शहरं
Join us  
Trending Stories
1
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
2
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
3
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
4
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
5
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
6
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
7
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
8
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
9
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
10
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
11
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
12
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
13
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
14
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
15
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
16
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
17
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
18
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
19
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
20
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

जिल्ह्यातील ३०३ ग्रामपंचायती निर्मलग्राम

By admin | Updated: February 1, 2015 22:50 IST

नागरिकांची आरोग्य अबाधित राहावे व स्वच्छता राहावी या उद्दात हेतूने शासनाने अनेक योजनेची सुरुवात केली. ग्रामीण स्वच्छता अभियानातून निर्मलग्राम अभियान राबविले.

पुरुषोत्तम डोमळे - भंडारानागरिकांची आरोग्य अबाधित राहावे व स्वच्छता राहावी या उद्दात हेतूने शासनाने अनेक योजनेची सुरुवात केली. ग्रामीण स्वच्छता अभियानातून निर्मलग्राम अभियान राबविले. मात्र जिल्हयात प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. केंद्र शासनाने ग्रामीण भागातील स्वच्छतेसाठी सर्वप्रथम १९९९ मध्ये ग्रामीण स्वच्छता अभियान अमंलात आणले. या अभियानातुन जनजागृतीच्या माध्यमातुन स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचे काम झाले. १५ वर्षानंतर जिल्हयातील ५४२ पैकी २३९ ग्रामपंचायती कागदी घोडे रंगवून शासनाच्यायोजनेला ठेंगी दाखविल्या. कोट्यावधी रुपयांचा चुराडा होऊनही केवळ ३०३ ग्रामपंचायतीने निर्मलग्राम झाल्या. अभियानाला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने २००२ मध्ये संपुर्ण स्वच्छता अभियानाची सुरुवात झाली. २० आॅक्टोंबर २००४ पासुन जिल्हयात संपुर्ण अभियान स्वच्छता अंमलबजावणी झाली. आठ वर्षाच्या काळात या अभियानाचा फारसा प्रभाव न पडल्याने २०१२ पासुन निर्मल भारत अभियान राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. या अभियानात वैयक्तिक अंगणवाडी, शाळा शौचालये, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, परिसर स्वच्छता, स्वच्छ पाणी आदी उपक्रम राबविण्याचे शासनाचे धोरण होते. तसेच शौचालयासाठी १२०० रुपये अनुदान घेवून गाव हागणदारीमुक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न होता. मात्र जिल्हयातील फक्त ३०३ ग्रामपंचायती या अभियानात सहभागी होवून निर्मल ग्राम पुरस्कार पटकाविला.२३९ ग्रामपंचायती अभियानाला ठेंगा दाखविला. यात भंडारा तालुक्यातील ४०, मोहाडी २४, तुमसर ५६, लाखनी ४५, साकोली ३०, लाखांदूर २१ व पवनी तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. यावर्षी निर्मलग्राम पुरस्कारासाठी जिल्हयातील एकही ग्रामपंचायीची निवड झाली नाही. यामुळे शासनाच्या योजनेचा बोजवारा उडाला. गावकऱ्यांचे असहकार्य व प्रशासनाची अनास्था यासाठी कारणीभुत ठरली. योजनाच योजना जिकडे तिकडे अंमलबजावणी गेली कुणीकडे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.