शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

मनरेगातून ४२ लाख मनुष्यनिर्मित दिवस

By admin | Updated: February 11, 2016 00:48 IST

मागेल त्याला काम, या उद्देशानुसार राज्य शासनाने ग्रामीण तथा शहरी भागातील मजुरांना काम उपलब्ध करून देण्यासाठी मनरेगाची निर्मिती केली आहे.

२५ हजार मजुरांच्या हाताला काम : दुष्काळाच्या सावटावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन लागले कामालाभंडारा : मागेल त्याला काम, या उद्देशानुसार राज्य शासनाने ग्रामीण तथा शहरी भागातील मजुरांना काम उपलब्ध करून देण्यासाठी मनरेगाची निर्मिती केली आहे. यातून जिल्ह्यात यावर्षी २५ हजार २८५ मजुरांच्या माध्यमातून ४१ लाख ९७ हजार मनुष्यनिर्मित दिवसातून जिल्हा प्रशासनाने मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला. एक मजूर, एक मनुष्यनिर्मिती दिवस अशी परिभाषा मजुरांच्या कामाला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत करण्यात आली आहे. जिल्ह्यात रोहयो व ५० टक्के ग्रामपंचायत स्तर व अन्य एजंसीच्या माध्यमातून जिल्ह्यातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यात ५ लाख ६० हजार नोंदणीकृत (जॉब कार्ड धारक) मजुरांची नोंदणी आहे. त्यातील २ लाख ४५ हजार मजुरांची आतापर्यंत कामावर वर्णी लागली आहे. ७७ कोटी ३१ लाख कुशल व अकुशल कामांसाठी निधी प्राप्त झाला असून त्यापैकी ५८ कोटी ८० लाख मजुरीवर खर्च करण्यात आला असून हा खर्च अकुशल कामगारांवर करण्यात आला असून उर्वरीत खर्च कुशल कामगारांवर करण्यात आला आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वृक्ष संगोपन, शौचालय बांधकाम, मुरुम सिमेंट रस्ते नालीबांधकाम, मामा तलाव गाळ काढणे व बोडी खोलीकरण, पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून नहर दुरुस्ती, नाला सरळीकरण करणे, बंधाऱ्यातील गाळ काढणे, सिंचन विहिर, मत्स्य संवर्धन तळी, बांधकाम व शेततळ्यांची कामे, मैदान सपाटीकरण, मजगी, गुरांचे शेड, शेळी पालन शेड, कुक्कुटपालन, पांदन रस्ते व कच्ची नाली, घरकुल आदींची कामे यातून करण्यात येत आहेत. ग्रामपंचायत व विविध विभागाच्या माध्यमातून ही सर्व कामे करण्यात येत आहेत. यात सध्या जिल्ह्यातील ५४० ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ४२४ कामे सुरु आहेत. तर अन्य विभागाच्या माध्यमातून १३१ असे ५५५ कामे सुरु आहेत.मागीलवर्षी ५२.५० लाखांची कामे करण्यात आली. त्या तुलनेत १ एप्रिल २०१५ पासून आजपर्यंत करण्यात आलेली कामे उद्दीष्टपूर्तीपेक्षा जास्त कामाकडे वाटचाल सुरु आहे. (शहर प्रतिनिधी)