अहवाललोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : शेतकऱ्यांचा दृष्टचक्र कमी होत नाही. दुष्काळाचे संकट येवून पडते. शेतकरी मोडला जातो. दुष्काळ जाहीर होवूनही मदत वेळेवर मिळत नाही. दोन वर्षानंतर प्रशासन आता जागे झाले असून खरीप २०१५ ची नुकसान भरपाई मिळण्याचे संकेत मिळाले आहे. किती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी लागेल याची माहिती नागपूर विभागीय आयुक्तांनी मागितली आहे. तहसील कार्यालयाकडून माहिती गेली असून दोन वर्षानंतर नुकसानभरपाई मिळण्याची आशा बळावली आहे. २०१५ च्या खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ५० पैसे व त्यापेक्षा कमी आली होती. ती गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली. यात भंडारा तालुक्यातील चार गावे, तुमसर १२ गावे, मोहाडी ७० गावे, साकोली ९४ गावे, तुमसर १२ गावे, मोहाडी ७० गावे, साकोली ९४ गावे, लाखांदूर ८९ गावे, लाखनी १०२ अशी ३७१ गावे दुष्काळग्रस्त जाहीर केली होती. मोहाडी तालुक्यातील सिंचनाखाली पिकांच्या क्षेत्राखाली येणारे २२,६७९ शेतकरी तसेच कोरडवाहू पिकाखाली क्षेत्राखाली येणारे ११९२ शेतकरी अशा २३ हजार ८५१ शेतकऱ्यांना २५ कोटी ९६ लक्ष ६७ हजार रुपये दिले जाणार आहे. तहसीलदार यांनी नुकसान भरपाईकरिता तेवढ्या आवश्यक निधीची मागणी रक्कम जिल्हाधिकारी भंडारा यांना कळविली आहे. खरीप हंगाम २०१५ मध्ये ५० पैसेपेक्षा कमी असलेल्या गावामध्ये हिवरा, नवेगाव, रिठी, बच्छेरा, पांजराग्राम, कांद्री, बोथली रिठी, देऊळगाव, बिटेखारी, जांब, धुसाळा, बोंदरी, घोरपड, नवेगाव, खैरलांजी, काटी, धोप, ताडगाव, सिहरी, सकरला, मलदा, आंधळगाव, चिचोली, अकोला, सालई खुर्द, नेरला, रिठी, पालडोंगरी, उसर्रा, डाकला, काटेबाम्हणी, सालई बु., विहिरगाव, यंदा, भिकारखेडा, धर्मापूरी, डोंगरगाव, महालगाव, घाटकुरोडा, पांजरा, बोथली, माहेगाव, रोहणा, दहेगाव, देव्हाडा, नरसिंगटोला, देव्हाडा खु., निलज बु., जांभळापाणी, मोहगाव, उसरीपार, दवडीपार, ठाणेगाव, निलज खुर्द, मुंढरी, खु., मुंढरी, बु., कान्हळगाव, ढिवरवाडा, करडी, एकलाझरी, जांभोरा, किसनपूर, बोरी, पांजरा, पांजरा, खडकी, डोंगरदेव, बोंडे, पालोरा, केसलवाडा, लेंडेझरी, बोरगाव या गावांचा समावेश आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार असताना दुष्काळग्रस्त गावांची यादी जाहीर करण्यात आली होती.२०१५ चा खरीप हंगाम संपून दोन वर्ष संपली आहेत. २०१७ च्या खरीप हंगामाची लगबग सुरु झाली. सुलभ पीक कर्ज घेण्यासाठी शासनाने शिबिर लावली. पण, शेतकऱ्यांनी एप्रिल, मे मध्ये शेती पीक कर्जाची उचल केल्यानंतर, शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्यासाठी हालअपेष्टा सहन केल्यानंतर सुलभ पीककर्ज वाटप करण्याचे नाटके सुरु केल्या आहेत.