शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियानासाठी ४० कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:49 IST

शेतकरी सधन व समृद्ध व्हावा या महत्त्वाकांक्षी दृष्टिक्षेपातून राज्य शासनाने सन २०१५ पासून जलयुक्त शिवार ही संकल्पना राबविण्यास सुरूवात केली आहे.

ठळक मुद्दे१,३८५ कामांचा समावेश : गाव निहाय प्रस्तावांवर झाली चर्चा

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकरी सधन व समृद्ध व्हावा या महत्त्वाकांक्षी दृष्टिक्षेपातून राज्य शासनाने सन २०१५ पासून जलयुक्त शिवार ही संकल्पना राबविण्यास सुरूवात केली आहे. यात पुर्व विदर्भातील भंडारा जिल्हा माघारला असला तरी सन २०१७-१८ या वित्तीय वर्षात जलयुक्त शिवारांतर्गत सुधारित आराखडानुसार ४० कोटी ३५ लक्ष रूपयांचा निधी मिळणार आहे.भंडारा जिल्ह्यात मुख्यत: धान हे मुख्य पीक आहे. मात्र अस्मानी व सुल्तानी संकटामुळे धान उत्पादकांवर आर्थिक संकट कोसळत असते. बहुतांश वेळा शेतकरी सिंचन सुविधा उपलब्ध नसल्याने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलतात. याशिवाय सिंचन देऊनही पीक उत्पादन वेळेवर व अपेक्षेनुरूप होत नाहीत. परिणामी कर्जबाजारीपणा ही समस्या शेवटपर्यंत सुटत नाही.भंडारा जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हा निसर्गाच्या पावसावर धानाची शेती करीत असतो. यातही बहुतांश शेतकºयांकडे विहिर किंवा बोरवेल किंवा अन्य जलस्त्रोतांचा अभाव असतो. परिणामी राज्य शासनाने जिल्हानिहाय लक्षांकाप्रमाणे गावांची निवड केलेली आहे.यात २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील ८६ गावे, २०१६-१७ मध्ये ५९ गावांची निवड केलेली होती.यानुसार २०१७-१८ अंतर्गतही जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सुधारित आराखड्याला मान्यता देण्यासाठी गावनिहाय प्रस्तावित कामांवर चर्चा करण्यात आली. यात यावर्षी १३८५ कामे करण्यात येणार असून ४० कोटी ३५ लक्ष ६७ हजार रूपयांचा निधीचा अंतिम आराखडा तयार करण्यात आलेला आहे.यासंदर्भात विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पुर्व विदर्भातील जलशिवाराची कामे सुरू आहेत.पावसाअभावी योजनेला ग्रहणराज्य शासनाने मोठा गाजावाजा करून जलयुक्त शिवार ही योजना सुरू केली. दोन वर्षांपासून जिल्ह्यातील जवळपास १४० गावांमध्ये कोट्यवधी रूपये खर्चून बांधकाम करण्यात आले. याचा बहुतांश शेतकºयांनी फायदाही घेतला. मात्र यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस बरसला नाही. पावसाने सरासरीही गाठली नसल्याने जलयुक्त शिवारांतर्गत खोदण्यात आलेल्या बोड्यांमध्ये पाणीच गोळा झाले नाही. परिणामी पावसाअभावी या योजनेला ग्रहण लागणार काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.