शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
4
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
5
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
6
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
7
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
8
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
9
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
10
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
11
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
12
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
13
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
14
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
15
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
16
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
17
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
18
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग
19
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
20
Social Viral: बीडच्या ZP शाळेचा पॅटर्न: मधल्या सुट्टीत सुलेखन आणि रंगोळीचे प्रशिक्षण, सरपंचांचेही पाठबळ!

२३,७४२ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

By admin | Updated: March 3, 2015 00:29 IST

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उद्या ३ मार्चपासून सुरू होत आहे. जिल्हयातील

आजपासून परीक्षा- कॉपीमुक्त अभियानासाठी ४० भरारी पथकाची नियुक्तीभंडारा : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उद्या ३ मार्चपासून सुरू होत आहे. जिल्हयातील ३०३ शाळांमधील विद्यार्थी ८८ परिक्षा केंद्रावर ही परिक्षा देत आहे. परिक्षेसाठी २० हजार ५५६ नियमित विद्यार्थी बसणार आहेत. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी बैठे पथकांसह ४० भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक परीक्षेदरम्यान केंद्रांवर होणारी कॉपी व अनुचित कार्यावर करडी नजर ठेवणार आहेत. विभागिय शिक्षण मंडळाच्या दिशानिर्देशानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभाग दहावीच्या परिक्षेसाठी सज्ज झाला आहे. भंडारा जिल्हा परिषदचे शिक्षाधिकारी किसन शेंडे म्हणाले, मागील वर्षीप्रमाणे दहावीची परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र प्रमुख, अतिरिक्त केंद्र प्रमुख तथा परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकार थांबविण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात राहील. परीक्षा केंद्रापासून १०० मीटरपर्यत प्रतिबंधीत क्षेत्र व या क्षेत्रात संचालित झेराक्स केंद्र बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हास्तरावर कॉपीमुक्त अभियान यशस्वीतेसाठी विद्यार्थी व पालकांमध्ये जनजागृती करण्यात आली. जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांसाठी २७ भरारी पथकाची आवश्यकता आहे. मात्र, शिक्षण विभाग व दक्षता समितीने ४० भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. पथकात जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, राजस्व प्रमुख, तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, नगरपरिषदचे मुख्याधिकारी व अन्य ३ सदस्यांचा समावेश आहे. तालुकास्तरावर बैठे पथकाची चमू स्थापित करण्यात आली आहे. यात तीन जणांची नियुक्ती केली आहे. (शहर प्रतिनिधी)२३,७४२ विद्यार्थी देणार परीक्षा जिल्ह्यात दहावीच्या परिक्षेसासाठी ८८ परीक्षा केंद्र आहेत. यावर्षी २३,७४२ विद्यार्थी परिक्षेला बसणार आहेत. यात २०,५५७ विद्यार्थी नियमित आणि ३,१८५ पूर्नरपरीक्षार्थीचा समावेश आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून परिक्षेची तयारी पुर्ण करण्यात आली आहे.दक्षता समिती बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशया संदर्भात दक्षता समितीची बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत ८८ परीक्षा केंद्रावरील परिसर स्वच्छ ठेवावा. विद्यार्थ्यांची तपासणी करूनच विद्यार्थ्यांना परीक्षा खोलीत प्रवेश देण्यात यावा. विद्यार्थीनींची तपासणी महिला शिक्षकांमार्फत करावी. परीक्षेचे कामकाज करण्याकरिता नियुक्त केलेल्या व्यक्तीशिवाय परीक्षा केंद्रावर इतर व्यक्ती उपस्थित राहणार नाहीत, यांची काळजी घ्यावी. बैठे पथकांनी परीक्षा कालावधी दरम्यान बसून न राहता परिक्षेदरम्यान अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. परीक्षा केंद्राच्या परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधी दरम्यान बंद ठेवण्यात यावे. पाणी वाटपासाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचीच नेमणूक करण्यात यावी. परिक्षांचे संचालन सुयोग्य प्रकारे व्हावे, परीक्षा गैरप्रकार होऊ नयेत, परीक्षा शांततामय वातावरण व परीक्षार्थ्यांना भयमुक्त व तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता आली पाहिजे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.