शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

ग्रामज्योती योजनेचा २५ कोटींचा आराखडा मंजूर

By admin | Updated: February 21, 2016 00:24 IST

केंद्र सरकार ग्रामीण भागातील वीजविषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना राबवीत आहे.

जिल्हा विद्युत समितीच्या बैठकीत निर्णय : दीनदयाल उपाध्याय योजनेतून ग्रामीण विद्युतीकरणावर भर भंडारा : केंद्र सरकार ग्रामीण भागातील वीजविषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी  दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना राबवीत आहे.  या योजनेंतर्गत कृषी ग्राहकांना नियमित वीज पुरवठा, अकृषक ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा, वितरण बळकटीकरण व वृद्धीकरण, तांत्रिक व व्यावसायिक वीज हानी कमी करणे,  या बाबींसाठी २५.५ कोटी रूपयांच्या पायाभूत विकास आराखड्यास जिल्हा विद्युत समितीने मंजुरी दिली आहे.खा. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विद्युत समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, आ.अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी धीरजकुमार, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी उपस्थित होते. या योजनेंतर्गत गावठाण फीडर विलगीकरणासाठी चार वाहिन्या प्रास्तावित असून त्यासाठी ५.२६ कोटी रूपये,  वितरण व्यवस्थेसाठी २४९ किलोमीटरच्या उच्चदाब वाहिन्या, ६१.४८ किलोमीटरच्या लघुदाब वाहिन्या, आणि १०० के.व्ही.ए.चे  ६५ नवीन रोहित्रांसाठी  १७.४८ कोटी रूपयांची तरतूद, दारिद्रय रेषेखालील ३,७६५ कुटुंबाना वीज जोडणीसाठी २.४ कोटी रूपये,  सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी २७ लाख रूपयांची  तरतूद या आराखड्यात करण्यात आली आहे. सर्व शेतकऱ्यांना कृषी पंपाची जोडणी, सर्वांना वीज, आणि अखंड व योग्य दाबाने वीज पुरवठा अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार ही योजना राबवित आहे. त्यामुळे या आराखड्यातील कामे तात्काळ सुरू करावे, असे खासदार नाना पटोले यांनी सांगितले. ज्या गावांमधून  किंवा  शेतामधून उच्च दाब वीज वाहिन्या गेल्या असतील त्या बदलण्यासाठी  प्रस्ताव तयार करा, अशी सुचना खासदार नाना पटोले यांनी यावेळी केली. डिसेंबर २०१५ पर्यंतचे कृषी पंपासाठी पेंडिंग प्रकरणे जून २०१६ पर्यंत पूर्ण  होतील. तसेच सोलर पंपासाठी १९५ लक्षांक असून १६ अर्ज आतापर्यंत समितीने मंजूर केले आहेत,  अशी माहिती अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी बैठकीत दिली. ग्राहकांच्या  तक्रारीसाठी तीन महिन्यातून एकदा ग्राहक तक्रार निवारण समितीची बैठक घ्यावी, अशी सूचना आमदार अवसरे यांनी केली. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना वीज जोडणीला प्राधान्य द्यावे आणि गोसेखुर्द प्रकल्पातील पुर्नवसित गावांमध्ये वीज जोडणीसाठी शिबिर घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली. (नगर प्रतिनिधी)