शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

धानक्षेत्रात यंदा 27 हजार हेक्टर वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 05:00 IST

भंडारा जिल्हा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. नामवंत जातीचा तांदूळ येथे प्रसिद्ध आहे. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र तीन लाख ४२ हजार ३०० हेक्टर असून, लागवडीलायक क्षेत्र दोन लाख सात हजार हेक्टर आहे. एक लाख ९१ हजार ६६४ हेक्टरवर गतवर्षी सर्व पिकांची लागवड झाली होती. जिल्ह्यात सरासरी १३३० मिमी पाऊस होतो.

ठळक मुद्देधानाशिवाय पर्याय नाही : दोन लाख १४ हजार हेक्टरवर होणार रोवणी

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नैसर्गिक संकटाचा कितीही सामना करावा लागला तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे धानपिकाशिवाय पर्याय नाही. विविध पिकांचे प्रयोग केल्यानंतरही शेतकरी काहीही झाले तरी धानाचीच निवड करीत असल्याचे दिसते. यंदा तर धानाच्या क्षेत्रात गतवर्षीपेक्षा २७ हजार हेक्टरने वाढ होणार आहे. गतवर्षी एक लाख ८७ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. यावर्षी दोन लाख १४ हजार हेक्टरवर धान लागवडीचे नियोजन आहे.भंडारा जिल्हा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. नामवंत जातीचा तांदूळ येथे प्रसिद्ध आहे. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र तीन लाख ४२ हजार ३०० हेक्टर असून, लागवडीलायक क्षेत्र दोन लाख सात हजार हेक्टर आहे. एक लाख ९१ हजार ६६४ हेक्टरवर गतवर्षी सर्व पिकांची लागवड झाली होती. जिल्ह्यात सरासरी १३३० मिमी पाऊस होतो. भातपिकाचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ८० हजार हेक्टर असून, यावर्षी यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसत आहे. धानपिकातून गत काही वर्षात शेतकऱ्यांच्या हातात काहीही उरत नाही. धान लागवडीपासून ते काढणीपर्यंत विविध समस्या आणि नैसर्गिक प्रकोपाचा सामना करावा लागतो. विक्रीसाठीही शेतकऱ्यांना प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. पणन महासंघ धानाची खरेदी करीत असले तरी वेळेवर पैसे मिळेल याची कोणतीही खात्री नसते. अनेक संकटे येऊनही शेतकरी मात्र दरवर्षी खरीप हंगाम आला की धानाचा विचार करताना दिसतो. अलीकडे भाजीपाला, सोयबीन, तूर पिकाचे क्षेत्र वाढत असले तरी शेतकऱ्यांचा कल मात्र परंपरागत धानपिकाकडे दिसून येतो. कृषी विभागाच्या नियोजनानुसार जिल्ह्यात दोन लाख २७ हजार ९१ हेक्टरवर पिकांची लागवड होणार आहे. त्यात भातपिकाचे क्षेत्र दोन लाख १३ हजार ८३७ हेक्टर, तूर ११ हजार ८५४ हेक्टर, सोयाबीन ६०० हेक्टर आणि कापूस ८०० हेक्टरवर लागवड केली जाणार आहे. शेतकरी सध्या मशागतीच्या कामात व्यस्त असून, नर्सरी तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. 

धानपिकालाच शेतकऱ्यांची पसंती- मुबलक पाऊस आणि सिंचनाची सुविधा असल्याने परंपरागत धानपिकालाच जिल्ह्यातील शेतकरी पसंती देताना दिसत आहेत. वर्षानुवर्ष धानाची शेती केली जात आहे. त्यामुळे नवीन पीकपद्धतीत फायदा होईल की नाही याची खात्री नसते. धानाबाबत खात्री असल्याने शेतकरी काहीही झाले तरी धान पिकवतो. नगदी पिकापेक्षा धानपीकच शेतकऱ्यांना महत्त्वाचे ठरते. प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याची गरज- जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पन्न घेतले जाते. तांदूळ निर्मिती हा प्रमुख घटक असला तरी धानापासून इतरही खाद्यपदार्थ तयार करता येतात. त्यासाठी प्रक्रिया उद्योगाची गरज आहे. जिल्ह्यात केवळ राइस मिल असून, तेथे धानापासून तांदूळ तयार केले जातात. परंतु पोहे, मुरमुरे व इतर खाद्यपदार्थ तयार करण्याचे उद्योग येथे सुरू झाल्यास शेतकऱ्यांना धानशेतीतून दोन पैसे उरण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती