शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

जलयुक्त शिवार अभियानासाठी ४० कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:49 IST

शेतकरी सधन व समृद्ध व्हावा या महत्त्वाकांक्षी दृष्टिक्षेपातून राज्य शासनाने सन २०१५ पासून जलयुक्त शिवार ही संकल्पना राबविण्यास सुरूवात केली आहे.

ठळक मुद्दे१,३८५ कामांचा समावेश : गाव निहाय प्रस्तावांवर झाली चर्चा

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकरी सधन व समृद्ध व्हावा या महत्त्वाकांक्षी दृष्टिक्षेपातून राज्य शासनाने सन २०१५ पासून जलयुक्त शिवार ही संकल्पना राबविण्यास सुरूवात केली आहे. यात पुर्व विदर्भातील भंडारा जिल्हा माघारला असला तरी सन २०१७-१८ या वित्तीय वर्षात जलयुक्त शिवारांतर्गत सुधारित आराखडानुसार ४० कोटी ३५ लक्ष रूपयांचा निधी मिळणार आहे.भंडारा जिल्ह्यात मुख्यत: धान हे मुख्य पीक आहे. मात्र अस्मानी व सुल्तानी संकटामुळे धान उत्पादकांवर आर्थिक संकट कोसळत असते. बहुतांश वेळा शेतकरी सिंचन सुविधा उपलब्ध नसल्याने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलतात. याशिवाय सिंचन देऊनही पीक उत्पादन वेळेवर व अपेक्षेनुरूप होत नाहीत. परिणामी कर्जबाजारीपणा ही समस्या शेवटपर्यंत सुटत नाही.भंडारा जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हा निसर्गाच्या पावसावर धानाची शेती करीत असतो. यातही बहुतांश शेतकºयांकडे विहिर किंवा बोरवेल किंवा अन्य जलस्त्रोतांचा अभाव असतो. परिणामी राज्य शासनाने जिल्हानिहाय लक्षांकाप्रमाणे गावांची निवड केलेली आहे.यात २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील ८६ गावे, २०१६-१७ मध्ये ५९ गावांची निवड केलेली होती.यानुसार २०१७-१८ अंतर्गतही जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सुधारित आराखड्याला मान्यता देण्यासाठी गावनिहाय प्रस्तावित कामांवर चर्चा करण्यात आली. यात यावर्षी १३८५ कामे करण्यात येणार असून ४० कोटी ३५ लक्ष ६७ हजार रूपयांचा निधीचा अंतिम आराखडा तयार करण्यात आलेला आहे.यासंदर्भात विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पुर्व विदर्भातील जलशिवाराची कामे सुरू आहेत.पावसाअभावी योजनेला ग्रहणराज्य शासनाने मोठा गाजावाजा करून जलयुक्त शिवार ही योजना सुरू केली. दोन वर्षांपासून जिल्ह्यातील जवळपास १४० गावांमध्ये कोट्यवधी रूपये खर्चून बांधकाम करण्यात आले. याचा बहुतांश शेतकºयांनी फायदाही घेतला. मात्र यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस बरसला नाही. पावसाने सरासरीही गाठली नसल्याने जलयुक्त शिवारांतर्गत खोदण्यात आलेल्या बोड्यांमध्ये पाणीच गोळा झाले नाही. परिणामी पावसाअभावी या योजनेला ग्रहण लागणार काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.