शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात वरठी ठाण्याच्या हद्दीत ५३ आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 21:45 IST

सध्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. यातून गरीब-श्रीमंत असा भेदभाव उरला नाही. यात शालेय व महाविद्यालयीन मुला-मुलींची संख्या अधिक आहे. वर्षभरात वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५३ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. वाढत्या आत्महत्यामुळे कुटुंबाना नानाविध समस्यांसह अनेक प्रश्नांना समोर जावे लागते.

ठळक मुद्देआत्महत्यांमध्ये मुला-मुलींची संख्या अधिक : शाळा महाविद्यालयातून जनजागृती होणे गरजेचे

तथागत मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : सध्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. यातून गरीब-श्रीमंत असा भेदभाव उरला नाही. यात शालेय व महाविद्यालयीन मुला-मुलींची संख्या अधिक आहे. वर्षभरात वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५३ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. वाढत्या आत्महत्यामुळे कुटुंबाना नानाविध समस्यांसह अनेक प्रश्नांना समोर जावे लागते.घरातील महत्वाचा व्यक्ती गेल्याच्या दु:खात असेलेल्यांना येणारी आवाहने ही मृत्यूपेक्षा भयानक ठरत आहेत. आत्महत्या केल्याने मृतकाचे सुटका होत असली तरी कुटुंबाच्या मागे असह्य दु:ख वाट्याला येताना दिसतात. घरातील तरुण मुलगा किंवा मुलगी अचानक गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित होतात.त्यातल्या-त्यात सुरु होणाऱ्या विविध चर्चा दु:ख वाढवल्या खेरीज काहीच करीत नाही. कधी कधी तर आपणही आत्महत्या करून मोकळे होऊन जावे अशी परिस्थिती निर्माण होते. स्वत:ला संपणे आणि मुक्त होणे यातून घडणाºया घटना आपल्या मागे अनेक आवाहने सोडून जातात. आत्महत्या म्हणजे गुन्हा आहे. आत्महत्या बाबत पोलीस प्रशासनाची प्रश्नांची सरबत्ती व शोध म्हंणजे न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आहे. त्यांचे समाधान होईस्तोवर उत्तरे देणे म्हणजे आवाहनच ठरते. यात त्याचा दोष आहे असा नाही. हा त्याचा तपासाचा भागच आहे. पण एका आत्महत्येनंतर त्याच्या मागे असलेले अख्खे कुटुंब याला समोर जाते. त्यातल्यात्यात समाजाची पाहण्याचा दृष्टिकोन गुन्हेगार सारखा असतो. अनेक जण यावर तोंडसुख घेताना कर्माची फळ व पाप-पुण्य यापलीकडे जाऊन चर्चा रंगवतात . या सर्व घडामोडी म्हणजे एकप्रकारची शिक्षा ठरत आहेत.वरठी सारख्या लहानशा गावात वर्षभरात ५३ आत्महत्या झाल्याची नोंद आहे. यात सर्वाधिक शालेय मुले- मुलींची आहे. ही बाब एका गावापुरती नाही. सर्वत्र सारखीच परिस्थिती आहे. या सर्व बाबीसाठी नेहमी पालकांना वेठीस धरले जाते. खरंच एखाद्या पालकाला वाटते की त्याच्या मुलाने आत्महत्या करावी म्हणून? याबाबत आपणच आपल्याला प्रश्न विचारायची गरज आहे. मोठ्या प्रमाणात होणाºया आत्महत्या रोखण्यासाठी सामाजिक चळवळ उभारणे आवश्यक आहे. शाळा महाविद्यालयातून यावर जागरण होणे तेवढेच गरजेचे आहे. अन्यथा येणाऱ्या काळात प्रत्येक घरी एक आत्महत्या झाल्याशिवाय राहणार नाही.मुलांशी संवाद निष्फळअंगावर खेळणारी मूल वयात आल्यावर आपोआप अंतर तयार करतात. लहान-लहान गोष्टी कुतूहलाने सांगणारी ही मूल नकळत आपल्याशी दुरावतात. त्यांच्या आयुष्यात घडणाºया गोष्टी व घटना शेअर करण्यासाठी 'सेफ झोन' निवडतात. यासाठी समवयस्क मित्र शोधून ठेवतात. यामुळे आपली इच्छा असूनही त्यांच्याशी संवाद साधता येत नाही. यामुळे कितीही प्रयत्न करून त्यांच्या मनातील जाळे उलगडत नाहीत. ते आपल्याला नेमकं तेवढ्याच गोष्टी शेयर करतात जे त्यांना करावसा वाटतात. यासाठी आपल्याकडे अनेक उपाय सांगणारे आहेत. मुलाशी संवाद हा त्यापैकी एक पण वयात येणारी मुले मुली पालकांपासून अंतर ठेवायला लागल्याने संवादाची संकल्पना उपायकारक ठरत नाही.मोबाईल व मित्र ठरताहेत घातकसध्याच्या युगात मोबाईल व मित्र सर्वाधिक घातक शस्त्र ठरत आहेत. आताची पिढी आक्रमक असून संवेदशील आहे. एखाद्या घटनेवर तत्काळ निर्णयाची प्रवृत्ती धोकादायक ठरत आहे. या सर्व परिस्थितीला मोबाइल व मित्र कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले आहे. मोबाईल मुळे जग जवळ आले. त्यातल्या त्यात केव्हाही व कुठेही संपर्क करण्याची फास्टेस्ट पद्धत सुरु झाली. अशा प्रथेमुळे तात्काळ जाब विचारणे आणि समाधान न झाल्यास टोकाची भूमिका घेऊन स्वत:ला संपवणे सोपं झाले आहे. यामुळे पालकांनी मोबाईल व मित्र याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. सुख साधने असावी पण त्याचा केव्हा व कशासाठी होतो, यावर पाळत ठेवणे आवश्यक आहे.