शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

१२ जलप्रकल्पांत ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 23:01 IST

वाढत्या तापमानासोबतच जलप्रकल्पातील साठ्यात कमालीची घट येत असून दोन मध्यम प्रकल्पांसह बारा प्रकल्पांत पाण्याचा ठणठणाट आहे. जिल्ह्यातील मध्यम, लघु आणि मामा तलावांमध्ये सध्या केवळ १९ टक्के जलसाठा आहे. परिणामी आगामी काळात पाण्याचे संकट गंभीर होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देधरणात १९ टक्के पाणी : बेटेकर बोथली व सोरणा मध्यम प्रकल्प कोरडे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वाढत्या तापमानासोबतच जलप्रकल्पातील साठ्यात कमालीची घट येत असून दोन मध्यम प्रकल्पांसह बारा प्रकल्पांत पाण्याचा ठणठणाट आहे. जिल्ह्यातील मध्यम, लघु आणि मामा तलावांमध्ये सध्या केवळ १९ टक्के जलसाठा आहे. परिणामी आगामी काळात पाण्याचे संकट गंभीर होण्याची शक्यता आहे.भंडारा जिल्ह्यात यावर्षी अपुरा पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये जलसाठा अपुरा झाला. त्यातच काही प्रकल्पाचे पाणी रबी सिंचनासाठी सोडण्यात आले. आता सध्या जिल्ह्यातील प्रकल्पाची अवस्था अतिशय गंभीर झाली आहे. सिंचन विभागांतर्गत येणाऱ्या चार मध्यम प्रकल्पांपैकी बेटेकर बोथली आणि सोरणा प्रकल्प कोरडा पडला आहे. तर तुमसर तालुक्यातील बघेडा प्रकल्पात केवळ १२.७२ टक्के आणि चांदपूर प्रकल्पात २३.३२ टक्के जलसाठा आहे. वाढत्या तापमानाने पाणी झपाट्याने खाली जात आहे. सध्या चार मध्यम प्रकल्पात ७.३१३ दशलक्ष घनमीटर पाणी आहे.भंडारा जिल्ह्यातील ३२ लघु प्रकल्पात सध्या केवळ २०.२८ टक्के जलसाठा आहे. त्यापैकी पवनारखारी, डोंगराळा, हिवरा आणि आमगाव हे प्रकल्प कोरडे पडले आहे. तर कारली, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, शिवनीबांध, भूगावमेंढा या सहा प्रकल्पात केवळ पाच टक्के पाणी आहे. सध्यास्थितीत कवलेवाडा लघु प्रकल्पात ५०.३१ टक्के जलसाठा आहे. इतर तुमसर तालुक्यातील कुरमूडा, आंबागड, परसवाडा, मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा, भंडारा तालुक्यातील मंडणगाव, रावणवाडी, सिल्ली आंबाडी, पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, गुढरी, लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी, भुगावमेंढा आणि लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोठा, निहारवाणी, वाकल, खुर्शिपार, पुरकाबोडी जलप्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत.जिल्ह्यातील मध्यम, लघु आणि मामा तलावात सध्या २३.४९ दलघमी जलसाठा असून हा एकुण जलसाठ्याच्या केवळ १९ टक्के आहे. यावर्षी रबी हंगामातही पुरेसे पाणी सोडण्यात आले नाही. उन्हाळी पिकांसाठी तर एकाही प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले नाही.जिल्हाभरातील मामा तलावांची स्थिती दयनीयजिल्ह्यात असलेल्या माजी मालगुजारी (मामा) तलावांची स्थिती अत्यंत दयनिय झाली आहे. केसलवाडा, कनेरी, डोंगरगाव, एकलाझरी, जांभोरा येथील मामा तलाव कोरडे पडले आहेत. साकोली तालुक्यातील एकोडी, चांदोरी आमगाव, वलमाझरी, पिंडकेपार, पाथरी, सावरबंद, परसोडी, खंडाळा, लवारी, उमरी, सितेपार, सानगडी, लाखनी तालुक्यातील चान्ना, कोका, तुमसर तालुक्यातील लोभी, लाखांदुर तालुक्यातील पिंपळगाव, चप्राळा, इंदोरा, दिघोरी, दहेगाव आणि झरी तलावात केवळ १० ते ३० टक्के जलसाठा आहे.पाणी संकट गडदतलावाचा जिल्हा असलेल्या भंडारा यंदा पाणी टंचाई गडद झाल्याचे दिसत आहे. भंडारा जिल्हातील ६३९ गावांना पाणी टंचाईचे चटके बसत आहे. गावानजीकचे तलाव कोरडे पडले असून विहिरींनी तळ गाठला आहे. नळ योजना अखेरच्या घटका मोजत आहे. प्रशासनाच्या उपाययोजना अद्यापही कागदावरच दिसत आहे. परिणामी महिलांसह आबालवृध्दांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. एप्रिल महिन्यातच ही स्थिती तर मे महिन्यात काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.