चारा जळून खाक : ५५ हजारांचे नुकसानमोहाडी : जवळील पारडी शेतशिवारातील १०० एकर शेतीत अचानक लागलेल्या आगीत अनेक शेतकऱ्यांची तनस, जनावरांचा गोठा, मोटारपंपाचे पाईप, नांगर इत्यादी शेतीचे साहित्य जळुन हजारो रुपयांचा नुकसान झाला.मोहाडीजवळील पारडी शेतशिवारात १५ एप्रील रोजी अचानक वनवा पेटला. पाहता पाहता १०० एकराला आगीने आपल्या कवेत ओढले. अनेक शेतात गुराढोंरांचे गोठे बनविलेले असुन गुराढोंराचा चाराही शेतातच साठवुन ठेवलेला होता. सुदैवाने दुपारची वेळ असल्याने गुरेढोरे चराईसाठी गेलेले असल्याने त्यांची प्राणहानी टळली. मात्र सर्वकाही जळुन राख झाले. फुलचंद महादेव तलमले यांच्या मोटारपंपाचे १२० पाईप, प्लास्टीक पाईप चार बंडल, झोपडली, तनस व इतर साहित्य असे ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले. तर लिलाधर श्रीराम बांते, बंड दसाराम निमकर, कवळु बांते दवडीपार, सुदाम तलमले, राजु तलमलेसह पारडी व मोहाडी येथील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मोहाडीचे ठानेदार जोतीराम गुंजवटे, सहायक पोलीस निरीक्षक सुहास चौधरी, तलाठी इत्यादींनी घटना स्थळावर पोहचून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. कुरण म्हणजेच गुराढोरांचा चारा व इतर साहित्य जळाल्यामुळे या शेतकऱ्यांना मोठा मानसिक आघात बसलेला आहे. त्यामुळे शासनाने या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असुन तसे निवेदन आमदार चरण वाघमारे, जिल्हाधिकारी, तहसिलदार तालुका कृषी अधिकारी मोहाडी इत्यादींना देण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)
१०० एकर शेतीत वणवा पेटला
By admin | Updated: April 18, 2016 00:26 IST