शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

१२०० आदिवासींची पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 01:07 IST

आदिवासीबहुल गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून येदरबुची, सुंदरटोला येथील सुमारे १२०० नागरिकांची तहान एका शेतातील विहीर भागवित आहे. अख्खे गाव पहाटे गावापासून एक ते दीड कि.मी. अंतरावरील विहिरीवर पाणी भरायला जात आहे.

ठळक मुद्देयेदरबुची, सुंदरटोला येथील प्रकार : ४० विहिरींसह दोन तलाव कोरडे, खासगी विहीर भागवतेय तृष्णा

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आदिवासीबहुल गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून येदरबुची, सुंदरटोला येथील सुमारे १२०० नागरिकांची तहान एका शेतातील विहीर भागवित आहे. अख्खे गाव पहाटे गावापासून एक ते दीड कि.मी. अंतरावरील विहिरीवर पाणी भरायला जात आहे. सदर गावातील ४० विहिरी सध्या कोरड्या पडल्या असून सात हातपंपापैकी ५ हातपंपाला सध्या पाणी नाही. संपूर्ण गाव थेंब-थेंब पाण्याकरिता विहिरीवर सध्या प्रतीक्षा करीत आहे. बावनथडी प्रकल्प जवळ आहे. येथे धरण उशाला व कोरड घशाला अशी स्थिती दिसत आहे.तुमसर तालुक्यात बावनथडी, वैनगंगा अशा नद्या आहेत. तलावांची संख्या ही मोठी आहे. परंतु पाण्याचे नियोजन नसल्याने दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. येदरबुची, सुंदरटोला या आदिवासी बहुल गावात पाण्याकरिता दाही दिशा भटकावे लागत आहे.सदर गावातील ४० विहिरी सध्या कोरड्या पडल्या आहेत. गावाशेजारी एक शासकीय व एक खासगी तलाव कोरडा पडला आहे.सात हातपंप असून त्यापैकी पाच हातपंप कोरडे पडले आहेत. २५० ते ३०० फुट पर्यंत खोदकाम केल्यावरही पाणी लागले नाही. एका हातपंपातून अल्प प्रमाणात पाणी येते तर दुसऱ्या हातपंपाचे पाणी लालसर येत असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. लोहखनीज तत्वाचा या पाण्यात समावेश अधिक आहे. गावापासून एक ते दीड कि.मी. अंतरावर शेतात एक विहिर असून तिथे समस्त ग्रामस्थ पाणी आणण्याकरिता भल्या पहाटे जातात. उर्वरीत ग्रामस्थांना थेंब थेंब पाणी जमा होईपर्यंत तीन ते चार तास प्रतीक्षा करावीलागते. अंधारात पाण्याकरिता अख्खे गाव येथे पायपीट करीत आहे.सदर गावात पेयजल योजना कार्यान्वित असून जलकुंभ तयार करण्यात आले आहे. बावनथडी प्रकल्पाला सदर पेयजल योजना जोडली आहे. ३० हजार लिटरचे जलकुंभ आठवड्यातून एकदाच अर्धे भरण्यात येत आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल टेकाम व ग्रामस्थांनी दिली. मागील पाच वर्षापासून परिसरात दुष्काळ व पाणी टंचाई भेडसावत आहे. विहिरींचे खोदकाम करताना खाली दगड येथे लागतात.सदर परिसर सातपुडा पर्वत रांगांत जंगलात वसला आहे. प्रशासनाच्या योजना केवळ कागदावर रंगवताना अधिकारी दिसतात, असा आरोप अनिल टेकाम यांनी केला आहे.आदिवासी बहुल येदरबुची, सुंदरटोला येथील सुमारे १२०० ग्रामस्थ पाण्याकरिता वणवण भटकत असून रात्री अंधारात पाण्याच्या शोधात जातात. गावात पेयजल योजनेचा जलकुंभ पाणीपुरवठा करण्यास कुचकामी ठरला आहे. कोट्यवधींची योजनेचा लाभ काय? असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. आदिवासी समाजाची उपेक्षा होत आहे.-डॉ.पंकज कारेमोरे, युवा काँग्रेस नेते, तुमसर. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई