शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्ह्यातील ६२ गावांतील ५४ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 00:37 IST

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्यातील सातही तालुक्यातील ६२ गावांतील ५४ पाणीपुरवठा योजनांना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी मंजुरी दिली.

ठळक मुद्दे३० कोटी ८३ लाखांचा निधी : टंचाईग्रस्त गावांना शासनाचा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्यातील सातही तालुक्यातील ६२ गावांतील ५४ पाणीपुरवठा योजनांना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी मंजुरी दिली. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल व शौचालय बांधकामासाठी ३० कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. यामुळे भंडारा जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा मिळणार आहे.भंडारा जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पाणी पुरवठा योजना नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. त्यासाठी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि सरपंचांनी पाणी पुरवठा योजनेसाठी सातत्याने मागणी केली होती. या सर्व योजनांना समाविष्ट करून यावर्षी जिल्ह्यातील ६२ वाडा वस्त्यांसाठी ५४ योजनांचा सर्व समावेशक आराखडा तयार करण्यात आला. या योजना राबविण्यासाठी २३ कोटी ४१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे दोन वर्षाच्या कालखंडानंतर यावर्षी हा जंबो आराखडा मंजूर करण्यात आला आहे. या आराखड्यात मागील चालू असलेल्या योजनांसाठी ३ कोटी १८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नवीन व चालू असणाऱ्या अशा ७१ गावे व वाड्यांसाठी ६२ योजनांसाठी २६ कोटी ५९ लाख रुपयांचा अंतिम आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे.यापूर्वी जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून १३ गावांसाठी १३ योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यासाठी ७ कोटी ७२ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील पाणी पुरवठा सुयोग्य रितीने होण्यासाठी आणि शुद्ध पाणी मिळावे यासाठी नामदार बबनराव लोणीकर यांच्या सततच्या प्रयत्नाने सर्व प्रलंबित योजना पूर्ण करण्यात आल्या आहेत.भंडारा जिल्ह्यातील या योजनांसाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळाली आहे.केंद्र सरकारने उठविली स्थगितीराष्ट्रीय पेयजल योजनेला मार्च २०१५ मध्ये केंद्र सरकारने स्थगिती दिली होती. गत दोन वर्षात केवळ सांसद आदर्श ग्राम व गुणवत्ताबाधित गावांमध्येच योजना घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे खूप कमी योजनांना मंजुरी मिळाली. ही स्थगिती उठविण्यासाठी नामदार बबनराव लोणीकर यांनी सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. याबाबत केंद्रीय मंत्री उमा भारती यांची भेट घेतली. बंदी उठविण्याची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर बंदी उठली.

टॅग्स :Waterपाणी