शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

१५ महिन्यांत ६० जणांनी कवटाळले मृत्यूला शेतकरी आत्महत्या थांबेनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 14:46 IST

Bhandara : शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणून गणला जातो. मात्र, परिस्थितीने खचलेल्या बळीराजाची आर्त हाक शासन-प्रशासन ऐकत नसल्याने विविध कारणांनी तो मृत्यूला कवटाळत आहे. जिल्ह्यात गत १५ महिन्यांत ६० शेतकऱ्यांनी विविध मार्गानी या जीवन संपविले. शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबणार कधी, हा प्रश्न कायम आहे.

इंद्रपाल कटकवार भंडारा : जिल्हा तांदळाचे कोठार म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. या तांदळाच्या कोठारातून दरवर्षी लाखो क्विंटल धानाचे उत्पादन होते. राज्यातच नव्हे, तर देशभरात हा तांदूळ निर्यात केला जातो. तांदूळ पिकविणाऱ्या बळीराजाचे हाल व त्यांची स्थिती अजूनही बदललेली नाही. २५ वर्षाचा आकडेवारीवर नजर घातल्यास ७७५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात कुणी कर्जाच्या विवंचनेत, तर कुणी पिकाची नासाडी झाली म्हणून आत्महत्या केली. सरकारी बँका, सहकारी पतसंस्था, हातउसने व सावकाराचे कर्ज कसे फेडायचे, याच कारणांनी बळीराजा त्रस्त असतो.

खरीप हंगाम सुरू झाला की बी-बियाणे, खते यासाठी लागणारा पैसा कसा उभारावा, याच विचारात गुंतलेला असतो. यातूनच शासन प्रशासन व बँकेचे उंबरठे गाठल्यानंतर कर्ज न मिळाल्यास तो सावकाराच्या दारी जातो. अशावेळी त्याची पिळवणूक केली जाते. विशेष म्हणजे, अल्पभूधारक शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे.

कीड व रोगांचा प्रादुर्भावधान गर्भात असताना त्यावर रोग व किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव जाणवतो. महागडी औषधे वापरूनही प्रकोप जात नाही. अशावेळी उत्पादन अत्यल्प निघते. आधीच डोक्यावर कर्जाचे डोंगर व उत्पादनही न निघाल्याने बळीराजा अधिकच खचत जातो. याच विवंचनेतून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे.

कसा करावा उदरनिर्वाह ?रब्बी हंगामापेक्षा खरीप हंगामात धान लागवडीचे क्षेत्र अधिक असते. मात्र, घडाईपेक्षा मडाई जास्त असल्याने लागवडीला लागणारा खर्चही निघत नाही. अशावेळी धानाची शेती परवडण्यासारखी राहिलेली नाही. सावकाराचे कर्ज, घराचा प्रपंच, मुलीचे लग्न, शिक्षण अशा विविध बाबींवर खर्च कसा उचलायचा, असा प्रश्न अन्य लोकांसारखा बळीराजासमोरही उपस्थित होतो.

हमी केंद्र वेळेवर उघडावेदरवर्षी १ आक्टोबरपासून आधारभूत धान खरेदी केंद्राचा शुभारंभ होत असतो. मात्र, धान खरेदी केंद्र वेळेवर सुरू होत नाही. गतवर्षीही तब्बल दीड महिना विलंबाने धान खरेदी केंद्र सुरू झाले. अशावेळी खासगी व्यापाऱ्यांना धान विकल्याशिवाय बळीराजासमोर पर्याय उपलब्ध नसतो. पदरात जेवढे मिळतील तेवढे पैसे ते घेतात. परिणामी, आधारभूत धान खरेदी केंद्र उघडूनही त्याचा खऱ्या अर्थाने लाभ शंभर टक्के लाभ मिळत नाही. यावरही आत्मचिंतन होणे गरजेचे आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराfarmingशेतीFarmerशेतकरी