शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

वर्षभरात वरठी ठाण्याच्या हद्दीत ५३ आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 21:45 IST

सध्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. यातून गरीब-श्रीमंत असा भेदभाव उरला नाही. यात शालेय व महाविद्यालयीन मुला-मुलींची संख्या अधिक आहे. वर्षभरात वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५३ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. वाढत्या आत्महत्यामुळे कुटुंबाना नानाविध समस्यांसह अनेक प्रश्नांना समोर जावे लागते.

ठळक मुद्देआत्महत्यांमध्ये मुला-मुलींची संख्या अधिक : शाळा महाविद्यालयातून जनजागृती होणे गरजेचे

तथागत मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : सध्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. यातून गरीब-श्रीमंत असा भेदभाव उरला नाही. यात शालेय व महाविद्यालयीन मुला-मुलींची संख्या अधिक आहे. वर्षभरात वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५३ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. वाढत्या आत्महत्यामुळे कुटुंबाना नानाविध समस्यांसह अनेक प्रश्नांना समोर जावे लागते.घरातील महत्वाचा व्यक्ती गेल्याच्या दु:खात असेलेल्यांना येणारी आवाहने ही मृत्यूपेक्षा भयानक ठरत आहेत. आत्महत्या केल्याने मृतकाचे सुटका होत असली तरी कुटुंबाच्या मागे असह्य दु:ख वाट्याला येताना दिसतात. घरातील तरुण मुलगा किंवा मुलगी अचानक गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित होतात.त्यातल्या-त्यात सुरु होणाऱ्या विविध चर्चा दु:ख वाढवल्या खेरीज काहीच करीत नाही. कधी कधी तर आपणही आत्महत्या करून मोकळे होऊन जावे अशी परिस्थिती निर्माण होते. स्वत:ला संपणे आणि मुक्त होणे यातून घडणाºया घटना आपल्या मागे अनेक आवाहने सोडून जातात. आत्महत्या म्हणजे गुन्हा आहे. आत्महत्या बाबत पोलीस प्रशासनाची प्रश्नांची सरबत्ती व शोध म्हंणजे न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आहे. त्यांचे समाधान होईस्तोवर उत्तरे देणे म्हणजे आवाहनच ठरते. यात त्याचा दोष आहे असा नाही. हा त्याचा तपासाचा भागच आहे. पण एका आत्महत्येनंतर त्याच्या मागे असलेले अख्खे कुटुंब याला समोर जाते. त्यातल्यात्यात समाजाची पाहण्याचा दृष्टिकोन गुन्हेगार सारखा असतो. अनेक जण यावर तोंडसुख घेताना कर्माची फळ व पाप-पुण्य यापलीकडे जाऊन चर्चा रंगवतात . या सर्व घडामोडी म्हणजे एकप्रकारची शिक्षा ठरत आहेत.वरठी सारख्या लहानशा गावात वर्षभरात ५३ आत्महत्या झाल्याची नोंद आहे. यात सर्वाधिक शालेय मुले- मुलींची आहे. ही बाब एका गावापुरती नाही. सर्वत्र सारखीच परिस्थिती आहे. या सर्व बाबीसाठी नेहमी पालकांना वेठीस धरले जाते. खरंच एखाद्या पालकाला वाटते की त्याच्या मुलाने आत्महत्या करावी म्हणून? याबाबत आपणच आपल्याला प्रश्न विचारायची गरज आहे. मोठ्या प्रमाणात होणाºया आत्महत्या रोखण्यासाठी सामाजिक चळवळ उभारणे आवश्यक आहे. शाळा महाविद्यालयातून यावर जागरण होणे तेवढेच गरजेचे आहे. अन्यथा येणाऱ्या काळात प्रत्येक घरी एक आत्महत्या झाल्याशिवाय राहणार नाही.मुलांशी संवाद निष्फळअंगावर खेळणारी मूल वयात आल्यावर आपोआप अंतर तयार करतात. लहान-लहान गोष्टी कुतूहलाने सांगणारी ही मूल नकळत आपल्याशी दुरावतात. त्यांच्या आयुष्यात घडणाºया गोष्टी व घटना शेअर करण्यासाठी 'सेफ झोन' निवडतात. यासाठी समवयस्क मित्र शोधून ठेवतात. यामुळे आपली इच्छा असूनही त्यांच्याशी संवाद साधता येत नाही. यामुळे कितीही प्रयत्न करून त्यांच्या मनातील जाळे उलगडत नाहीत. ते आपल्याला नेमकं तेवढ्याच गोष्टी शेयर करतात जे त्यांना करावसा वाटतात. यासाठी आपल्याकडे अनेक उपाय सांगणारे आहेत. मुलाशी संवाद हा त्यापैकी एक पण वयात येणारी मुले मुली पालकांपासून अंतर ठेवायला लागल्याने संवादाची संकल्पना उपायकारक ठरत नाही.मोबाईल व मित्र ठरताहेत घातकसध्याच्या युगात मोबाईल व मित्र सर्वाधिक घातक शस्त्र ठरत आहेत. आताची पिढी आक्रमक असून संवेदशील आहे. एखाद्या घटनेवर तत्काळ निर्णयाची प्रवृत्ती धोकादायक ठरत आहे. या सर्व परिस्थितीला मोबाइल व मित्र कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले आहे. मोबाईल मुळे जग जवळ आले. त्यातल्या त्यात केव्हाही व कुठेही संपर्क करण्याची फास्टेस्ट पद्धत सुरु झाली. अशा प्रथेमुळे तात्काळ जाब विचारणे आणि समाधान न झाल्यास टोकाची भूमिका घेऊन स्वत:ला संपवणे सोपं झाले आहे. यामुळे पालकांनी मोबाईल व मित्र याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. सुख साधने असावी पण त्याचा केव्हा व कशासाठी होतो, यावर पाळत ठेवणे आवश्यक आहे.