शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

२३५ शेतकरी आत्महत्या मदतीस अपात्र

By admin | Updated: February 25, 2015 01:12 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे सततची नापिकी व वाढणाऱ्या कर्जाच्या डोंगरामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी न होता वाढतच असून, ...

देवानंद नंदेश्वर भंडारानिसर्गाच्या लहरीपणामुळे सततची नापिकी व वाढणाऱ्या कर्जाच्या डोंगरामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी न होता वाढतच असून, गत १५ वर्षात भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत ३६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र शासनाच्या निकषावर यातील २३५ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या आहेत.शेतात केलेला लागवडीचा खर्च. हाती आलेले उत्पन्न आणि मिळणारा दर. यात प्रचंड तफावत असून, यासोबतच सिंचनाअभावी बारमाही पीक घेता येत नाही, शेतीला जोडधंदा नसल्याने हातात पैसा खेळत नाही. परिणामी, वाट्याला आलेल्या कर्जबाजारीपणामुळे आलेल्या नैराश्यापोटीच जीवनाचा डाव हरलो, या भावनेपोटी जिल्ह्यात मागील १५ वर्षात ३६१ शेतकऱ्यांनी सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी राज्य शासनाच्या निकषाप्रमाणे पात्र ठरलेल्या १२२ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली. २३५ शेतकऱ्यांचा मृत्यू आजारपणा, व्यसनाधिनता, अपघात, बेरोजगारी, घरगुती भांडण आदी कारणांमुळे झाला असल्याचे निष्कर्ष शासनाकडून लावण्यात आले. यामुळे अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत नाकारण्यात आलेली आहे.जानेवारी २०१५ मध्ये शेतकऱ्यांच्या तीन आत्महत्या झाल्या आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली नाही. त्यांना मदतीसंदर्भात लवकरच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.२०१४ मध्ये २४ प्रकरणे अपात्र नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे अन्नदाता शेतकरी कंगाल झाला. भिकेला लागला. यामुळे आत्महत्येचे सत्र सुरु आहे. २०१४ जानेवारी ते डिसेंबर या वर्षभरात जिल्ह्यात ३६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या नोंदविल्या गेल्या. यापैकी ११ प्रकरणं पात्र ठरुन त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली. तर २४ प्रकरणं अपात्र ठरली; मात्र विविध कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे एक प्रकरणं लालफितशाहीत अडकली असून, शासन दरबारी प्रलंबित आहेत.