भंडारा
नागरिकांना
खासगी
पाच
महिन्यांच्या कालावधीत नोंदणीचे ३0 टक्के उद्दिष्ट गाठता आले. संबंधितावर कारवाईस कुचराई करण्यात येत असल्याने प्रशासनाच्या गलथान कारभारावर प्रश्नचिन्ह लागले आहे. (शहर प्रतिनिधी) रुग्णालयात उपचार करण्यासाठी खर्च परवडत नसल्याने अनेकांना जीवही गमवावा लागतो. यामुळे केंद्र शासनाने २१ नोव्हेंबरला राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना सुरू केली. यात ९७१ शस्त्रक्रियांचा समावेश असून उपचारासाठी दीड लक्ष रूपये तर किडनी प्रत्यारोषणासाठी अडीच लक्ष रूपये देण्याची तरतूद आहे. एक लाख रूपयांच्या आत उत्पन्न असलेल्या पिवळी, केसरी रंगाच्या कार्डधारकांना तसेच अंत्योदय, अन्नपूर्णा लाभार्थी कुटुंबीयांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले. केंद्र शासनाने गाजावाजा करीत नागपूर येथे योजनेचा प्रारंभ केला. मात्र, जिल्ह्यात असलेल्या दोन लाख ३४ हजार कुटुंबाच्या उद्दिष्टापैकी केवळ ३0 टक्के म्ळणजे ७६ हजार कुटुंबांची नोंदणी करण्यात आल्याने जीवनदायी योजनेप्रती असलेली प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. आरोग्यसेवेचा लाभ मिळावा यासाठी शहरासह ग्रामीण भागात आरोग्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, शासकीय आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया तसेच उपचाराची सोय नसल्याने खासगी रुग्णालयाशिवाय पर्याय नसतो. : गरीब रुग्णांना आरोग्यदायी सेवा व शस्त्रक्रियेचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाने राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना अमलात आणली. जिल्ह्यातील २ लाख ३४ हजार ८१0 कुटुंबीयांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट्य शासनाने दिले. मात्र, प्रशासनाच्या अडेलतट्ट धोरणामुळे नोंदणीची प्रक्रिया कासवगतीने सुरू आहे. आजवर जवळपास ७६ हजार कुटुंबीयांची नोंदणी झाली. यामुळे नोंदणीच्या प्रतिक्षेत असलेल्या कुटुंबीयांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.