शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

२३५ शेतकरी आत्महत्या मदतीस अपात्र

By admin | Updated: February 25, 2015 01:12 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे सततची नापिकी व वाढणाऱ्या कर्जाच्या डोंगरामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी न होता वाढतच असून, ...

देवानंद नंदेश्वर भंडारानिसर्गाच्या लहरीपणामुळे सततची नापिकी व वाढणाऱ्या कर्जाच्या डोंगरामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी न होता वाढतच असून, गत १५ वर्षात भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत ३६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र शासनाच्या निकषावर यातील २३५ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या आहेत.शेतात केलेला लागवडीचा खर्च. हाती आलेले उत्पन्न आणि मिळणारा दर. यात प्रचंड तफावत असून, यासोबतच सिंचनाअभावी बारमाही पीक घेता येत नाही, शेतीला जोडधंदा नसल्याने हातात पैसा खेळत नाही. परिणामी, वाट्याला आलेल्या कर्जबाजारीपणामुळे आलेल्या नैराश्यापोटीच जीवनाचा डाव हरलो, या भावनेपोटी जिल्ह्यात मागील १५ वर्षात ३६१ शेतकऱ्यांनी सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी राज्य शासनाच्या निकषाप्रमाणे पात्र ठरलेल्या १२२ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली. २३५ शेतकऱ्यांचा मृत्यू आजारपणा, व्यसनाधिनता, अपघात, बेरोजगारी, घरगुती भांडण आदी कारणांमुळे झाला असल्याचे निष्कर्ष शासनाकडून लावण्यात आले. यामुळे अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत नाकारण्यात आलेली आहे.जानेवारी २०१५ मध्ये शेतकऱ्यांच्या तीन आत्महत्या झाल्या आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली नाही. त्यांना मदतीसंदर्भात लवकरच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.२०१४ मध्ये २४ प्रकरणे अपात्र नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे अन्नदाता शेतकरी कंगाल झाला. भिकेला लागला. यामुळे आत्महत्येचे सत्र सुरु आहे. २०१४ जानेवारी ते डिसेंबर या वर्षभरात जिल्ह्यात ३६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या नोंदविल्या गेल्या. यापैकी ११ प्रकरणं पात्र ठरुन त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली. तर २४ प्रकरणं अपात्र ठरली; मात्र विविध कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे एक प्रकरणं लालफितशाहीत अडकली असून, शासन दरबारी प्रलंबित आहेत.