शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

प्रकल्पांमध्ये ६६ टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:17 IST

तलावांच्या जलसाठ्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ६६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यावर्षी प्रथम पावसाने हुलकावणी दिल्यानंतर मध्यंतरी दमदार पाऊस बरसल्याने प्रकल्पांची स्थिती सुधारली आहे.

ठळक मुद्देसरासरी ८६ टक्के पाऊस : मालगुजारी तलावांच्या पातळीत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील मध्यम, लघु व माजी मालगुजारी तलावांच्या जलसाठ्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ६६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यावर्षी प्रथम पावसाने हुलकावणी दिल्यानंतर मध्यंतरी दमदार पाऊस बरसल्याने प्रकल्पांची स्थिती सुधारली आहे.जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प असून त्यामध्ये ६५.२२ टक्के जलसाठा आहे. चांदपूर मध्यम प्रकल्पात ८४.१६, बघेडा जलाशयात ५७.७२, बेटेकर बोथली येथे ७.३१ तर सोरणा या प्रकल्पात १२.७४ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. बेटेकर व सोरणा प्रकल्पाच्या पातळीत सुधारणा झालेली नाही. एकुण ३१ लघु प्रकल्पापैकी सहा प्रकल्प तुडूंब भरले आहेत. यात तुमसर तालुक्यातील डोंगरला, मोहाडी तालुक्यातील नागठाणा, भंडारा तालुक्यातील मंडनगाव व पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, पिलांद्री तर लाखनी तालुक्यातील वाकल या लघु प्रकल्पात १०० टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातील एकुण लघु प्रकल्पात ६२.६२ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत २८ माजी मालगुजारी तलाव आहेत. यापैकी एकोडी, आमगाव, पिंडकेपार, पाथरी, परसोडी, लवारी, सीतेपार, सानगडी, रेंगेपार कोहळी, पिंपळगाव, चप्राड, इंदोरा, दहेगाव या मालगुजारी तलावांमध्ये १०० टक्के पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत सरासरी ८६ टक्के पाऊस बरसला असून अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. येत्या काळात पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते.

टॅग्स :Waterपाणी