शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत ४५ जणांचा मृत्यू

By admin | Updated: July 24, 2015 00:39 IST

पाणी तथा किटकजन्य आजारामुळे मागील पाच वर्षात ४५ जणांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागातर्फे ...

किटकजन्य आजाराचा फटका : आरोग्य विभागातर्फे प्रतिरोध जनजागृती मोहिमभंडारा : पाणी तथा किटकजन्य आजारामुळे मागील पाच वर्षात ४५ जणांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागातर्फे विविध उपक्रम तथा मोहिम राबविण्यात असतानाही जनजागृती अभावी किटकजन्य आजारामुळे हे तथ्य समोर आले आहे. विशेष म्हणजे हिवताप विभागातर्फे मागील पाच वर्षात १९ लक्ष ४९ हजार ५९२ जणांची रक्तचाचणी करण्यात आली असून त्यापैकी ९६२ नमुने पॉझिटीव्ह आढळले आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने दरवर्षी किटकजन्य आजारासंदर्भात नियंत्रण तथा उपाययोजना करण्यात येत आहे. सन २०१० ते २०१४ या पाच वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात हिवताप, जॅपीनीज एंसेफलायटीस, चंडीपुरा, डेंगी, व्हायरल इंसेफलायटीस या आजारामुळे ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सन २०१० मध्ये चंडीपुरा आजारामुळे १२ जणांचा मृत्यू झाला. डेंग्युमुळे २०१२-१४ या कालावधीत १८ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. व्हॉयरल इंसेफलायटीस या आजाराच्या लागणमुळे १५ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मागील पाच वर्षात हिवतापामुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही. अतिसंवेदनशील ५२ गावांमध्ये फॉगिंग करण्यात येणार आहे. यात जिल्ह्यात डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असलेल्या गावांमध्ये किटकनाशक औषधांची फवारणी करण्यात येणार आहे. जनजागरण मोहिमेचा उद्देश गावपातळीवर किटकजन्य आजाराचे लक्षणे व उपचार व प्रतिरोधाचे विविध उपाययोजनांची माहिती जनतेपर्यंत योग्य त्या माध्यमांद्वारे पोहचविणे आहे. डास उत्पत्ती स्थाने नष्ट करुन प्रतिबंध उपाययोजनामध्ये लोकसहभाग वाढविणे, रुग्ण आढळल्यास त्यावर उपचार करणे असा आहे. (प्रतिनिधी )आरोग्यविभागातर्फे जनजागृती मोहिमकिटकजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासंदर्भात जिल्हा आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत प्रतिरोध जनजागरण मोहिम राबविण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील ५२ गावांमध्ये फॉगिंग करण्यात येणार आहे. या आशयाची माहिती आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली. निंबाळकर म्हणाले, सदर मोहिम ३० सप्टेंबरपर्यंत घेण्यात येणार आहे. यात नागरिकांना किटकजन्य आजारासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना व काळजी घेण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी गावा गावात सर्व्हेक्षण व गृहभेट देणार आहे. तसेच किटकशास्त्रीय सर्व्हेक्षण व जैविक नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात तालुकास्तरावर घेण्यात येणार आहे. दरम्यान दि. ३१ जुलैपर्यंत प्रत्येक शाळांमध्ये डेंग्यु जागृती मोहिम राबविण्यात येत असल्याची माहितीही निंबाळकर यांनी दिली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक देवेंद्र पातुरकर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.