शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

जिल्ह्यातील ६२ गावांतील ५४ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 00:37 IST

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्यातील सातही तालुक्यातील ६२ गावांतील ५४ पाणीपुरवठा योजनांना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी मंजुरी दिली.

ठळक मुद्दे३० कोटी ८३ लाखांचा निधी : टंचाईग्रस्त गावांना शासनाचा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्यातील सातही तालुक्यातील ६२ गावांतील ५४ पाणीपुरवठा योजनांना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी मंजुरी दिली. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल व शौचालय बांधकामासाठी ३० कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. यामुळे भंडारा जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा मिळणार आहे.भंडारा जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पाणी पुरवठा योजना नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. त्यासाठी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि सरपंचांनी पाणी पुरवठा योजनेसाठी सातत्याने मागणी केली होती. या सर्व योजनांना समाविष्ट करून यावर्षी जिल्ह्यातील ६२ वाडा वस्त्यांसाठी ५४ योजनांचा सर्व समावेशक आराखडा तयार करण्यात आला. या योजना राबविण्यासाठी २३ कोटी ४१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे दोन वर्षाच्या कालखंडानंतर यावर्षी हा जंबो आराखडा मंजूर करण्यात आला आहे. या आराखड्यात मागील चालू असलेल्या योजनांसाठी ३ कोटी १८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नवीन व चालू असणाऱ्या अशा ७१ गावे व वाड्यांसाठी ६२ योजनांसाठी २६ कोटी ५९ लाख रुपयांचा अंतिम आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे.यापूर्वी जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून १३ गावांसाठी १३ योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यासाठी ७ कोटी ७२ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील पाणी पुरवठा सुयोग्य रितीने होण्यासाठी आणि शुद्ध पाणी मिळावे यासाठी नामदार बबनराव लोणीकर यांच्या सततच्या प्रयत्नाने सर्व प्रलंबित योजना पूर्ण करण्यात आल्या आहेत.भंडारा जिल्ह्यातील या योजनांसाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळाली आहे.केंद्र सरकारने उठविली स्थगितीराष्ट्रीय पेयजल योजनेला मार्च २०१५ मध्ये केंद्र सरकारने स्थगिती दिली होती. गत दोन वर्षात केवळ सांसद आदर्श ग्राम व गुणवत्ताबाधित गावांमध्येच योजना घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे खूप कमी योजनांना मंजुरी मिळाली. ही स्थगिती उठविण्यासाठी नामदार बबनराव लोणीकर यांनी सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. याबाबत केंद्रीय मंत्री उमा भारती यांची भेट घेतली. बंदी उठविण्याची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर बंदी उठली.

टॅग्स :Waterपाणी