शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

१२ जलप्रकल्पांत ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 23:01 IST

वाढत्या तापमानासोबतच जलप्रकल्पातील साठ्यात कमालीची घट येत असून दोन मध्यम प्रकल्पांसह बारा प्रकल्पांत पाण्याचा ठणठणाट आहे. जिल्ह्यातील मध्यम, लघु आणि मामा तलावांमध्ये सध्या केवळ १९ टक्के जलसाठा आहे. परिणामी आगामी काळात पाण्याचे संकट गंभीर होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देधरणात १९ टक्के पाणी : बेटेकर बोथली व सोरणा मध्यम प्रकल्प कोरडे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वाढत्या तापमानासोबतच जलप्रकल्पातील साठ्यात कमालीची घट येत असून दोन मध्यम प्रकल्पांसह बारा प्रकल्पांत पाण्याचा ठणठणाट आहे. जिल्ह्यातील मध्यम, लघु आणि मामा तलावांमध्ये सध्या केवळ १९ टक्के जलसाठा आहे. परिणामी आगामी काळात पाण्याचे संकट गंभीर होण्याची शक्यता आहे.भंडारा जिल्ह्यात यावर्षी अपुरा पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये जलसाठा अपुरा झाला. त्यातच काही प्रकल्पाचे पाणी रबी सिंचनासाठी सोडण्यात आले. आता सध्या जिल्ह्यातील प्रकल्पाची अवस्था अतिशय गंभीर झाली आहे. सिंचन विभागांतर्गत येणाऱ्या चार मध्यम प्रकल्पांपैकी बेटेकर बोथली आणि सोरणा प्रकल्प कोरडा पडला आहे. तर तुमसर तालुक्यातील बघेडा प्रकल्पात केवळ १२.७२ टक्के आणि चांदपूर प्रकल्पात २३.३२ टक्के जलसाठा आहे. वाढत्या तापमानाने पाणी झपाट्याने खाली जात आहे. सध्या चार मध्यम प्रकल्पात ७.३१३ दशलक्ष घनमीटर पाणी आहे.भंडारा जिल्ह्यातील ३२ लघु प्रकल्पात सध्या केवळ २०.२८ टक्के जलसाठा आहे. त्यापैकी पवनारखारी, डोंगराळा, हिवरा आणि आमगाव हे प्रकल्प कोरडे पडले आहे. तर कारली, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, शिवनीबांध, भूगावमेंढा या सहा प्रकल्पात केवळ पाच टक्के पाणी आहे. सध्यास्थितीत कवलेवाडा लघु प्रकल्पात ५०.३१ टक्के जलसाठा आहे. इतर तुमसर तालुक्यातील कुरमूडा, आंबागड, परसवाडा, मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा, भंडारा तालुक्यातील मंडणगाव, रावणवाडी, सिल्ली आंबाडी, पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, गुढरी, लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी, भुगावमेंढा आणि लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोठा, निहारवाणी, वाकल, खुर्शिपार, पुरकाबोडी जलप्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत.जिल्ह्यातील मध्यम, लघु आणि मामा तलावात सध्या २३.४९ दलघमी जलसाठा असून हा एकुण जलसाठ्याच्या केवळ १९ टक्के आहे. यावर्षी रबी हंगामातही पुरेसे पाणी सोडण्यात आले नाही. उन्हाळी पिकांसाठी तर एकाही प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले नाही.जिल्हाभरातील मामा तलावांची स्थिती दयनीयजिल्ह्यात असलेल्या माजी मालगुजारी (मामा) तलावांची स्थिती अत्यंत दयनिय झाली आहे. केसलवाडा, कनेरी, डोंगरगाव, एकलाझरी, जांभोरा येथील मामा तलाव कोरडे पडले आहेत. साकोली तालुक्यातील एकोडी, चांदोरी आमगाव, वलमाझरी, पिंडकेपार, पाथरी, सावरबंद, परसोडी, खंडाळा, लवारी, उमरी, सितेपार, सानगडी, लाखनी तालुक्यातील चान्ना, कोका, तुमसर तालुक्यातील लोभी, लाखांदुर तालुक्यातील पिंपळगाव, चप्राळा, इंदोरा, दिघोरी, दहेगाव आणि झरी तलावात केवळ १० ते ३० टक्के जलसाठा आहे.पाणी संकट गडदतलावाचा जिल्हा असलेल्या भंडारा यंदा पाणी टंचाई गडद झाल्याचे दिसत आहे. भंडारा जिल्हातील ६३९ गावांना पाणी टंचाईचे चटके बसत आहे. गावानजीकचे तलाव कोरडे पडले असून विहिरींनी तळ गाठला आहे. नळ योजना अखेरच्या घटका मोजत आहे. प्रशासनाच्या उपाययोजना अद्यापही कागदावरच दिसत आहे. परिणामी महिलांसह आबालवृध्दांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. एप्रिल महिन्यातच ही स्थिती तर मे महिन्यात काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.