शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३०३ ग्रामपंचायती निर्मलग्राम

By admin | Updated: February 1, 2015 22:50 IST

नागरिकांची आरोग्य अबाधित राहावे व स्वच्छता राहावी या उद्दात हेतूने शासनाने अनेक योजनेची सुरुवात केली. ग्रामीण स्वच्छता अभियानातून निर्मलग्राम अभियान राबविले.

पुरुषोत्तम डोमळे - भंडारानागरिकांची आरोग्य अबाधित राहावे व स्वच्छता राहावी या उद्दात हेतूने शासनाने अनेक योजनेची सुरुवात केली. ग्रामीण स्वच्छता अभियानातून निर्मलग्राम अभियान राबविले. मात्र जिल्हयात प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. केंद्र शासनाने ग्रामीण भागातील स्वच्छतेसाठी सर्वप्रथम १९९९ मध्ये ग्रामीण स्वच्छता अभियान अमंलात आणले. या अभियानातुन जनजागृतीच्या माध्यमातुन स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचे काम झाले. १५ वर्षानंतर जिल्हयातील ५४२ पैकी २३९ ग्रामपंचायती कागदी घोडे रंगवून शासनाच्यायोजनेला ठेंगी दाखविल्या. कोट्यावधी रुपयांचा चुराडा होऊनही केवळ ३०३ ग्रामपंचायतीने निर्मलग्राम झाल्या. अभियानाला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने २००२ मध्ये संपुर्ण स्वच्छता अभियानाची सुरुवात झाली. २० आॅक्टोंबर २००४ पासुन जिल्हयात संपुर्ण अभियान स्वच्छता अंमलबजावणी झाली. आठ वर्षाच्या काळात या अभियानाचा फारसा प्रभाव न पडल्याने २०१२ पासुन निर्मल भारत अभियान राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. या अभियानात वैयक्तिक अंगणवाडी, शाळा शौचालये, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, परिसर स्वच्छता, स्वच्छ पाणी आदी उपक्रम राबविण्याचे शासनाचे धोरण होते. तसेच शौचालयासाठी १२०० रुपये अनुदान घेवून गाव हागणदारीमुक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न होता. मात्र जिल्हयातील फक्त ३०३ ग्रामपंचायती या अभियानात सहभागी होवून निर्मल ग्राम पुरस्कार पटकाविला.२३९ ग्रामपंचायती अभियानाला ठेंगा दाखविला. यात भंडारा तालुक्यातील ४०, मोहाडी २४, तुमसर ५६, लाखनी ४५, साकोली ३०, लाखांदूर २१ व पवनी तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. यावर्षी निर्मलग्राम पुरस्कारासाठी जिल्हयातील एकही ग्रामपंचायीची निवड झाली नाही. यामुळे शासनाच्या योजनेचा बोजवारा उडाला. गावकऱ्यांचे असहकार्य व प्रशासनाची अनास्था यासाठी कारणीभुत ठरली. योजनाच योजना जिकडे तिकडे अंमलबजावणी गेली कुणीकडे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.