शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

धानक्षेत्रात यंदा 27 हजार हेक्टर वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 05:00 IST

भंडारा जिल्हा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. नामवंत जातीचा तांदूळ येथे प्रसिद्ध आहे. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र तीन लाख ४२ हजार ३०० हेक्टर असून, लागवडीलायक क्षेत्र दोन लाख सात हजार हेक्टर आहे. एक लाख ९१ हजार ६६४ हेक्टरवर गतवर्षी सर्व पिकांची लागवड झाली होती. जिल्ह्यात सरासरी १३३० मिमी पाऊस होतो.

ठळक मुद्देधानाशिवाय पर्याय नाही : दोन लाख १४ हजार हेक्टरवर होणार रोवणी

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नैसर्गिक संकटाचा कितीही सामना करावा लागला तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे धानपिकाशिवाय पर्याय नाही. विविध पिकांचे प्रयोग केल्यानंतरही शेतकरी काहीही झाले तरी धानाचीच निवड करीत असल्याचे दिसते. यंदा तर धानाच्या क्षेत्रात गतवर्षीपेक्षा २७ हजार हेक्टरने वाढ होणार आहे. गतवर्षी एक लाख ८७ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. यावर्षी दोन लाख १४ हजार हेक्टरवर धान लागवडीचे नियोजन आहे.भंडारा जिल्हा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. नामवंत जातीचा तांदूळ येथे प्रसिद्ध आहे. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र तीन लाख ४२ हजार ३०० हेक्टर असून, लागवडीलायक क्षेत्र दोन लाख सात हजार हेक्टर आहे. एक लाख ९१ हजार ६६४ हेक्टरवर गतवर्षी सर्व पिकांची लागवड झाली होती. जिल्ह्यात सरासरी १३३० मिमी पाऊस होतो. भातपिकाचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ८० हजार हेक्टर असून, यावर्षी यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसत आहे. धानपिकातून गत काही वर्षात शेतकऱ्यांच्या हातात काहीही उरत नाही. धान लागवडीपासून ते काढणीपर्यंत विविध समस्या आणि नैसर्गिक प्रकोपाचा सामना करावा लागतो. विक्रीसाठीही शेतकऱ्यांना प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. पणन महासंघ धानाची खरेदी करीत असले तरी वेळेवर पैसे मिळेल याची कोणतीही खात्री नसते. अनेक संकटे येऊनही शेतकरी मात्र दरवर्षी खरीप हंगाम आला की धानाचा विचार करताना दिसतो. अलीकडे भाजीपाला, सोयबीन, तूर पिकाचे क्षेत्र वाढत असले तरी शेतकऱ्यांचा कल मात्र परंपरागत धानपिकाकडे दिसून येतो. कृषी विभागाच्या नियोजनानुसार जिल्ह्यात दोन लाख २७ हजार ९१ हेक्टरवर पिकांची लागवड होणार आहे. त्यात भातपिकाचे क्षेत्र दोन लाख १३ हजार ८३७ हेक्टर, तूर ११ हजार ८५४ हेक्टर, सोयाबीन ६०० हेक्टर आणि कापूस ८०० हेक्टरवर लागवड केली जाणार आहे. शेतकरी सध्या मशागतीच्या कामात व्यस्त असून, नर्सरी तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. 

धानपिकालाच शेतकऱ्यांची पसंती- मुबलक पाऊस आणि सिंचनाची सुविधा असल्याने परंपरागत धानपिकालाच जिल्ह्यातील शेतकरी पसंती देताना दिसत आहेत. वर्षानुवर्ष धानाची शेती केली जात आहे. त्यामुळे नवीन पीकपद्धतीत फायदा होईल की नाही याची खात्री नसते. धानाबाबत खात्री असल्याने शेतकरी काहीही झाले तरी धान पिकवतो. नगदी पिकापेक्षा धानपीकच शेतकऱ्यांना महत्त्वाचे ठरते. प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याची गरज- जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पन्न घेतले जाते. तांदूळ निर्मिती हा प्रमुख घटक असला तरी धानापासून इतरही खाद्यपदार्थ तयार करता येतात. त्यासाठी प्रक्रिया उद्योगाची गरज आहे. जिल्ह्यात केवळ राइस मिल असून, तेथे धानापासून तांदूळ तयार केले जातात. परंतु पोहे, मुरमुरे व इतर खाद्यपदार्थ तयार करण्याचे उद्योग येथे सुरू झाल्यास शेतकऱ्यांना धानशेतीतून दोन पैसे उरण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती