शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

हक्काच्या जमिनीसाठी १५ वर्षांपासून वृद्ध शेतकऱ्याची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:38 IST

महसूल विभागाला वारंवार केलेल्या विनवणीने तब्बल २५ वर्षांपासून अतिक्रमण हटले नाही. शेतजमीन मोकळी असल्याचे तलाठी यांनी लिखित पुराव्यासह स्पष्ट ...

महसूल विभागाला वारंवार केलेल्या विनवणीने तब्बल २५ वर्षांपासून अतिक्रमण हटले नाही. शेतजमीन मोकळी असल्याचे तलाठी यांनी लिखित पुराव्यासह स्पष्ट केले. जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी साकोली, तहसीलदार लाखनी यांना पत्र देऊनही शेतजमीन अद्याप मूळ मालकाला परत मिळालेली नाही. परिणामी आयुष्याच्या संध्याकाळी वृद्ध शेतकरी चंद्रभान मारोती हेडाऊ यांची फरपट सुरू आहे. न्याय न मिळाल्याने न्यायासाठी जनता दरबारात पालकमंत्री विश्वजित कदम यांच्याकडे निवेदनातून केली आहे. भूमिधारी हक्काने वहिवाटीकरिता शासनाने पट्टा दिला. त्यावर चरितार्थ सुरू होता. मात्र निसर्गाची वक्रदृष्टी होऊन दुष्काळ ओढावला. बिकट परिस्थिती निर्माण झाली. हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली. मैत्रिस्तव गावातील गर्भश्रीमंत पाटलाला क्षुल्लक रकमेत जमीन कसायला दिली असता, बनावट कागदपत्राच्या आधारे माझ्या शेतजमिनीवर कायमस्वरूपी कब्जा केल्याचे कोर्ट व तत्कालीन उपविभागीय अधिकारी, साकोली यांचे न्यायालयीन निर्णयाद्वारे स्पष्ट झाले. सन१९७५-७६ मध्ये सरकारी पट्ट्यातील भूमापन क्रं. ३२४ , १०:११ हे. आर. क्षेत्रफळातील एक हेक्टर काबिल कास्तकारी शासकीय वाटपात मिळाली. जमिनीचा सातबाराही नावावरती झाला. १९९२ पर्यंत त्या शेतजमिनीची मशागत करून धान पिकाचे उत्पन्न घेऊन कुटुंबाचे पालनपोषण करीत होतो. मात्र दुष्काळ ओढावून बिकट परिस्थिती निर्माण झाली. आता शेती कशी कसावी? कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवावा? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे गावातीलच पाटलाकडून १९९३ ला ५,००० रुपयांत जमीन कसायला दिली. मात्र पाटलाने माझ्या साधेपणाचा गैरफायदा घेऊन १० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर १०० वर्षांच्या करारनाम्याच्या आधारे माझ्या हक्काच्या शेतजमिनीवर कब्जा केला. कब्जा हटविण्यास विनंती केली असता, अरेरावी करत जीवे मारण्याची धमकी दिली. प्रकरण पोलीस ठाणे पालांदूरमार्फत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४५ प्रमाणे कारवाई होऊन उपविभागीय अधिकारी साकोली यांचे न्यायालयात न्यायप्रविष्ट केले असता गैरअर्जदाराचे सर्व दस्तावेज मुळात बेकायदेशीर असल्याचे पुढे आल्याने सदर एक हेक्टर शेतजमीन २०१४ चे पारित आदेशाप्रमाणे २०१६ रोजी शासनजमा झाली. मात्र त्याने सदर जमिनीत धान पिकाचे उत्पन्न घेणे सुरूच ठेवल्याने तहसीलदार लाखनी यांच्याकडे लेखी तक्रार केली. २ ऑगस्ट २०२९ रोजी संबंधित तलाठी व मंडल अधिकारी यांच्या समक्ष पंचनामा केला. त्यात गैरअर्जदाराने खरीप हंगाम २०१९ चे धान पिक निघाल्यावर जमिनीवरून कब्जा सोडणार असल्याचे लेखी कबूल केले होते. बेकायदेशीर दस्तावेजच्या आधारे २५ वर्षे मालकी हक्क गाजवून चक्क शासनाची दिशाभूल केली. तत्कालीन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी २०१७ रोजी गैरअर्जदाराचे अतिक्रमण हटवून पूर्ववत जमीन मूळ मालकाचे नावे करण्याचे पत्र तहसीलदार लाखनी यांना दिले होते. तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी २४ जून २०२० रोजी उपविभागीय अधिकारी साकोली, यांना दिलेल्या पत्रानुसार २५ वर्षांपासून असलेला कब्जा हटविला असून, एक हेक्टर शेतजमीन मोकळी असल्याचा लिखित पुरावा तलाठी कार्यालयातून ५ ऑगस्ट २०२० रोजी मूळ मालकाला प्राप्त झालेला आहे. मात्र आता पूर्ववत मालकी हक्कासाठी पालकमंत्र्यांना काबिल कास्तकारीचे सर्व दस्तावेज पुरवित जमिनीचा ताबा मागण्यासाठी विनंती केली आहे. पालकमंत्र्यांना पाझर फुटून माझी शेतजमीन मला परत मिळेल काय, असा प्रश्न चंद्रभान हेडाऊ यांनी पुढे केला आहे.

कारवाईस फारच विलंब होत असून, प्रकरण थंडबस्त्यात आहे. गत १५ वर्षांपासून स्वखर्चाने प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही न्याय न मिळाल्याने पदरी निराशाच आहे. मात्र पालकमंत्र्यांकडून न्यायाची अपेक्षा केली आहे.