शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पाणी...देता का पाणी... २१ गावांतील २५ हजार नागरिक तहानलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 14:46 IST

सध्या प्रत्येक गावाची लोकसंख्या वाढलेली असून चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ झाला तरी जिल्हा परिषदेने अजूनपर्यंत फिल्टर प्लांट लावलेला नाही तसेच या योजनेचे नूतनीकरण केले नाही.

ठळक मुद्देचार दशकांपासून नळ योजनेची कामे अपूर्ण आदिवासीबहुल गावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

मोहन भोयर

तुमसर (भंडारा) : बावनथडीच्या पाथरीघाट येथे गोबरवाही ग्रामीण प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सन १९८० मध्ये सुरू करण्यात आली. तेव्हापासून भंडारा जिल्हा परिषदतर्फे सदर योजना सुरू आहे, परंतु आदिवासीबहुल अनेक गावांत या योजनेच्या अंतर्गत पाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. सुमारे २१ गावांतील २५ हजार नागरिक अद्याप तहानलेले असून प्रशासनाविरुद्ध त्यांच्यात रोष दिसत आहे. कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने येथे सुरू झाली नसून मागील चार दशकांपासून त्यांना अद्यापही पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.

परिसरातील पाणीपुरवठा योजनेत नाका डोंगरी, चिखला, सीता सावंगी व गोबरवाही या चार गावांचा नव्या योजनेत समावेश होता. त्यानंतर राजापूर, सुंदर टोला, पवनारखारी, हमेशा, गणेशपूर या गावांनाही येथील जलकुंभातून पाणी वितरित करण्यात येत होते. चार गावांकरिता असलेले नळ योजना सध्या सात गावांना पाणीपुरवठा करीत आहे.

सध्या प्रत्येक गावाची लोकसंख्या वाढलेली असून चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ झाला तरी जिल्हा परिषदेने अजूनपर्यंत फिल्टर प्लांट लावलेला नाही तसेच या योजनेचे नूतनीकरण केले नाही. त्यामुळे पावसाळा असो की हिवाळा येथील ग्रामस्थांना आठवड्यातून केवळ चार दिवसच केवळ एक वेळ पाणी मिळत आहे. पाणी कर हा वर्षभर घेतला जातो. केवळ चार ते पाच गावांना दोन ते तीन महिने या पाणी पुरवठा योजनेतून पाणी मिळाले. इतर गावांना पाणी पोचू शकले नाही. मागील चार वर्षांपासून ही योजना बंद पडली आहे. काही महिन्यापूर्वी खासदारांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाने दिशा समितीची बैठक घेतली होती. सदर बैठकीत सेवानिवृत्त खंडविकास अधिकारी डॉ. शांताराम चाफले यांनी सदर योजनेच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

मूलभूत सोयीसुविधांचा अभाव

आदिवासीबहुल असलेल्या परिसरात भूषण जलसंकट निर्माण होत असताना अजूनपर्यंत प्रशासनाने कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेला गती दिलेले नाही. त्यामुळे उन्हाळ्यात येथील नागरिकांना रात्री जीव धोक्यात घालून शेतावरील विहिरीतून पाणी आणावे लागते. गाव खेड्यातील महिला रणरणत्या उन्हातही दिवसा पाणी आणताना दिसतात. स्थानिक स्वराज्य संस्थेचे मुख्य कार्य हे नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे असले तरी मात्र येथे तसे होताना दिसत नाही.

टॅग्स :Waterपाणीtumsar-acतुमसरRural Developmentग्रामीण विकास