शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

३३८ शाळांत महिला शिक्षिकाच नाहीत; कसे होणार समुपदेशन ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 11:42 IST

ग्रामीण, शहरी भागात स्थिती सारखीच : यंत्रणेकडून अंमलबजावणीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषद शाळा नेहमीच अग्रेसर असतात. १ लाख ९६ हजार ९८१ विद्यार्थी जिल्ह्यातील शाळेच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. यात विद्यार्थिनींची संख्याही मोठी आहे; मात्र शाळांची आणि विद्यार्थिनींची संख्या पाहता शाळांमध्ये शिक्षकांच्या तुलनेत महिला शिक्षक नसल्याने मुलींचे समुपदेशन कसे होणार, त्यांनी अडचण सांगायची तर कोणाला? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषद शाळा नेहमीच अग्रेसर असते. जिल्ह्यातील जि. प. शाळेच्या माध्यमातून दोन हजारांपेक्षा अधिक गुरुजी ज्ञानदानाचे काम करीत आहेत. जिल्ह्यात १२९७ शाळा आहेत. यात सुमारे इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत दोन लाख विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

विद्यार्थिनींची संख्याही ९५ हजार ६९० आहे. दरम्यान, शाळांमध्ये मुलींवरील अत्याचाराच्या घटनांनी राज्यात खळबळ उडाली आहे. शाळेत शिकत असताना शिक्षणाबरोबरच मुलींना विविध अडचणींचा सामोरे जावे लागते. मुळातच मुली लाजाळू असल्याने आपल्या अडचणी स्पष्ट सांगू शकत नाहीत. त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी महिला शिक्षक शाळेवर असणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्यातील ३३८ शाळांमध्ये महिला शिक्षिकाच नसल्याने मुलींनी अडचण सांगायची तर कोणाला अन् मुलींचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे. 

बहुतांश शाळांत महिला शिक्षकच नाहीत जिल्ह्यात १२९७ शाळा आहेत. मात्र, यात बहुतांश शाळांमध्ये महिला शिक्षक नसल्याने मुलींनी अडचण सांगायची तर कोणाला? असा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, बदलापूर येथील घटनेनंतर मुलींच्या संरक्षणासाठी शिक्षण विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत.

महिला शिक्षक केवळ ३३८ जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची आणि विद्यार्थिनींची संख्या पाहता १२९७ शाळांमध्ये केवळ ३३८ महिला शिक्षक कार्यरत आहेत. यातच अनेक शाळांवर एकापेक्षा अधिक महिला शिक्षक कार्यरत असल्याने इतर शाळांमध्ये मात्र मुलींना महिला शिक्षकांची प्रतीक्षाच आहे.

शाळामध्ये दोन लाख विद्यार्थी जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळेच्या माध्यमातून १ ली ते १२ वी पर्यंत १ लाख १ हजार २९१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर ९५ हजार ६९० विद्यार्थिनी शाळेतून धडे गिरवत आहेत.

कसे होणार मुलींचे समुपदेशन? 

  • ग्रामीण भागात जिपच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या सुमारे १२९७ शाळा आहेत. ग्रामीण भागातील गरिबांच्या मुलांच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. 
  • मात्र, शाळांतील मुलींच्या अडचणी समजून घेण्यासाठीची जबाबदारी महिला शिक्षकांनी घेणे आता गरजेचे झाले आहे. मात्र, शिक्षकांची संख्या पाहता महिला शिक्षकांची संख्या अत्यंत कमी आहे.

उपाययोजना 

  • बदलापूर येथील घटनेनंतर सर्व शाळांत मुलीच्या संरक्षणासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. 
  • तशा सूचनाही सर्व शाळांना दिल्या असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षकbhandara-acभंडारा