शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर तालुक्यातील २० गावे सिंचनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 22:47 IST

आंतरराज्यीय बावनथडी (राजीव सागर) परिसरातील २० गावे मागील एका तपापासून सिंचन सुविधेपासून वंचित आहेत. गोबरवाही परिसरातील गावांना पाणीपुरवठा करणारी योजनाही शेवटची घटना मोजत आहे. संबंधित दोन्ही विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक २५ फेब्रुवारीला तहसील कार्यालयात होत आहे. धरण परिसरात पाण्याकरिता प्रतिक्षा करावी लागत आहे. नियोजनाचा अभाव तथा तांत्रिक करणामुळेच सदर समस्या सुटली नाही.

ठळक मुद्देआदिवासीबहुल गावांचा समावेश : भंडारा, नागपूर व बालाघाट जिल्ह्यातील शेतीला होतो पाणीपुरवठा

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आंतरराज्यीय बावनथडी (राजीव सागर) परिसरातील २० गावे मागील एका तपापासून सिंचन सुविधेपासून वंचित आहेत. गोबरवाही परिसरातील गावांना पाणीपुरवठा करणारी योजनाही शेवटची घटना मोजत आहे. संबंधित दोन्ही विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक २५ फेब्रुवारीला तहसील कार्यालयात होत आहे. धरण परिसरात पाण्याकरिता प्रतिक्षा करावी लागत आहे. नियोजनाचा अभाव तथा तांत्रिक करणामुळेच सदर समस्या सुटली नाही.तुमसर तालुक्यातील गोबरवाही परिसरातील सीतासावंगी, पवनारखानी, गणेशपूर, येदरबुची, सुंदरटोला, हेटीटोला, सोदेपूर, बाळापूर, हमेशा, धामनेवाडा, गुडरी, खंदाड, गोबरवाही, खैरटोला, आलेसूर, लेंडेझरी, लोहारा, गोंडीटोला, रोंघा, विटपूर, पिटेसूर आदी गावांना सिंचनाची सुविधा अजुनपर्यंत उपलब्ध झाली नाही. सदर गावे आदिवासी बहुल आहेत. बावनथडी आंतरराष्ट्रीय प्रकलपापासून केवळ ५ ते १५ कि़मी. अंतरावर गावे आहेत. येथील शेती सध्या निसर्गावर अवलंबून आहे. या धरणातून भंडारा तथा बालाघाट व नागपूर जिल्ह्यातील शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे हे विशेष.धरण स्थळापासून अवघ्या काही कि.मी. अंतरावर शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने आदिवासी बहुल क्षेत्रात असंतोष व्याप्त आहे. तांत्रिक अडचण येथे अधिकाºयांनी समोर केली आहे. तांत्रिक अडचण अजुनपर्यंत दूर करण्यात स्थापत्य अभियंत्यांना येथे अपयश आल्याचे दिसून येते. निधीची कमतरता ही दुसरी मुख्य समस्या आहे. याबाबत शासनस्तररावर दबक्या आवाजात चर्चा केली जाते, परंतु ठोस कारवाई कोण करणार ही मुख्य समस्या येथे आहे.झुडपी जंगलाची समस्या येथे यापूर्वीच दूर झाली आहे. सध्या उपसा सिंचन योजना येथे २० गावांकरिता राबविण्यात यावी, अशी मागणी होत आहे. सदर समस्येकरीता शासनस्तरावर आता खलबते सुरू झाल्याची माहिती आहे. तहान लागल्यावर येथे विहीर खोदण्याचा प्रकार पुर्वीपासून सुरू आहे. पाणीपुरवठा योजनेला येथे घरघर लागली आहे. गोबरवाही परिसरातील मुबलक पाणीपुरवठा करणारी पेयजल योजना बावनथडी धरणावर विसंबून आहे. सदर योजनेची तांत्रिक कामे व मुबलक पाणी मिळावे याकरिताही सध्या प्रयत्न सुरू आहेत.सिंचन व पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्याकरिता दोन्ही विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक २५ फेब्रुवारी रोजी होत आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच भंडारा येथे बैठकीत सदर दोन्ही समस्या मार्गी काढण्याचे निर्देश दिले हे विशेष. लोकसभा पोटनिवडणुकीत परिसरातील नागरिकांनी बहिष्काराचे अस्त्र वापरले होते. त्यामुळे सदर समस्या चर्चेत आल्या होत्या. पुन्हा लोकसभा निवडणुकीवर या समस्यांची उग्र रूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.२० गावातील सिंचन समस्या तथा पेयजल समस्येवर संंबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक २५ फेबु्रवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यात सविस्तर चर्चा करून तशी माहिती अधिकाºयांकडून प्राप्त करण्यात येईल.- गजेंद्र बालपांडे,तहसीलदार तुमसर.