शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

१२ जलप्रकल्पांत ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 23:01 IST

वाढत्या तापमानासोबतच जलप्रकल्पातील साठ्यात कमालीची घट येत असून दोन मध्यम प्रकल्पांसह बारा प्रकल्पांत पाण्याचा ठणठणाट आहे. जिल्ह्यातील मध्यम, लघु आणि मामा तलावांमध्ये सध्या केवळ १९ टक्के जलसाठा आहे. परिणामी आगामी काळात पाण्याचे संकट गंभीर होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देधरणात १९ टक्के पाणी : बेटेकर बोथली व सोरणा मध्यम प्रकल्प कोरडे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वाढत्या तापमानासोबतच जलप्रकल्पातील साठ्यात कमालीची घट येत असून दोन मध्यम प्रकल्पांसह बारा प्रकल्पांत पाण्याचा ठणठणाट आहे. जिल्ह्यातील मध्यम, लघु आणि मामा तलावांमध्ये सध्या केवळ १९ टक्के जलसाठा आहे. परिणामी आगामी काळात पाण्याचे संकट गंभीर होण्याची शक्यता आहे.भंडारा जिल्ह्यात यावर्षी अपुरा पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये जलसाठा अपुरा झाला. त्यातच काही प्रकल्पाचे पाणी रबी सिंचनासाठी सोडण्यात आले. आता सध्या जिल्ह्यातील प्रकल्पाची अवस्था अतिशय गंभीर झाली आहे. सिंचन विभागांतर्गत येणाऱ्या चार मध्यम प्रकल्पांपैकी बेटेकर बोथली आणि सोरणा प्रकल्प कोरडा पडला आहे. तर तुमसर तालुक्यातील बघेडा प्रकल्पात केवळ १२.७२ टक्के आणि चांदपूर प्रकल्पात २३.३२ टक्के जलसाठा आहे. वाढत्या तापमानाने पाणी झपाट्याने खाली जात आहे. सध्या चार मध्यम प्रकल्पात ७.३१३ दशलक्ष घनमीटर पाणी आहे.भंडारा जिल्ह्यातील ३२ लघु प्रकल्पात सध्या केवळ २०.२८ टक्के जलसाठा आहे. त्यापैकी पवनारखारी, डोंगराळा, हिवरा आणि आमगाव हे प्रकल्प कोरडे पडले आहे. तर कारली, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, शिवनीबांध, भूगावमेंढा या सहा प्रकल्पात केवळ पाच टक्के पाणी आहे. सध्यास्थितीत कवलेवाडा लघु प्रकल्पात ५०.३१ टक्के जलसाठा आहे. इतर तुमसर तालुक्यातील कुरमूडा, आंबागड, परसवाडा, मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा, भंडारा तालुक्यातील मंडणगाव, रावणवाडी, सिल्ली आंबाडी, पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, गुढरी, लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी, भुगावमेंढा आणि लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोठा, निहारवाणी, वाकल, खुर्शिपार, पुरकाबोडी जलप्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत.जिल्ह्यातील मध्यम, लघु आणि मामा तलावात सध्या २३.४९ दलघमी जलसाठा असून हा एकुण जलसाठ्याच्या केवळ १९ टक्के आहे. यावर्षी रबी हंगामातही पुरेसे पाणी सोडण्यात आले नाही. उन्हाळी पिकांसाठी तर एकाही प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले नाही.जिल्हाभरातील मामा तलावांची स्थिती दयनीयजिल्ह्यात असलेल्या माजी मालगुजारी (मामा) तलावांची स्थिती अत्यंत दयनिय झाली आहे. केसलवाडा, कनेरी, डोंगरगाव, एकलाझरी, जांभोरा येथील मामा तलाव कोरडे पडले आहेत. साकोली तालुक्यातील एकोडी, चांदोरी आमगाव, वलमाझरी, पिंडकेपार, पाथरी, सावरबंद, परसोडी, खंडाळा, लवारी, उमरी, सितेपार, सानगडी, लाखनी तालुक्यातील चान्ना, कोका, तुमसर तालुक्यातील लोभी, लाखांदुर तालुक्यातील पिंपळगाव, चप्राळा, इंदोरा, दिघोरी, दहेगाव आणि झरी तलावात केवळ १० ते ३० टक्के जलसाठा आहे.पाणी संकट गडदतलावाचा जिल्हा असलेल्या भंडारा यंदा पाणी टंचाई गडद झाल्याचे दिसत आहे. भंडारा जिल्हातील ६३९ गावांना पाणी टंचाईचे चटके बसत आहे. गावानजीकचे तलाव कोरडे पडले असून विहिरींनी तळ गाठला आहे. नळ योजना अखेरच्या घटका मोजत आहे. प्रशासनाच्या उपाययोजना अद्यापही कागदावरच दिसत आहे. परिणामी महिलांसह आबालवृध्दांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. एप्रिल महिन्यातच ही स्थिती तर मे महिन्यात काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.