शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

१२०० आदिवासींची पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 01:07 IST

आदिवासीबहुल गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून येदरबुची, सुंदरटोला येथील सुमारे १२०० नागरिकांची तहान एका शेतातील विहीर भागवित आहे. अख्खे गाव पहाटे गावापासून एक ते दीड कि.मी. अंतरावरील विहिरीवर पाणी भरायला जात आहे.

ठळक मुद्देयेदरबुची, सुंदरटोला येथील प्रकार : ४० विहिरींसह दोन तलाव कोरडे, खासगी विहीर भागवतेय तृष्णा

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आदिवासीबहुल गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून येदरबुची, सुंदरटोला येथील सुमारे १२०० नागरिकांची तहान एका शेतातील विहीर भागवित आहे. अख्खे गाव पहाटे गावापासून एक ते दीड कि.मी. अंतरावरील विहिरीवर पाणी भरायला जात आहे. सदर गावातील ४० विहिरी सध्या कोरड्या पडल्या असून सात हातपंपापैकी ५ हातपंपाला सध्या पाणी नाही. संपूर्ण गाव थेंब-थेंब पाण्याकरिता विहिरीवर सध्या प्रतीक्षा करीत आहे. बावनथडी प्रकल्प जवळ आहे. येथे धरण उशाला व कोरड घशाला अशी स्थिती दिसत आहे.तुमसर तालुक्यात बावनथडी, वैनगंगा अशा नद्या आहेत. तलावांची संख्या ही मोठी आहे. परंतु पाण्याचे नियोजन नसल्याने दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. येदरबुची, सुंदरटोला या आदिवासी बहुल गावात पाण्याकरिता दाही दिशा भटकावे लागत आहे.सदर गावातील ४० विहिरी सध्या कोरड्या पडल्या आहेत. गावाशेजारी एक शासकीय व एक खासगी तलाव कोरडा पडला आहे.सात हातपंप असून त्यापैकी पाच हातपंप कोरडे पडले आहेत. २५० ते ३०० फुट पर्यंत खोदकाम केल्यावरही पाणी लागले नाही. एका हातपंपातून अल्प प्रमाणात पाणी येते तर दुसऱ्या हातपंपाचे पाणी लालसर येत असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. लोहखनीज तत्वाचा या पाण्यात समावेश अधिक आहे. गावापासून एक ते दीड कि.मी. अंतरावर शेतात एक विहिर असून तिथे समस्त ग्रामस्थ पाणी आणण्याकरिता भल्या पहाटे जातात. उर्वरीत ग्रामस्थांना थेंब थेंब पाणी जमा होईपर्यंत तीन ते चार तास प्रतीक्षा करावीलागते. अंधारात पाण्याकरिता अख्खे गाव येथे पायपीट करीत आहे.सदर गावात पेयजल योजना कार्यान्वित असून जलकुंभ तयार करण्यात आले आहे. बावनथडी प्रकल्पाला सदर पेयजल योजना जोडली आहे. ३० हजार लिटरचे जलकुंभ आठवड्यातून एकदाच अर्धे भरण्यात येत आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल टेकाम व ग्रामस्थांनी दिली. मागील पाच वर्षापासून परिसरात दुष्काळ व पाणी टंचाई भेडसावत आहे. विहिरींचे खोदकाम करताना खाली दगड येथे लागतात.सदर परिसर सातपुडा पर्वत रांगांत जंगलात वसला आहे. प्रशासनाच्या योजना केवळ कागदावर रंगवताना अधिकारी दिसतात, असा आरोप अनिल टेकाम यांनी केला आहे.आदिवासी बहुल येदरबुची, सुंदरटोला येथील सुमारे १२०० ग्रामस्थ पाण्याकरिता वणवण भटकत असून रात्री अंधारात पाण्याच्या शोधात जातात. गावात पेयजल योजनेचा जलकुंभ पाणीपुरवठा करण्यास कुचकामी ठरला आहे. कोट्यवधींची योजनेचा लाभ काय? असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. आदिवासी समाजाची उपेक्षा होत आहे.-डॉ.पंकज कारेमोरे, युवा काँग्रेस नेते, तुमसर. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई