शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

गरज २१५ कोटींची; जिल्ह्याला मिळाले केवळ १८ कोटी, जल जीवन मिशन अडचणीत

By युवराज गोमास | Updated: September 18, 2023 15:13 IST

जिल्ह्यात ६९२ पैकी २१९ कामे पूर्ण

युवराज गोमासे/ भंडारा: जिल्ह्यात केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन योजनेतंर्गत ६९२ पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळाली. या योजनांच्या पूर्णत्वासाठी सुमारे २१५ कोटी रूपयांची गरज आहे. परंतु, एप्रिल २०२३ नंतर केवळ १८ कोटींचा निधी जल जीवन मिशनवर खर्च झाला. निधीअभावी कामे अडचणीत सापडली आहेत. त्यामुळे ६९२ पैकी केवळ २१९ कामे पूर्ण झाली. २०२४ पर्यंत कामे पूर्ण होण्यासाठी पर्याप्त निधी देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

केंद्र शासनाने 'हर घर नल' या संकल्पानुसार २०२४ पर्यंत ग्रामीण कुटुंबाना पुरेसे व सुरक्षीत पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन पुरविण्यासाठी जल जीवन मिशन सुरू केले. या योजनेतंर्गत प्रत्येक कुटुंबाला प्रतिव्यक्ती ५५ लिटर पाणी देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्या अनुसंगाने घरगुती नळ कनेक्शनसाठी व पाणी पुरवठा योजनांच्या पायाभुत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. परंतु, जिल्ह्यात निधीअभावी या योजनेला खिळ बसली आहे. पाणी पुरवठा योजना अपूर्णावस्थेत आहेत.

भंडारा जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत २१५ कोटींच्या आराखड्यातंर्गत ६९२ कामांना मंजुरी मिळाली. जिल्ह्यातील १३५ गावे 'हर घर नल' घोषीत करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन विभागाच्या माध्यमातून कामे वेळेत व गतीने व्हावीत, यासाठी जलदगतीने पाऊले उचलण्यात आली. निर्धारीत कालावधीत कामे पूर्ण होण्यासाठी संबंधित गावांत कामांचा प्रारंभ करण्यात आला. सप्टेंबर २०२३ पर्यंत ६९२ कामांपैकी २१९ कामे पूर्ण झाली. परंतु, एप्रिलनंतर जल जीवन मिशनला केवळ १८ कोटींचा निधी प्राप्त झाला व खर्च झाला. त्यानंतरचा निधी अद्यापही प्राप्त झालेला नाही. निधी अभावी योजना अडचणीत सापडल्या आहेत.

१.८९ लाख घरांत नळ कनेक्शन

सन २०२४ पर्यंत जिल्ह्यात २ लाख ५६ हजार ३०९ घरात शुद्ध पिण्याच्या पाण्याचे नळ पुरविण्याचे उदिष्ट ठरविण्यात आले. त्यापैकी १२ सप्टेंबर २०२३ पर्यंत एकूण १ लाख ८९ हजार १३१ घरात नळ कनेक्शन बसविण्यात आले. नळ कनेक्शनची टक्केवारी ७३.७९ इतकी आहे. उर्वरीत नळ कनेक्शन पुरविण्यासाठी शासनाच्या पर्याप्त निधीची गरज आहे.

जिल्ह्यातील २,५६,३०९ घरात शुद्ध पिण्याच्या पाण्याचे नळ पुरविण्याचे अनुसंगाने १३५ गावे हर घर नल ग्राम घोषीत करण्यात आली. जिल्ह्यात सप्टेंबर २०२३ पर्यंत मंजूर ६९२ पाणी पुरवठा योजनांपैकी सुमारे २१९ कामे पूर्ण झाली आहे. उर्वरीत कामे प्रगतीपथावर आहेत. एप्रिल २०२३ पासून १८ कोटींचा निधी खर्च झाला. उर्वरीत निधीची मागणी केली आहे.- व्ही. एम. देशमुख, कार्यकारी अभियंता, जि. प. भंडारा.

टॅग्स :bhandara-acभंडाराWaterपाणी