शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
2
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
3
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
4
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
5
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
6
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
7
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
8
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
9
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
10
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
11
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
12
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
13
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
14
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
15
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
16
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
17
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
18
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
19
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
20
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व

नवीन संचमान्यतेमुळे भंडारा जिल्ह्यातील ३९ शाळा बंद पडण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 13:49 IST

ग्रामीण शाळांना फटका : तर अनेक शिक्षक होणार अतिरिक्त

राजू बांतेलोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : शाळांसाठी नवीन संरचनात्मक बदल करण्यात आले. संचमान्यतेत अन्यायकारक सुधारणा करण्यात आली. मात्र या सदोष संच मान्यतेमुळे गरीब व दुर्गम भागातील शाळांना शिक्षकच मिळणार नाहीत. यातून गरीब मुलांच्या शिक्षणाच्या मुळावर घाव घातला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे, २०२४-२५ संचमान्यता सुधारित करण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १५ मार्च २०२४ रोजी स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित आदी सर्व शाळांसाठी संच मान्यतेमध्ये सुधारित निकष जाहीर केले आहेत. त्यानुसार सर्व शाळांना २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात संचमान्यता उपलब्ध करून देण्यात आली. ही संच मान्यता ३० सप्टेंबर २०२४ रोजीच्या आधार वैध असणाऱ्या विद्यार्थी संख्येनुसार देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. माध्यमिक शाळांमध्ये दुर्गम डोंगराळ, आदिवासीबहुल भाग, ग्रामीण भागातील गोरगरीब, शेतकरी, कामगार व झोपडपट्टीत राहणाऱ्या पालकांची मुले मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहेत. या सदोष संचमान्यतेमुळे शाळांना शिक्षकच मिळणार नाहीत, अशी अवस्था निर्माण झाली आहे.

सहावी ते आठवी या तीन वर्गातील वीस पटसंख्येला किमान दोन शिक्षक मंजूर करून वीसपेक्षा जास्त विद्यार्थी संख्येला तीन शिक्षकांची पदे मंजूर करावी, अशी मागणी आहे. २२ मे मेपर्यंत संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे समायोजन २२ मेपर्यंत करण्यात यावे, असे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवले आहे. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन काम पूर्ण करण्याचे निर्देश आहेत.

संचमान्यतेत शून्य पदेनववी व दहावीपैकी एका वर्गाची पटसंख्या २० च्या आत असणाऱ्या शाळांच्या संचमान्यतेत इयत्ता नववी दहावीसाठी शून्य पदे दर्शविण्यात आली आहेत. त्यामुळे त्या शाळांचे शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. प्रत्येक वर्गाला १० पटसंख्येला किमान दोन शिक्षक मंजूर करा.

जिल्ह्यातील ३९ शाळांना धोकाभंडारा जिल्ह्यातील इयत्ता सहावी ते आठवीच्या २० पेक्षा पटसंख्या असणाऱ्या शाळांना सर्वाधिक धोका आहे. वीसपेक्षा कमी सहावी ते आठवी वर्गाची पटसंख्या असणाऱ्या शाळा १५ आहेत. तसेच माध्यमिक शाळा २४ असून त्या दोन्ही शाळांची संख्या ३९ होत आहे. अशा ३९ शाळा नवीन संचमान्यतेच्या निकषामुळे कायम बंद पडतील काय, अशी भीती वाटायला लागली आहे.

"ग्रामीण गरीब विद्यार्थ्यांच्या गावातल्या मराठी शाळेतील शिक्षणाची दारे बंद पडतील. गरीब विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन अन्यायकारक संचमान्यता सुधारित करावी."- राजकुमार बालपांडे, अध्यक्ष, भंडारा जिल्हा मुख्याध्यापक असोसिएशन

टॅग्स :bhandara-acभंडाराzp schoolजिल्हा परिषद शाळा