शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

रमाई आवास योजनेंतर्गत ४८१६ घरकूल पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 06:00 IST

देवानंद नंदेश्वर। लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यातील रमाई आवास योजनेची वाटचाल कासवगतीने सुरु आहे. गत तीन वर्षात जिल्ह्यात ...

ठळक मुद्दे उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल : जिल्ह्यात ९,६७५ घरकुलाचे उद्दिष्ट, कामाची गती वाढविण्याची गरज

देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील रमाई आवास योजनेची वाटचाल कासवगतीने सुरु आहे. गत तीन वर्षात जिल्ह्यात शासनाने रमाई आवास योजनेतून ९६७५ घरकुलाचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी ८ हजार ८८८ घरकूले मंजूर केले. त्यापैकी ४ हजार ८१६ घरकुले संबंधित लाभार्थ्यांनी पुर्ण केले आहे. म्हणजे अजूनही ४ हजार ०७२ घरे अपूर्ण आहेत.या योजनेची अपेक्षीत उद्दिष्ट साध्य होण्यास अडथळा निर्माण होत आहे. या आवास योजनेतील घरकुल पूर्ण करण्यासाठी राज्य शासनासह जिल्हा प्रशासनाने जनजागृती केल्याचा दावा करीत असले तरी गत तीन वर्षात जिल्ह्यात साधारण ४०७२ घरकुल रखडले असल्याची धक्कादायक माहिती आहे.अनुसूचित जाती व नवबौध्दांसाठी शासनातर्फे रमाई आवास योजना राबविण्यात येते. ग्रामीण भाग, नगर परिषद हद्दीत संबंधित यंत्रणेमार्फत योजना राबविली जाते. ग्रामीण भागाचा विचार केल्यास साधारण एक लाख ३० हजार रुपयांचे अनुदान शासनाचे, तर १८ हजार ९० रुपयांचे अनुदान रोहयोच्या मंजुरीपोटी दिली जात असते. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत योजना राबविली जात आहे.रमाई आवास योजनेंतर्गत २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात १०३५ घरकुलाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १०२५ घरकुले मंजूरपैकी केवळ ९०७ घरकुल पुर्ण करण्यात आले. २०१७-१८ मध्ये ७१४० घरकुलांची उद्दिष्ट होते. त्यापैकी ६७६६ मंजूर घरकुलपैकी केवळ ३८२५ घरकुल पुर्ण झाली.गतवर्षी जिल्हा परिषद प्रशासनाने अनेक वर्षांपासून रखडलेल्या आवास योजनेसाठी जिल्ह्यात पंचायत समिती स्तरावर मिशन संपूर्ण घरकूल मोहीम राबविली होती. असे असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात घरकुलांची कामे रखडली आहेत. गतवर्षी १५०० घरांचे उ्द्दीष्ट देण्यात आले होते.त्यापैकी १०९७ मंजूर घरकुलापैकी केवळ ८४ घरकुल पुर्ण करण्यात आले. म्हणजे १०१३ घरकुलांची कामे अपूर्ण आहेत. प्रशासनाने घरकुलांच्या कामाबाबत लाभार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.सदर अधिकारी प्रत्यक्ष लाभार्थ्यांशी संवाद साधून अडचणी देखील समजून घेतात. परंतु घरकुलाची रक्कम थेट आॅनलाईन पध्दतीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जात असते. यात पारदर्शकता असली तरी लाभार्थ्यांना हप्त्याची रक्कम वेळेवर मिळत नाही. कुणाचे जनधन बचत खाते आहे, तर बहुतांश घराचे मुल्यमापन केले जात नसल्याने रक्कम मिळत नाही, असे काही लाभार्थ्यांचे म्हणणे आहे.घरकुलाची रक्कम साधारण चार हप्त्यात दिली जाते. त्यात पहिल्या टप्यात २० हजार रुपये, दुसºया व तिसºया टप्यात प्रत्येकी ४५ हजार रुपये, तर चवथ्या टप्यात २० हजार रुपये असे एकुण १ लाख ३० हजार रुपये दिले जाते. पहिल्या टप्यात २० हजार रुपये दिले जात असले तरी एवढ्याशा रकमेतून घरपायव्याचे काम पूर्ण होत नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना स्वत:च्या खिश्यातून रक्कम टाकावी लागते. याशिवाय पुढील रकमेसाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. घराच्या कामाचे मुल्यमापन करण्यासाठी लाभार्थी पंचायत समितीकडे सातत्याने हेलपाटे मारीत असतात.चालु वित्तीय वर्षात उद्दिष्टच नाहीरमाई आवास योजनेंतर्गत सन २०१९-२० या वित्तीय वर्षात शासनाने भंडारा जिल्ह्याला घरकुलांचे उद्दिष्टच दिले नाही. प्रशासनाने या योजनेंतर्गत ५४५ घरकुलांची नोंदणी केलेली आहे. या वर्षात या योजनेला उद्दिष्ट मिळाले नसल्याने अनुसूचित जाती व नवबौध्द लाभार्थ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे.