शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

पाणी...देता का पाणी... २१ गावांतील २५ हजार नागरिक तहानलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 14:46 IST

सध्या प्रत्येक गावाची लोकसंख्या वाढलेली असून चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ झाला तरी जिल्हा परिषदेने अजूनपर्यंत फिल्टर प्लांट लावलेला नाही तसेच या योजनेचे नूतनीकरण केले नाही.

ठळक मुद्देचार दशकांपासून नळ योजनेची कामे अपूर्ण आदिवासीबहुल गावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

मोहन भोयर

तुमसर (भंडारा) : बावनथडीच्या पाथरीघाट येथे गोबरवाही ग्रामीण प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सन १९८० मध्ये सुरू करण्यात आली. तेव्हापासून भंडारा जिल्हा परिषदतर्फे सदर योजना सुरू आहे, परंतु आदिवासीबहुल अनेक गावांत या योजनेच्या अंतर्गत पाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. सुमारे २१ गावांतील २५ हजार नागरिक अद्याप तहानलेले असून प्रशासनाविरुद्ध त्यांच्यात रोष दिसत आहे. कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने येथे सुरू झाली नसून मागील चार दशकांपासून त्यांना अद्यापही पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.

परिसरातील पाणीपुरवठा योजनेत नाका डोंगरी, चिखला, सीता सावंगी व गोबरवाही या चार गावांचा नव्या योजनेत समावेश होता. त्यानंतर राजापूर, सुंदर टोला, पवनारखारी, हमेशा, गणेशपूर या गावांनाही येथील जलकुंभातून पाणी वितरित करण्यात येत होते. चार गावांकरिता असलेले नळ योजना सध्या सात गावांना पाणीपुरवठा करीत आहे.

सध्या प्रत्येक गावाची लोकसंख्या वाढलेली असून चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ झाला तरी जिल्हा परिषदेने अजूनपर्यंत फिल्टर प्लांट लावलेला नाही तसेच या योजनेचे नूतनीकरण केले नाही. त्यामुळे पावसाळा असो की हिवाळा येथील ग्रामस्थांना आठवड्यातून केवळ चार दिवसच केवळ एक वेळ पाणी मिळत आहे. पाणी कर हा वर्षभर घेतला जातो. केवळ चार ते पाच गावांना दोन ते तीन महिने या पाणी पुरवठा योजनेतून पाणी मिळाले. इतर गावांना पाणी पोचू शकले नाही. मागील चार वर्षांपासून ही योजना बंद पडली आहे. काही महिन्यापूर्वी खासदारांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाने दिशा समितीची बैठक घेतली होती. सदर बैठकीत सेवानिवृत्त खंडविकास अधिकारी डॉ. शांताराम चाफले यांनी सदर योजनेच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

मूलभूत सोयीसुविधांचा अभाव

आदिवासीबहुल असलेल्या परिसरात भूषण जलसंकट निर्माण होत असताना अजूनपर्यंत प्रशासनाने कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेला गती दिलेले नाही. त्यामुळे उन्हाळ्यात येथील नागरिकांना रात्री जीव धोक्यात घालून शेतावरील विहिरीतून पाणी आणावे लागते. गाव खेड्यातील महिला रणरणत्या उन्हातही दिवसा पाणी आणताना दिसतात. स्थानिक स्वराज्य संस्थेचे मुख्य कार्य हे नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे असले तरी मात्र येथे तसे होताना दिसत नाही.

टॅग्स :Waterपाणीtumsar-acतुमसरRural Developmentग्रामीण विकास