शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

७० गावांना मिळणार २६ कोटींची नुकसानभरपाई

By admin | Updated: July 5, 2017 00:57 IST

शेतकऱ्यांचा दृष्टचक्र कमी होत नाही. दुष्काळाचे संकट येवून पडते. शेतकरी मोडला जातो. दुष्काळ जाहीर होवूनही मदत वेळेवर मिळत नाही.

२०१५ च्या खरीप हंगामातील नुकसान : विभागीय आयुक्तांनी मागितला अहवाललोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : शेतकऱ्यांचा दृष्टचक्र कमी होत नाही. दुष्काळाचे संकट येवून पडते. शेतकरी मोडला जातो. दुष्काळ जाहीर होवूनही मदत वेळेवर मिळत नाही. दोन वर्षानंतर प्रशासन आता जागे झाले असून खरीप २०१५ ची नुकसान भरपाई मिळण्याचे संकेत मिळाले आहे. किती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी लागेल याची माहिती नागपूर विभागीय आयुक्तांनी मागितली आहे. तहसील कार्यालयाकडून माहिती गेली असून दोन वर्षानंतर नुकसानभरपाई मिळण्याची आशा बळावली आहे. २०१५ च्या खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ५० पैसे व त्यापेक्षा कमी आली होती. ती गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली. यात भंडारा तालुक्यातील चार गावे, तुमसर १२ गावे, मोहाडी ७० गावे, साकोली ९४ गावे, तुमसर १२ गावे, मोहाडी ७० गावे, साकोली ९४ गावे, लाखांदूर ८९ गावे, लाखनी १०२ अशी ३७१ गावे दुष्काळग्रस्त जाहीर केली होती. मोहाडी तालुक्यातील सिंचनाखाली पिकांच्या क्षेत्राखाली येणारे २२,६७९ शेतकरी तसेच कोरडवाहू पिकाखाली क्षेत्राखाली येणारे ११९२ शेतकरी अशा २३ हजार ८५१ शेतकऱ्यांना २५ कोटी ९६ लक्ष ६७ हजार रुपये दिले जाणार आहे. तहसीलदार यांनी नुकसान भरपाईकरिता तेवढ्या आवश्यक निधीची मागणी रक्कम जिल्हाधिकारी भंडारा यांना कळविली आहे. खरीप हंगाम २०१५ मध्ये ५० पैसेपेक्षा कमी असलेल्या गावामध्ये हिवरा, नवेगाव, रिठी, बच्छेरा, पांजराग्राम, कांद्री, बोथली रिठी, देऊळगाव, बिटेखारी, जांब, धुसाळा, बोंदरी, घोरपड, नवेगाव, खैरलांजी, काटी, धोप, ताडगाव, सिहरी, सकरला, मलदा, आंधळगाव, चिचोली, अकोला, सालई खुर्द, नेरला, रिठी, पालडोंगरी, उसर्रा, डाकला, काटेबाम्हणी, सालई बु., विहिरगाव, यंदा, भिकारखेडा, धर्मापूरी, डोंगरगाव, महालगाव, घाटकुरोडा, पांजरा, बोथली, माहेगाव, रोहणा, दहेगाव, देव्हाडा, नरसिंगटोला, देव्हाडा खु., निलज बु., जांभळापाणी, मोहगाव, उसरीपार, दवडीपार, ठाणेगाव, निलज खुर्द, मुंढरी, खु., मुंढरी, बु., कान्हळगाव, ढिवरवाडा, करडी, एकलाझरी, जांभोरा, किसनपूर, बोरी, पांजरा, पांजरा, खडकी, डोंगरदेव, बोंडे, पालोरा, केसलवाडा, लेंडेझरी, बोरगाव या गावांचा समावेश आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार असताना दुष्काळग्रस्त गावांची यादी जाहीर करण्यात आली होती.२०१५ चा खरीप हंगाम संपून दोन वर्ष संपली आहेत. २०१७ च्या खरीप हंगामाची लगबग सुरु झाली. सुलभ पीक कर्ज घेण्यासाठी शासनाने शिबिर लावली. पण, शेतकऱ्यांनी एप्रिल, मे मध्ये शेती पीक कर्जाची उचल केल्यानंतर, शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्यासाठी हालअपेष्टा सहन केल्यानंतर सुलभ पीककर्ज वाटप करण्याचे नाटके सुरु केल्या आहेत.