शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी
2
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
3
झारखंडच्या बोकारोमध्ये चमकम! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
4
वानखेडेवर १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेची तुफानी फटकेबाजी, सामना पाहणाऱ्या भावाला आनंदाश्रू अनावर, व्हिडीओ होतोय व्हायरल 
5
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध
6
Stock Market Today: ३४९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex, बँक निफ्टीचा रेकॉर्ड; रियल्टी-हेल्थकेअरमध्ये मोठी तेजी
7
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
8
NAV म्हणजे नक्की काय हो? Mutual Fund मध्ये गुंतवणूक करत असाल तर हे माहितच हवं
9
महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्रांती, राज्याला महत्त्वपूर्ण यश; ८,४५० मेगावॅट वीजनिर्मिती
10
Post Office ची कमालीची सेव्हिंग स्कीम; गुंतवणूक करा आणि महिन्याला २० हजारांचं पेन्शन फिक्स
11
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
12
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
13
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
15
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
16
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
17
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
18
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
19
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
20
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश

गरज २१५ कोटींची; जिल्ह्याला मिळाले केवळ १८ कोटी, जल जीवन मिशन अडचणीत

By युवराज गोमास | Updated: September 18, 2023 15:13 IST

जिल्ह्यात ६९२ पैकी २१९ कामे पूर्ण

युवराज गोमासे/ भंडारा: जिल्ह्यात केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन योजनेतंर्गत ६९२ पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळाली. या योजनांच्या पूर्णत्वासाठी सुमारे २१५ कोटी रूपयांची गरज आहे. परंतु, एप्रिल २०२३ नंतर केवळ १८ कोटींचा निधी जल जीवन मिशनवर खर्च झाला. निधीअभावी कामे अडचणीत सापडली आहेत. त्यामुळे ६९२ पैकी केवळ २१९ कामे पूर्ण झाली. २०२४ पर्यंत कामे पूर्ण होण्यासाठी पर्याप्त निधी देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

केंद्र शासनाने 'हर घर नल' या संकल्पानुसार २०२४ पर्यंत ग्रामीण कुटुंबाना पुरेसे व सुरक्षीत पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन पुरविण्यासाठी जल जीवन मिशन सुरू केले. या योजनेतंर्गत प्रत्येक कुटुंबाला प्रतिव्यक्ती ५५ लिटर पाणी देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्या अनुसंगाने घरगुती नळ कनेक्शनसाठी व पाणी पुरवठा योजनांच्या पायाभुत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. परंतु, जिल्ह्यात निधीअभावी या योजनेला खिळ बसली आहे. पाणी पुरवठा योजना अपूर्णावस्थेत आहेत.

भंडारा जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत २१५ कोटींच्या आराखड्यातंर्गत ६९२ कामांना मंजुरी मिळाली. जिल्ह्यातील १३५ गावे 'हर घर नल' घोषीत करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन विभागाच्या माध्यमातून कामे वेळेत व गतीने व्हावीत, यासाठी जलदगतीने पाऊले उचलण्यात आली. निर्धारीत कालावधीत कामे पूर्ण होण्यासाठी संबंधित गावांत कामांचा प्रारंभ करण्यात आला. सप्टेंबर २०२३ पर्यंत ६९२ कामांपैकी २१९ कामे पूर्ण झाली. परंतु, एप्रिलनंतर जल जीवन मिशनला केवळ १८ कोटींचा निधी प्राप्त झाला व खर्च झाला. त्यानंतरचा निधी अद्यापही प्राप्त झालेला नाही. निधी अभावी योजना अडचणीत सापडल्या आहेत.

१.८९ लाख घरांत नळ कनेक्शन

सन २०२४ पर्यंत जिल्ह्यात २ लाख ५६ हजार ३०९ घरात शुद्ध पिण्याच्या पाण्याचे नळ पुरविण्याचे उदिष्ट ठरविण्यात आले. त्यापैकी १२ सप्टेंबर २०२३ पर्यंत एकूण १ लाख ८९ हजार १३१ घरात नळ कनेक्शन बसविण्यात आले. नळ कनेक्शनची टक्केवारी ७३.७९ इतकी आहे. उर्वरीत नळ कनेक्शन पुरविण्यासाठी शासनाच्या पर्याप्त निधीची गरज आहे.

जिल्ह्यातील २,५६,३०९ घरात शुद्ध पिण्याच्या पाण्याचे नळ पुरविण्याचे अनुसंगाने १३५ गावे हर घर नल ग्राम घोषीत करण्यात आली. जिल्ह्यात सप्टेंबर २०२३ पर्यंत मंजूर ६९२ पाणी पुरवठा योजनांपैकी सुमारे २१९ कामे पूर्ण झाली आहे. उर्वरीत कामे प्रगतीपथावर आहेत. एप्रिल २०२३ पासून १८ कोटींचा निधी खर्च झाला. उर्वरीत निधीची मागणी केली आहे.- व्ही. एम. देशमुख, कार्यकारी अभियंता, जि. प. भंडारा.

टॅग्स :bhandara-acभंडाराWaterपाणी