शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

जिल्ह्यातील ३०३ ग्रामपंचायती निर्मलग्राम

By admin | Updated: February 1, 2015 22:50 IST

नागरिकांची आरोग्य अबाधित राहावे व स्वच्छता राहावी या उद्दात हेतूने शासनाने अनेक योजनेची सुरुवात केली. ग्रामीण स्वच्छता अभियानातून निर्मलग्राम अभियान राबविले.

पुरुषोत्तम डोमळे - भंडारानागरिकांची आरोग्य अबाधित राहावे व स्वच्छता राहावी या उद्दात हेतूने शासनाने अनेक योजनेची सुरुवात केली. ग्रामीण स्वच्छता अभियानातून निर्मलग्राम अभियान राबविले. मात्र जिल्हयात प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. केंद्र शासनाने ग्रामीण भागातील स्वच्छतेसाठी सर्वप्रथम १९९९ मध्ये ग्रामीण स्वच्छता अभियान अमंलात आणले. या अभियानातुन जनजागृतीच्या माध्यमातुन स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचे काम झाले. १५ वर्षानंतर जिल्हयातील ५४२ पैकी २३९ ग्रामपंचायती कागदी घोडे रंगवून शासनाच्यायोजनेला ठेंगी दाखविल्या. कोट्यावधी रुपयांचा चुराडा होऊनही केवळ ३०३ ग्रामपंचायतीने निर्मलग्राम झाल्या. अभियानाला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने २००२ मध्ये संपुर्ण स्वच्छता अभियानाची सुरुवात झाली. २० आॅक्टोंबर २००४ पासुन जिल्हयात संपुर्ण अभियान स्वच्छता अंमलबजावणी झाली. आठ वर्षाच्या काळात या अभियानाचा फारसा प्रभाव न पडल्याने २०१२ पासुन निर्मल भारत अभियान राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. या अभियानात वैयक्तिक अंगणवाडी, शाळा शौचालये, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, परिसर स्वच्छता, स्वच्छ पाणी आदी उपक्रम राबविण्याचे शासनाचे धोरण होते. तसेच शौचालयासाठी १२०० रुपये अनुदान घेवून गाव हागणदारीमुक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न होता. मात्र जिल्हयातील फक्त ३०३ ग्रामपंचायती या अभियानात सहभागी होवून निर्मल ग्राम पुरस्कार पटकाविला.२३९ ग्रामपंचायती अभियानाला ठेंगा दाखविला. यात भंडारा तालुक्यातील ४०, मोहाडी २४, तुमसर ५६, लाखनी ४५, साकोली ३०, लाखांदूर २१ व पवनी तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. यावर्षी निर्मलग्राम पुरस्कारासाठी जिल्हयातील एकही ग्रामपंचायीची निवड झाली नाही. यामुळे शासनाच्या योजनेचा बोजवारा उडाला. गावकऱ्यांचे असहकार्य व प्रशासनाची अनास्था यासाठी कारणीभुत ठरली. योजनाच योजना जिकडे तिकडे अंमलबजावणी गेली कुणीकडे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.