शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

तुमसर तालुक्यातील २० गावे सिंचनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 22:47 IST

आंतरराज्यीय बावनथडी (राजीव सागर) परिसरातील २० गावे मागील एका तपापासून सिंचन सुविधेपासून वंचित आहेत. गोबरवाही परिसरातील गावांना पाणीपुरवठा करणारी योजनाही शेवटची घटना मोजत आहे. संबंधित दोन्ही विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक २५ फेब्रुवारीला तहसील कार्यालयात होत आहे. धरण परिसरात पाण्याकरिता प्रतिक्षा करावी लागत आहे. नियोजनाचा अभाव तथा तांत्रिक करणामुळेच सदर समस्या सुटली नाही.

ठळक मुद्देआदिवासीबहुल गावांचा समावेश : भंडारा, नागपूर व बालाघाट जिल्ह्यातील शेतीला होतो पाणीपुरवठा

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आंतरराज्यीय बावनथडी (राजीव सागर) परिसरातील २० गावे मागील एका तपापासून सिंचन सुविधेपासून वंचित आहेत. गोबरवाही परिसरातील गावांना पाणीपुरवठा करणारी योजनाही शेवटची घटना मोजत आहे. संबंधित दोन्ही विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक २५ फेब्रुवारीला तहसील कार्यालयात होत आहे. धरण परिसरात पाण्याकरिता प्रतिक्षा करावी लागत आहे. नियोजनाचा अभाव तथा तांत्रिक करणामुळेच सदर समस्या सुटली नाही.तुमसर तालुक्यातील गोबरवाही परिसरातील सीतासावंगी, पवनारखानी, गणेशपूर, येदरबुची, सुंदरटोला, हेटीटोला, सोदेपूर, बाळापूर, हमेशा, धामनेवाडा, गुडरी, खंदाड, गोबरवाही, खैरटोला, आलेसूर, लेंडेझरी, लोहारा, गोंडीटोला, रोंघा, विटपूर, पिटेसूर आदी गावांना सिंचनाची सुविधा अजुनपर्यंत उपलब्ध झाली नाही. सदर गावे आदिवासी बहुल आहेत. बावनथडी आंतरराष्ट्रीय प्रकलपापासून केवळ ५ ते १५ कि़मी. अंतरावर गावे आहेत. येथील शेती सध्या निसर्गावर अवलंबून आहे. या धरणातून भंडारा तथा बालाघाट व नागपूर जिल्ह्यातील शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे हे विशेष.धरण स्थळापासून अवघ्या काही कि.मी. अंतरावर शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने आदिवासी बहुल क्षेत्रात असंतोष व्याप्त आहे. तांत्रिक अडचण येथे अधिकाºयांनी समोर केली आहे. तांत्रिक अडचण अजुनपर्यंत दूर करण्यात स्थापत्य अभियंत्यांना येथे अपयश आल्याचे दिसून येते. निधीची कमतरता ही दुसरी मुख्य समस्या आहे. याबाबत शासनस्तररावर दबक्या आवाजात चर्चा केली जाते, परंतु ठोस कारवाई कोण करणार ही मुख्य समस्या येथे आहे.झुडपी जंगलाची समस्या येथे यापूर्वीच दूर झाली आहे. सध्या उपसा सिंचन योजना येथे २० गावांकरिता राबविण्यात यावी, अशी मागणी होत आहे. सदर समस्येकरीता शासनस्तरावर आता खलबते सुरू झाल्याची माहिती आहे. तहान लागल्यावर येथे विहीर खोदण्याचा प्रकार पुर्वीपासून सुरू आहे. पाणीपुरवठा योजनेला येथे घरघर लागली आहे. गोबरवाही परिसरातील मुबलक पाणीपुरवठा करणारी पेयजल योजना बावनथडी धरणावर विसंबून आहे. सदर योजनेची तांत्रिक कामे व मुबलक पाणी मिळावे याकरिताही सध्या प्रयत्न सुरू आहेत.सिंचन व पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्याकरिता दोन्ही विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक २५ फेब्रुवारी रोजी होत आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच भंडारा येथे बैठकीत सदर दोन्ही समस्या मार्गी काढण्याचे निर्देश दिले हे विशेष. लोकसभा पोटनिवडणुकीत परिसरातील नागरिकांनी बहिष्काराचे अस्त्र वापरले होते. त्यामुळे सदर समस्या चर्चेत आल्या होत्या. पुन्हा लोकसभा निवडणुकीवर या समस्यांची उग्र रूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.२० गावातील सिंचन समस्या तथा पेयजल समस्येवर संंबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक २५ फेबु्रवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यात सविस्तर चर्चा करून तशी माहिती अधिकाºयांकडून प्राप्त करण्यात येईल.- गजेंद्र बालपांडे,तहसीलदार तुमसर.