शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
2
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
3
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
4
विचारसरणी सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांवर भाजपने कारवाई करावी: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
5
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
6
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
7
यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
8
ईडीविरोधात तृणमूल संतप्त, खासदारांची दिल्लीत निदर्शने; ८ खासदार पोलिसांच्या घेतले ताब्यात
9
आम्ही जाणार नाही! चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ
10
सत्ताधाऱ्यांचे ‘विकासा’चे तर विरोधकांचे ‘बदल हवा’; ठाण्यात ठाकरे बंधू, भाजप-शिंदेसेनेचे बॅनर
11
राज्यात आचारसंहिता भंगाच्या १८६ तक्रारी, ८ कोटी जप्त केले; ३८ गुन्हे नोंदविण्यात आले
12
तीन वर्षांत किती बांगलादेशींना पकडून मायदेशी परत पाठवले? काँग्रेसचा सवाल; भाजपचा दावा फसवा
13
कारमध्ये १६ लाखांची रोकड; आचारसंहिता पथकाची कारवाई, पैसे कोठून आले? नवी मुंबईत कारवाई
14
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
15
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
16
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
17
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
18
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
19
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
20
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
Daily Top 2Weekly Top 5

३० कि.मी. अंतरावर १६ थांबे

By admin | Updated: March 6, 2015 00:59 IST

जलद व सुखकारक प्रवासाचा दावा करणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या तुमसर ते भंडारा ३० कि.मी. दरम्यान धावणाऱ्या जलद बसला १६ थांबे दिले आहे.

तुमसर : जलद व सुखकारक प्रवासाचा दावा करणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या तुमसर ते भंडारा ३० कि.मी. दरम्यान धावणाऱ्या जलद बसला १६ थांबे दिले आहे. याकरिता एक तासाचा प्रवास करावा लागतो. तुमसर ते भंडारा व नागपूर करिता जलद व सामान्य (लोकल) बसचे भाडे सारखेच आहे. जलद बसचा पहिला थांबा किमान ६० कि.मी. वर असावा असा नियम आहे. येथील जलद बसची गती केवळ ४० कि.मी. प्रती तास आहे.तुमसर ते भंडारा पर्यंत जलद बसचे १६ थांबे असल्याने गंतव्य स्थानापर्यंत पोहचण्यास किमान एक तासाचा अवधी लागतो. जलद बस तुमसरवरून सुटल्यावर खापा, मोहाडी येथील न्यायालयाजवळ, बसस्थानक, मोहाडी चौकात, कुशारी फाटा, चौंडेश्वरी माता फाटा, पोलीस ठाणे, मोहगाव देवी, पाचगाव फाटा, सनफ्लॅग फाटक, वरठी टी पॉइंट, भंडारा आयटीआय, लालबहादूर शास्त्री चौक, खामतलाव, राजीव गांधी चौक, त्रिमूर्ती चौक व शेवटी भंडारा बसस्थानक असे थांबे आहेत. तुमसर ते भंडारा सामान्य (लोकल) बसचे २२ ते २५ थांबे आहेत.जलद बसची गती महामंडळाने ५५ ते ६० इतकी निश्चित केली आहे. येथे ४० च्या वेगाने बस धावत आहे. नियमानुसार जलद बसगाड्यांचा थांबा ६० कि.मी. वर असतो. परंतु मोहाडी तालुक्याचे स्थळ व भंडारा जिल्ह्याचे स्थळ असल्याने दोन थांबेच पाहिजे. परंतु येथे नियमाला बगल दिली आहे. मोहगाव देवी येथे जलद बसचा थांबा विनंतीवरून दिला आहे. विभागीय कार्यालय भंडारा यांनी तसा आदेश दिला आहे.तुमसर नागपूर जलद बसचे भाडे १०७ रुपये व सामान्य (लोकल) चे बसभाडे १०७ रुपयेच आहे. तिकीट दर निश्चित करण्याचा अधिकार नागपूर विभागीय कार्यालयाला असल्याची माहिती आहे. एका वर्षाआधी तुमसर आगाराला वार्षिक साडे पाच लाखाचा नफा झाला होता. सध्या तो नफा साडेचार लाखावर आला आहे. तुमसर आगारात एकूण ७० बसगाड्या आहेत. या गाड्यांचा मेंटेनन्स बरोबर होत नाही. बसगाड्यात स्वच्छता नाही. बसण्याची व्यवस्था बिकट आहे. बॉडी अँगल शेवटचा श्वास घेत आहेत. येथे जुन्या बसगाड्या अति जलद व जलद गाड्या म्हणून धावत आहेत.केवळ लांब पल्ल्याच्या नवीन बस धावतात. तुमसर - परतवाडा, अकोला, माहूर, राजूरा या लांब पल्ल्याच्या बस आहेत. वाहकांची संख्या १२३, चालक १६७, वाहकांच्या रिक्त जागा १३ आहेत. वेळ जास्त लागणे व बसगाडे जास्त द्यावे लागत असल्याने येथील जलद गाड्यांना प्रवाशी भेटत नाही. येथे प्रवाशी खासगी गाड्यांचीच जाण्याला प्रथम प्राधान्य देतात. नियम सांगणारे महामंडळाने लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)