शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

१.९९ कोटींचे धान चुकारे अडले

By admin | Updated: January 10, 2016 00:42 IST

परिसरातील शेतकऱ्यांचे १ कोटी ९९ लाख रूपयांचे चुकारे रखडले आहेत. आधी पावसाने दगा दिला व नंतर किडीने पीक नष्ट केले.

शेतकरी हवालदिल : दिघोरीतील प्रकारदिघोरी (मोठी) : परिसरातील शेतकऱ्यांचे १ कोटी ९९ लाख रूपयांचे चुकारे रखडले आहेत. आधी पावसाने दगा दिला व नंतर किडीने पीक नष्ट केले. आता धान खरेदी केंद्र शेतकऱ्यांना त्यांच्या धानाच्या चुकाऱ्यांपासून वंचित ठेवत आहेत.शेतकऱ्यांची खासगी व्यापाऱ्यांकडून फसवणूक होऊ नये, धानाला योग्य तो भाव मिळावा या हेतूने शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र ही योजना अंमलात आणली. मात्र येथील शेतकऱ्यांनी आधारभूत धान खरेदी केंद्रात धान विकून ४५ दिवसाचा कालावधी लोटला तरी अजूनपर्यंत धानाचे चुकारे मिळाले नाही. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे.दिघोरी (मोठी) येथे लक्ष्मी राईस मिल असोसिएशन व खरेदी विक्री संघाचे असे दोन आधारभूत धान खरेदी केंद्र दिवाळीनंतर सुरु झाले. यात खरेदी विक्री संघाच्या धान खरेदी केंद्रावर ७ जानेवारीपर्यंत ८,३१० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. लक्ष्मी राईस मिल असोसिएशनच्या खरेदी केंद्रावर ५,८२९ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. दोन्ही धान खरेदी केंद्रावर १४ हजार १४० क्विंटल धान खरेदी करण्यात आले. याचे एकुण मुल्य १ कोटी ९९ लाख रूपये एवढे होत असून धान खरेदी केंद्राच्या उद्घाटनापासून शेतकऱ्यांना आजवर एकही रूपया मिळालेला नाही. एक एकराच्या सातबारा प्रमाणपत्रावर केवळ १२ क्विंटल धान विक्री करण्याची सक्ती असल्याने उर्वरीत धान खासगी व्यापाऱ्यांना मिळावा लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांना उर्वरीत धानाचे नुकसान सहन करावे लागेल. शासनाने प्रतिक्विंटल २०० रूपये बोनस जाहीर केले असले तरी ते २०० रूपयांची धानविक्रीच्या पावतीवर नोंद नसल्याने बोनसचे पैसे मिळाले नाही. ते पैसे मिळणार की नाही, याविषयी शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे. खरेदी विक्री व राईस मिल संघामार्फत खरेदी साठवणूक असलेले गोदाम निम्म्यापेक्षा जास्त भरलेले आहेत. गोदामाचे आवारात १० हजार पोती शेतकऱ्यांची पडून असल्याने या दोन्ही धान खरेदी केंद्रांना डिलीवरी आॅर्डर देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)