शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

कन्हाळगाव परिसरातील १५० एकर शेतीला बॅकवाॅटरचा वेढा; शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2022 15:12 IST

मोहाडी तालुक्यातील कान्हळगाव परिसरातील बेटावर असलेल्या १५० एकर शेतीला पाण्याचा वेढा पडला आहे. त्यामुळे शेती रस्ता बंद झाला असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देशेती मार्गच बंद शेतीचे संपादन करून मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी

भंडारा : गोसे धरणाची पाण्याची पातळी वाढविण्यात आल्याने बॅकवाॅटरची मोठी समस्या निर्माण झाली असून, मोहाडी तालुक्यातील कान्हळगाव परिसरातील बेटावर असलेल्या १५० एकर शेतीला पाण्याचा वेढा पडला आहे. त्यामुळे शेती रस्ता बंद झाला असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या परिसरात पुलाचे बांधकाम करावे किंवा शेतीचे संपादन करून मोबदला द्यावा, अशी मागणी होत आहे.

वैनगंगा नदीत बेटाळा ते कान्हळगाव दरम्यान बेट आहे. बेट बेटाळा गावच्या हद्दीत मोडतो. मात्र, संपूर्ण शेती कान्हळगाव येथील शेतकऱ्यांची आहे. शेतात जाण्यासाठी कान्हळगाव फाटा वळण मार्गाने नदी पार करून प्रवास करावा लागतो. यापूर्वी जानेवारीनंतर नदीपात्र कोरडे पडत होते. मार्ग मोकळा राहात होता. परंतु सध्या गोसे धरणाची पाणी पातळी वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

रब्बी हंगाम धोक्यात

सध्या शेतात रब्बी हंगामातील गवार, पोपटी, हरभरा, गहू आणि मोठ्या प्रमाणात भाजीपाला पीक आहे. परंतु शेतात बॅकवॉटर शिरल्याने पिकांचे नुकसान होत आहे. शेतीवर जाण्याचा मार्गही बंद झाला. शासनाने शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकरी अंतिराम कुकडे, जनार्धन भोयर, धनराज भोयर, आनंद भोयर, गंगाबाई भोयर, दादाराम भोयर, किशोर भोयर, महादेव भोयर, कवळू पंचबुध्दे, झिंगर पंचबुध्दे यांनी केली आहे.

बेटाळा - कान्हळगाव बेटावर जाण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. शेती पूर्णतः पाण्याने वेढली आहे. शेतीवर जाण्यासाठी पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अथवा शासनाच्या वतीने भूसंपादन करून मोबदला द्यावा.

- दिगांबर कुकडे, सरपंच कान्हळगाव.

गोसेच्या बॅकवॉटरमुळे शेतीचे यापुढे नेहमी नुकसान होणार आहे. सध्या तर शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे पीक कसे काढावे, हा प्रश्न आहे. त्यामुळे नदीवर पूल बांधावा किंवा भूसंपादन करून मोबदला देण्यात यावा.

- संजय भोयर, शेतकरी कान्हळगाव

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीGosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प