शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

२३,७४२ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

By admin | Updated: March 3, 2015 00:29 IST

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उद्या ३ मार्चपासून सुरू होत आहे. जिल्हयातील

आजपासून परीक्षा- कॉपीमुक्त अभियानासाठी ४० भरारी पथकाची नियुक्तीभंडारा : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उद्या ३ मार्चपासून सुरू होत आहे. जिल्हयातील ३०३ शाळांमधील विद्यार्थी ८८ परिक्षा केंद्रावर ही परिक्षा देत आहे. परिक्षेसाठी २० हजार ५५६ नियमित विद्यार्थी बसणार आहेत. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी बैठे पथकांसह ४० भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक परीक्षेदरम्यान केंद्रांवर होणारी कॉपी व अनुचित कार्यावर करडी नजर ठेवणार आहेत. विभागिय शिक्षण मंडळाच्या दिशानिर्देशानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभाग दहावीच्या परिक्षेसाठी सज्ज झाला आहे. भंडारा जिल्हा परिषदचे शिक्षाधिकारी किसन शेंडे म्हणाले, मागील वर्षीप्रमाणे दहावीची परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र प्रमुख, अतिरिक्त केंद्र प्रमुख तथा परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकार थांबविण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात राहील. परीक्षा केंद्रापासून १०० मीटरपर्यत प्रतिबंधीत क्षेत्र व या क्षेत्रात संचालित झेराक्स केंद्र बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हास्तरावर कॉपीमुक्त अभियान यशस्वीतेसाठी विद्यार्थी व पालकांमध्ये जनजागृती करण्यात आली. जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांसाठी २७ भरारी पथकाची आवश्यकता आहे. मात्र, शिक्षण विभाग व दक्षता समितीने ४० भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. पथकात जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, राजस्व प्रमुख, तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, नगरपरिषदचे मुख्याधिकारी व अन्य ३ सदस्यांचा समावेश आहे. तालुकास्तरावर बैठे पथकाची चमू स्थापित करण्यात आली आहे. यात तीन जणांची नियुक्ती केली आहे. (शहर प्रतिनिधी)२३,७४२ विद्यार्थी देणार परीक्षा जिल्ह्यात दहावीच्या परिक्षेसासाठी ८८ परीक्षा केंद्र आहेत. यावर्षी २३,७४२ विद्यार्थी परिक्षेला बसणार आहेत. यात २०,५५७ विद्यार्थी नियमित आणि ३,१८५ पूर्नरपरीक्षार्थीचा समावेश आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून परिक्षेची तयारी पुर्ण करण्यात आली आहे.दक्षता समिती बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशया संदर्भात दक्षता समितीची बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत ८८ परीक्षा केंद्रावरील परिसर स्वच्छ ठेवावा. विद्यार्थ्यांची तपासणी करूनच विद्यार्थ्यांना परीक्षा खोलीत प्रवेश देण्यात यावा. विद्यार्थीनींची तपासणी महिला शिक्षकांमार्फत करावी. परीक्षेचे कामकाज करण्याकरिता नियुक्त केलेल्या व्यक्तीशिवाय परीक्षा केंद्रावर इतर व्यक्ती उपस्थित राहणार नाहीत, यांची काळजी घ्यावी. बैठे पथकांनी परीक्षा कालावधी दरम्यान बसून न राहता परिक्षेदरम्यान अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. परीक्षा केंद्राच्या परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधी दरम्यान बंद ठेवण्यात यावे. पाणी वाटपासाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचीच नेमणूक करण्यात यावी. परिक्षांचे संचालन सुयोग्य प्रकारे व्हावे, परीक्षा गैरप्रकार होऊ नयेत, परीक्षा शांततामय वातावरण व परीक्षार्थ्यांना भयमुक्त व तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता आली पाहिजे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.