शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

५४१ गावांत १६२३ जलमित्र; आतापर्यंत नाममात्र अर्ज; मानधन मिळणार किती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 13:56 IST

थेंब न् थेंब वाचविणार : ग्रामपंचायतीकडून माहिती मागविली

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या देखभालीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत तीन जलमित्रांची नेमणूक करण्यात येणार आहे, त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत नाममात्र अर्ज आल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये जल जीवन मिशनचे काम सुरू आहे. काही गावांत योजना पूर्ण झाल्या आहेत तर काही गावांत कामे सध्या सुरू आहेत.

या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद शासनाने केली आहे. मात्र या योजना भविष्यात व्यवस्थित सुरू ठेवण्यासाठी तसेच देखभाल दुरुस्तीकरिता प्रत्येक गावात तीन जलमित्रांची निवड करण्यात येणार आहे. नळ दुरुस्तीकरिता प्लंबर, मोटार दुरुस्ती करिता फिटर, सौर पंप व वीज पुरवठा सुरळीत होण्याकरिता वायरमन, इतर कामांच्या दुरुस्तीकरिता गवंडी अशाप्रकारे तांत्रिक कौशल्य असणारे तीन व्यक्तींची निवड ग्रामपंचायतीकडून होणार आहे. पूर्वी प्रशिक्षण घेतलेले व अनुभवी कारागीर ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करणे तसेच त्यांना प्रशिक्षित करून पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी उपयोगात आणण्याचा उद्देश आहे. 

मानधन किती? ग्रामपंचायतींमध्ये नेमल्या जाणाऱ्या जलमित्रांना शासनाकडून मानधन मिळणार असल्याचे सांगण्यात येते. तर दुसरीकडे पाणीपुरवठा योजनेच्या गरजेनुसार करावयाच्या दुरुस्तीवेळी ठराविक रक्कम मिळणार असल्याचे सांगण्यात येते.

अर्ज आले किती? भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना प्लंबर गवंडी कौशल्य ट्रेड संच-१, मोटार मेकॅनिक फिटर ट्रेड संच-२, इलेक्ट्रिशियन पंप ऑपरेटर संच-३ अशा प्रत्येकी संचामध्ये तीन सदस्यांची माहिती भरून एकूण नऊ सदस्यांची माहिती तत्काळ भरण्याचे कळविण्यात आले आहे. या माहितीची हार्ड कॉपी तालुकास्तरावर ठेऊन जिल्हा कार्यालयास माहिती भरल्याचे कळविण्याबाबत सूचना दिल्याचे समजते. 

ग्रामपंचायतींकडून माहिती मागविणे सुरु तालुका                          ग्रामपंचायती भंडारा                                 ९४ लाखांदूर                              ६४ लाखनी                                ७१ मोहाडी                                ७६ पवनी                                   ७९ साकोली                               ६२ तुमसर                                 ९७ एकूण                                  ५४१

नेमणार १६२३ जलमित्र अनेक गावांमध्ये जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनांचे कामे मंजूर झालेली आहे. त्यातील बरीच कामे पूर्ण होऊन पाणीपुरवठा योजना सुरू झाल्या आहेत. या योजनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी करून देण्यासाठी शासनाची जलमित्र संकल्पना आहे. ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी तीन जलमित्र प्रशिक्षित करणे शासनाचे उद्दिष्ट आहे. 

काय करणार हे जलमित्र? पाणीपुरवठाची देखभाल व दुरुस्तीची कामे जलमित्र करणार आहेत. ग्रामपंचायतीमध्ये गवंडी-प्लंबर, मेकॅनिक, फिटर व पंप ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन जलमित्र नेमले जात आहेत.

टॅग्स :bhandara-acभंडाराwater transportजलवाहतूक