शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

वीज कोसळल्याने ४ वर्षात २६ जणांचा मृत्यू; १६ प्रस्तावांना मंजूरी केव्हा?

By युवराज गोमास | Updated: May 14, 2024 18:52 IST

जिल्ह्यात कोसळणारी वीज थांबणार कधी? : यंदा ११ जनावरांचा मृत्यू

भंडारा : जिल्ह्यात सन २०२२ ते २०२३ या कालावधीत वीज कोसळून २६ जणांचा जीव गेला. यंदा अवकाळीत जीवहानी झाली नसली तरी ११ जनावरांचा मृत्यू झाला. परंतु, जिल्ह्यात एकही ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्यावतीने यंदा सुधारीत १६ प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले. परंतु, अद्यापही मंजूरी मिळाली नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोसळणारी थांबणार तरी केव्हा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्ह्यात वीज कोसळून सर्वाधिक मृत्यू शेतशिवारात, मोकळ्या जागेत झाले आहेत. सध्या जिल्ह्यात अवकाळी वादळी पावसासह विजेच्या कडकडाटाने थैमान घातले आहे. यामुळे उन्हाळी धान पीक व भाजीपाला पीक संकटात सापडले आहेत. कुठे ना कुठे वीज कोसळण्याची चिन्हे दिसून येतात. घराबाहेर पडायची भीती नागरिकांत असते.

जिल्ह्यात २०२० मध्ये वीज कोसळून चार जणांचा बळी गेला. यात भंडारा, पवनी व तुमसर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. २०२१ मध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. यात भंडारा, तुमसर तालुक्यातील प्रत्येकी एक, तर मोहाडी तालुक्यातील चार जणांचा समावेश आहे. २०२२ मध्ये १४ जणांचा मृत्यू झाला. यात भंडारा एक, पवनी तीन, तर तुमसर तालुक्यातील दोघांचा समावेश आहे.

काय आहे वीज अटकाव यंत्रणा?

शहरातील सर्वाधिक उंच इमारतीवर वीज अटकाव यंत्रणा कार्यन्वित केली जाते. ही यंत्रणा १०० मीटर परिसरात वीज कोसळण्यास अटकाव करते; परंतु यासाठी लाखोंचा खर्च येतो. जिल्ह्यात अशी यंत्रणा कुठेही नाही.

सुधारीत प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

जिल्ह्यात वीज अटकाव यंत्रणा कार्यन्वित करण्यासंबंधीचे सुधारीत १६ प्रस्ताव जिल्हा आपत्ती व्यवस्थापच्यावतीने शासनाकडे पाठविले आहेत. यापूर्वी २०१७ मध्ये यासंबंधीचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते; परंतु कुठेही प्रश्न निकाली निघाला नाही.

जिल्ह्यात एकही यंत्रणा कार्यान्वित नाही

जिल्ह्यात १३३० मिलिमीटर पाऊस होतो. सध्या विजेच्या कडकडाटासह अवकाळी मुसळधार पाऊस कोसळत आहे. विजेच्या धक्क्याने चार वर्षांत २६ जणांचा बळी गेला. परंतु, अद्यापही वीज अटकाव यंत्रणा एकाही ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांत सातत्याने भीतीचे वातावरण पाहावयास मिळते.

मृताच्या कुटुंबियांना मिळणारी मदतशासनाच्यावतीने मृत्यू पावलेल्याच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत दिली जाते. ४० ते ६० टक्के अपंगत्वासाठी यापूर्वी ५९,१०० तर आता ७४ हजार, ६० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्वासाठी पूर्वी दोन लाख तर आता २.५० लाख, एक आठवड्यापेक्षा जास्त काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यास पूर्वी १२,७०० तर आता १६ हजार व त्यापेक्षा कमी काळ उपचारासाठी पूर्वी ४,३०० तर आता ५४०० रुपयांची मदत दिली जाते.

जिल्ह्यात वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित करण्यासंबंधीचे १६ सुधारीत प्रस्ताव शासनाकडे पाठविले आहेत. सध्या विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होत आहे. नागरिकांनी मोकळ्या मैदानात व पावसात थांबू नये. दामिनी ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन माहिती घ्यावी.- अभिषेक नामदास, प्रमुख आपत्ती व्यवस्थापन, भंडारा. वीज पडून झालेले मृत्यू

वर्ष                मृत्यू संख्या

२०२४                ००२०२३                ०२

२०२२                १४२०२१                ०६

२०२०                ०४

टॅग्स :bhandara-acभंडाराDeathमृत्यू