शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

गरज २१५ कोटींची; जिल्ह्याला मिळाले केवळ १८ कोटी, जल जीवन मिशन अडचणीत

By युवराज गोमास | Updated: September 18, 2023 15:13 IST

जिल्ह्यात ६९२ पैकी २१९ कामे पूर्ण

युवराज गोमासे/ भंडारा: जिल्ह्यात केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन योजनेतंर्गत ६९२ पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळाली. या योजनांच्या पूर्णत्वासाठी सुमारे २१५ कोटी रूपयांची गरज आहे. परंतु, एप्रिल २०२३ नंतर केवळ १८ कोटींचा निधी जल जीवन मिशनवर खर्च झाला. निधीअभावी कामे अडचणीत सापडली आहेत. त्यामुळे ६९२ पैकी केवळ २१९ कामे पूर्ण झाली. २०२४ पर्यंत कामे पूर्ण होण्यासाठी पर्याप्त निधी देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

केंद्र शासनाने 'हर घर नल' या संकल्पानुसार २०२४ पर्यंत ग्रामीण कुटुंबाना पुरेसे व सुरक्षीत पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन पुरविण्यासाठी जल जीवन मिशन सुरू केले. या योजनेतंर्गत प्रत्येक कुटुंबाला प्रतिव्यक्ती ५५ लिटर पाणी देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्या अनुसंगाने घरगुती नळ कनेक्शनसाठी व पाणी पुरवठा योजनांच्या पायाभुत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. परंतु, जिल्ह्यात निधीअभावी या योजनेला खिळ बसली आहे. पाणी पुरवठा योजना अपूर्णावस्थेत आहेत.

भंडारा जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत २१५ कोटींच्या आराखड्यातंर्गत ६९२ कामांना मंजुरी मिळाली. जिल्ह्यातील १३५ गावे 'हर घर नल' घोषीत करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन विभागाच्या माध्यमातून कामे वेळेत व गतीने व्हावीत, यासाठी जलदगतीने पाऊले उचलण्यात आली. निर्धारीत कालावधीत कामे पूर्ण होण्यासाठी संबंधित गावांत कामांचा प्रारंभ करण्यात आला. सप्टेंबर २०२३ पर्यंत ६९२ कामांपैकी २१९ कामे पूर्ण झाली. परंतु, एप्रिलनंतर जल जीवन मिशनला केवळ १८ कोटींचा निधी प्राप्त झाला व खर्च झाला. त्यानंतरचा निधी अद्यापही प्राप्त झालेला नाही. निधी अभावी योजना अडचणीत सापडल्या आहेत.

१.८९ लाख घरांत नळ कनेक्शन

सन २०२४ पर्यंत जिल्ह्यात २ लाख ५६ हजार ३०९ घरात शुद्ध पिण्याच्या पाण्याचे नळ पुरविण्याचे उदिष्ट ठरविण्यात आले. त्यापैकी १२ सप्टेंबर २०२३ पर्यंत एकूण १ लाख ८९ हजार १३१ घरात नळ कनेक्शन बसविण्यात आले. नळ कनेक्शनची टक्केवारी ७३.७९ इतकी आहे. उर्वरीत नळ कनेक्शन पुरविण्यासाठी शासनाच्या पर्याप्त निधीची गरज आहे.

जिल्ह्यातील २,५६,३०९ घरात शुद्ध पिण्याच्या पाण्याचे नळ पुरविण्याचे अनुसंगाने १३५ गावे हर घर नल ग्राम घोषीत करण्यात आली. जिल्ह्यात सप्टेंबर २०२३ पर्यंत मंजूर ६९२ पाणी पुरवठा योजनांपैकी सुमारे २१९ कामे पूर्ण झाली आहे. उर्वरीत कामे प्रगतीपथावर आहेत. एप्रिल २०२३ पासून १८ कोटींचा निधी खर्च झाला. उर्वरीत निधीची मागणी केली आहे.- व्ही. एम. देशमुख, कार्यकारी अभियंता, जि. प. भंडारा.

टॅग्स :bhandara-acभंडाराWaterपाणी