शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War: भारत - पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारतेय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
2
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
3
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
4
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
5
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
6
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
7
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
8
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
9
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
10
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
11
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
12
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
13
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
14
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
15
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
16
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
17
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
18
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
19
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
20
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

२३५ शेतकरी आत्महत्या मदतीस अपात्र

By admin | Updated: February 25, 2015 01:12 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे सततची नापिकी व वाढणाऱ्या कर्जाच्या डोंगरामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी न होता वाढतच असून, ...

देवानंद नंदेश्वर भंडारानिसर्गाच्या लहरीपणामुळे सततची नापिकी व वाढणाऱ्या कर्जाच्या डोंगरामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी न होता वाढतच असून, गत १५ वर्षात भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत ३६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र शासनाच्या निकषावर यातील २३५ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या आहेत.शेतात केलेला लागवडीचा खर्च. हाती आलेले उत्पन्न आणि मिळणारा दर. यात प्रचंड तफावत असून, यासोबतच सिंचनाअभावी बारमाही पीक घेता येत नाही, शेतीला जोडधंदा नसल्याने हातात पैसा खेळत नाही. परिणामी, वाट्याला आलेल्या कर्जबाजारीपणामुळे आलेल्या नैराश्यापोटीच जीवनाचा डाव हरलो, या भावनेपोटी जिल्ह्यात मागील १५ वर्षात ३६१ शेतकऱ्यांनी सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी राज्य शासनाच्या निकषाप्रमाणे पात्र ठरलेल्या १२२ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली. २३५ शेतकऱ्यांचा मृत्यू आजारपणा, व्यसनाधिनता, अपघात, बेरोजगारी, घरगुती भांडण आदी कारणांमुळे झाला असल्याचे निष्कर्ष शासनाकडून लावण्यात आले. यामुळे अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत नाकारण्यात आलेली आहे.जानेवारी २०१५ मध्ये शेतकऱ्यांच्या तीन आत्महत्या झाल्या आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली नाही. त्यांना मदतीसंदर्भात लवकरच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.२०१४ मध्ये २४ प्रकरणे अपात्र नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे अन्नदाता शेतकरी कंगाल झाला. भिकेला लागला. यामुळे आत्महत्येचे सत्र सुरु आहे. २०१४ जानेवारी ते डिसेंबर या वर्षभरात जिल्ह्यात ३६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या नोंदविल्या गेल्या. यापैकी ११ प्रकरणं पात्र ठरुन त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली. तर २४ प्रकरणं अपात्र ठरली; मात्र विविध कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे एक प्रकरणं लालफितशाहीत अडकली असून, शासन दरबारी प्रलंबित आहेत.