शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

पाणी...देता का पाणी... २१ गावांतील २५ हजार नागरिक तहानलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 14:46 IST

सध्या प्रत्येक गावाची लोकसंख्या वाढलेली असून चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ झाला तरी जिल्हा परिषदेने अजूनपर्यंत फिल्टर प्लांट लावलेला नाही तसेच या योजनेचे नूतनीकरण केले नाही.

ठळक मुद्देचार दशकांपासून नळ योजनेची कामे अपूर्ण आदिवासीबहुल गावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

मोहन भोयर

तुमसर (भंडारा) : बावनथडीच्या पाथरीघाट येथे गोबरवाही ग्रामीण प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सन १९८० मध्ये सुरू करण्यात आली. तेव्हापासून भंडारा जिल्हा परिषदतर्फे सदर योजना सुरू आहे, परंतु आदिवासीबहुल अनेक गावांत या योजनेच्या अंतर्गत पाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. सुमारे २१ गावांतील २५ हजार नागरिक अद्याप तहानलेले असून प्रशासनाविरुद्ध त्यांच्यात रोष दिसत आहे. कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने येथे सुरू झाली नसून मागील चार दशकांपासून त्यांना अद्यापही पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.

परिसरातील पाणीपुरवठा योजनेत नाका डोंगरी, चिखला, सीता सावंगी व गोबरवाही या चार गावांचा नव्या योजनेत समावेश होता. त्यानंतर राजापूर, सुंदर टोला, पवनारखारी, हमेशा, गणेशपूर या गावांनाही येथील जलकुंभातून पाणी वितरित करण्यात येत होते. चार गावांकरिता असलेले नळ योजना सध्या सात गावांना पाणीपुरवठा करीत आहे.

सध्या प्रत्येक गावाची लोकसंख्या वाढलेली असून चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ झाला तरी जिल्हा परिषदेने अजूनपर्यंत फिल्टर प्लांट लावलेला नाही तसेच या योजनेचे नूतनीकरण केले नाही. त्यामुळे पावसाळा असो की हिवाळा येथील ग्रामस्थांना आठवड्यातून केवळ चार दिवसच केवळ एक वेळ पाणी मिळत आहे. पाणी कर हा वर्षभर घेतला जातो. केवळ चार ते पाच गावांना दोन ते तीन महिने या पाणी पुरवठा योजनेतून पाणी मिळाले. इतर गावांना पाणी पोचू शकले नाही. मागील चार वर्षांपासून ही योजना बंद पडली आहे. काही महिन्यापूर्वी खासदारांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाने दिशा समितीची बैठक घेतली होती. सदर बैठकीत सेवानिवृत्त खंडविकास अधिकारी डॉ. शांताराम चाफले यांनी सदर योजनेच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

मूलभूत सोयीसुविधांचा अभाव

आदिवासीबहुल असलेल्या परिसरात भूषण जलसंकट निर्माण होत असताना अजूनपर्यंत प्रशासनाने कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेला गती दिलेले नाही. त्यामुळे उन्हाळ्यात येथील नागरिकांना रात्री जीव धोक्यात घालून शेतावरील विहिरीतून पाणी आणावे लागते. गाव खेड्यातील महिला रणरणत्या उन्हातही दिवसा पाणी आणताना दिसतात. स्थानिक स्वराज्य संस्थेचे मुख्य कार्य हे नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे असले तरी मात्र येथे तसे होताना दिसत नाही.

टॅग्स :Waterपाणीtumsar-acतुमसरRural Developmentग्रामीण विकास