शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
4
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
5
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
6
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
7
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
8
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
9
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
10
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
11
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
12
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
13
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
14
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
15
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
16
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
17
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
18
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
19
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
20
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?

पाच वर्षांत ४५ जणांचा मृत्यू

By admin | Updated: July 24, 2015 00:39 IST

पाणी तथा किटकजन्य आजारामुळे मागील पाच वर्षात ४५ जणांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागातर्फे ...

किटकजन्य आजाराचा फटका : आरोग्य विभागातर्फे प्रतिरोध जनजागृती मोहिमभंडारा : पाणी तथा किटकजन्य आजारामुळे मागील पाच वर्षात ४५ जणांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागातर्फे विविध उपक्रम तथा मोहिम राबविण्यात असतानाही जनजागृती अभावी किटकजन्य आजारामुळे हे तथ्य समोर आले आहे. विशेष म्हणजे हिवताप विभागातर्फे मागील पाच वर्षात १९ लक्ष ४९ हजार ५९२ जणांची रक्तचाचणी करण्यात आली असून त्यापैकी ९६२ नमुने पॉझिटीव्ह आढळले आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने दरवर्षी किटकजन्य आजारासंदर्भात नियंत्रण तथा उपाययोजना करण्यात येत आहे. सन २०१० ते २०१४ या पाच वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात हिवताप, जॅपीनीज एंसेफलायटीस, चंडीपुरा, डेंगी, व्हायरल इंसेफलायटीस या आजारामुळे ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सन २०१० मध्ये चंडीपुरा आजारामुळे १२ जणांचा मृत्यू झाला. डेंग्युमुळे २०१२-१४ या कालावधीत १८ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. व्हॉयरल इंसेफलायटीस या आजाराच्या लागणमुळे १५ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मागील पाच वर्षात हिवतापामुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही. अतिसंवेदनशील ५२ गावांमध्ये फॉगिंग करण्यात येणार आहे. यात जिल्ह्यात डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असलेल्या गावांमध्ये किटकनाशक औषधांची फवारणी करण्यात येणार आहे. जनजागरण मोहिमेचा उद्देश गावपातळीवर किटकजन्य आजाराचे लक्षणे व उपचार व प्रतिरोधाचे विविध उपाययोजनांची माहिती जनतेपर्यंत योग्य त्या माध्यमांद्वारे पोहचविणे आहे. डास उत्पत्ती स्थाने नष्ट करुन प्रतिबंध उपाययोजनामध्ये लोकसहभाग वाढविणे, रुग्ण आढळल्यास त्यावर उपचार करणे असा आहे. (प्रतिनिधी )आरोग्यविभागातर्फे जनजागृती मोहिमकिटकजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासंदर्भात जिल्हा आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत प्रतिरोध जनजागरण मोहिम राबविण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील ५२ गावांमध्ये फॉगिंग करण्यात येणार आहे. या आशयाची माहिती आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली. निंबाळकर म्हणाले, सदर मोहिम ३० सप्टेंबरपर्यंत घेण्यात येणार आहे. यात नागरिकांना किटकजन्य आजारासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना व काळजी घेण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी गावा गावात सर्व्हेक्षण व गृहभेट देणार आहे. तसेच किटकशास्त्रीय सर्व्हेक्षण व जैविक नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात तालुकास्तरावर घेण्यात येणार आहे. दरम्यान दि. ३१ जुलैपर्यंत प्रत्येक शाळांमध्ये डेंग्यु जागृती मोहिम राबविण्यात येत असल्याची माहितीही निंबाळकर यांनी दिली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक देवेंद्र पातुरकर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.