शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

३,४४७ शेतकऱ्यांना बसला श्वापदांचा फटका

By admin | Updated: March 22, 2015 01:36 IST

भंडारा वन विभागांतर्गत जिल्ह्यातील विविध वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतपिकांसह पशुधन व मानवहानी झालेल्या आहेत.

लोकमत रविवार विशेषदेवानंद नंदेश्वर  भंडाराभंडारा वन विभागांतर्गत जिल्ह्यातील विविध वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतपिकांसह पशुधन व मानवहानी झालेल्या आहेत. श्वापदांच्या पाच वर्षात नऊ व्यक्तींचा बळी तर १४७ मनुष्य जखमी, ३९२ पशुधन ठार तर ३,४४७ शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. पाच वर्षात नुकसानीपोटी भंडारा वनविभागाने ३,९९५ प्रकरणांत २ कोटी ३८ लाख ९२ हजार ७०० रूपयांचे नुकसान भरपाई वाटप केले आहे.सन २०१४- १५ मध्ये फेब्रुवारी महिन्यापर्यत श्वापदांनी केलेल्या शेतपिकांच्या नुकसान भरपाईचे ९६३ प्रकरण वनविभागाकडे आले. त्यात ५३ लाख ७ हजार ४६० रूपयांची नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे. श्वापदांंनी पशुधनावर हल्ला करून ८२ पशुधनाची हानी केली. त्या गोपालकांना ५ लाख १६ हजार ५६० रूपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. श्वापदांनी मनुष्यांवर हल्ला करून ४७ जणांना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी वनविभागाने १० लाख ८३ हजार २३० रूपयांची भरपाई कुटूंबियांना दिलीे. या वर्षात आतापर्यत १,०९२ प्रकरणांसाठी वन विभागाने ६९ लाख ०७ हजार २५० रूपयांचे नुकसान वाटप केले आहे.जिल्ह्यात सातही तालुक्यात जंगलाचा काही भाग येत आहे. या जंगलातील श्वापदे अन्नाच्या शोधात येत लगतच्या शेतात धुडगूस घालतात. या श्वापदांकडून शेतातील कोणत्याही एका भागातील पिकाचे नुकसान होते. नुकसान करून पळून जाताना ही श्वापदे शेतातील पिकच तुडवत असल्याचे चित्र आहे.सन २०१०-११ पासून फेब्रुवारी २०१५ या पाच वर्षाच्या दरम्यान श्वापदांनी मोठ्या प्रमाणात शेतपिक, पशुधन व मानवहानी केली आहे. भंडारा वन विभागात ३ हजार ९९५ प्रकरणांची नोंद करण्यात आलेली आहेत. त्यातील नुकसानग्रस्तांना २ कोटी ३८ लााख ९२ हजार ९२५ रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. यात शेतपिकांच्या नुकसानीपोटी १ कोटी ६१ लाख ४५ हजार ४० रुपए, पशुधनाच्या नुकसानीसाठी २६ लाख ६० हजार ९० रुपये, जखमी मनुष्यांना २९ लाख ८७ हजार ७९५ रुपए तर ठार झालेल्या नऊ व्यक्तींच्या कुटूंबियांना २१ लाखांचे वाटप करण्यात आले आहे. २०१०-११ मध्ये श्वापदांनी ८१ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान केले, ७७ पशुधन ठार, २७ जण जखमी तर दोघांचा बळी घेतला. वनविभागने १८७ प्रकरणात १६ लाख ९१ हजार ६८४ रूपयांचे नुकसान भरपाई वाटप केली. २०११-१२ मध्ये शेतपिकांची २२५ प्रकरणे, ९६ पशुधन ठार, ४३ जण जखमी तर तिघांचा मृत्यू झाला. ३६७ प्रकरणात वनविभागाने २७ लाख ६ हजार ८४७ रूपयांचे नुकसान भरपाई वाटप केले. सन २०१२-१३ मध्ये ७८६ शेतपिकांची नुकसानीसंबंधी प्रकरणे, ६४ पशुधन ठार, १६ जण जखमी तर तिघांचा बळी श्वापदांनी घेतला. या ८६९ प्रकरणात ४८ लाख २७ हजार ९५२ रूपयांचे नुकसान भरपाई वाटप करण्यात आले. २०१३-१४ मध्ये श्वापदांनी १ हजार ३९२ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान केले. ७३ पशुधन ठार, १४ जण जखमी तर एकाचा बळी घेतला. १ हजार ४८० प्रकरणात वनविभागने ७७ लाख ५९ हजार १९२ रूपयांची मदत दिली आहे.