शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मोहरणा येथे २३ जोडपी विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:17 IST

शासनाच्या चुकीच्या शेतीविषयक धोरणामुळे शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगितेतून शेतकऱ्यांचे जीवन सुखी व समृद्ध व्हावे, यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याची संकल्पना सांगितली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदुर : शासनाच्या चुकीच्या शेतीविषयक धोरणामुळे शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगितेतून शेतकऱ्यांचे जीवन सुखी व समृद्ध व्हावे, यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याची संकल्पना सांगितली आहे. त्यामुळे गत दहा वर्षांपासून सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा हा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन माजी खासदार नाना पटोले यांनी केले.लाखांदूर तालुक्यातील मोहरणा येथे ओबीसी छावा संग्राम परिषदेच्या वतीने आयोजीत सामूहिक विवाह सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार सेवक वाघाये, जेसा मोटवानी, अ‍ॅड. संजय गुरू, जिल्हा परिषद सदस्य मनोहर राऊत, प्रणाली ठाकरे, शुद्धमता नंदागवळी, प्रमिला कुटे, सभापती मंगला बगमारे, भरत खंडाईत, रामचंद्र राऊत, चंद्रशेखर ठवरे, रमेश भैय्या, योगेश कुटे, गोपीचंद राऊत, वासुदेव तोंडरे, सरपंच प्रभाकर मेंढे, उपसरपंच बबन नागोसे, भुमेश्वर महावाडे, नरेश दिवटे, ताराचंद मातेरे, गजानन नाकतोडे, सुभाष आजबले, राजु पालीवाल, अशोक चांडक आदी उपस्थित होते.या विवाह सोहळ्यात २३ जोडपी विवाहबद्ध झाली. त्यात ८ जोडपी बौद्ध धर्माची होती. आठ जोडप्यांचा विवाह बौध्द पद्धतीने तर १५ जोडप्यांचा विवाह हिंदू पद्धतीने पार पाडण्यात आला. विवाहबद्ध झालेल्या २३ जोडप्यांना नाना पटोले यांनी कपडे व एलईडी भेट स्वरूपात देऊन स्वत: पालकत्व स्विकारून कन्यादान देखील केले.विवाह सोहळ्याचे प्रास्ताविक नाना पिलारे यांनी केल. संचालन यशवंत नखाते यांनी, तर आभार प्रदर्शन मंगेश राऊत यांनी केले. सामूहिक विवाह सोहळ्यासाठी छावा संग्राम परिषद व मोहरणा ग्रामवासीयांनी सहकार्य केल.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले