शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

दहा महिन्यात 243 अपघातात जिल्ह्यात 117 जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 05:00 IST

भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासह इतर राज्यमार्गावर दररोज कुठे ना कुठे अपघाताची नोंद होते. जिल्ह्यात सर्वाधिक अपघात दुचाकीचे असल्याचे दिसून येते. बहुतांश अपघात समोरील वाहनांना ओव्हरटेक करताना झाल्याचे दिसून येते. नियमांचे पालन न करता अनियंत्रीत वेगाने वाहन चालविणेही अपघाताचे मुख्य कारण आहे. दुचाकीच्या अपघातात हेल्मेट नसणे आणि मोबाईलवर बोलणे हे मुख्य कारण आहे.

ठळक मुद्दे२२३ जखमी : लाॅकडाऊननंतर अपघातांची संख्या घटली

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  अनियंत्रीत वेगाने वाहन चालविणे आणि नियमांचे उल्लंघन केल्याने जिल्ह्यात दहा महिन्यात २४३ अपघातांची नोंद झाली असून त्यात ११७ जणांना आपला जीव गमवावा लागला तर २२३ जण गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे कोरोना लाॅकडाऊननंतर जिल्ह्यात अपघातांची संख्या घटली असुन एप्रिल महिन्यात तर केवळ ९ अपघातांची नोंद झाली होती.भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासह इतर राज्यमार्गावर दररोज कुठे ना कुठे अपघाताची नोंद होते. जिल्ह्यात सर्वाधिक अपघात दुचाकीचे असल्याचे दिसून येते. बहुतांश अपघात समोरील वाहनांना ओव्हरटेक करताना झाल्याचे दिसून येते. नियमांचे पालन न करता अनियंत्रीत वेगाने वाहन चालविणेही अपघाताचे मुख्य कारण आहे. दुचाकीच्या अपघातात हेल्मेट नसणे आणि मोबाईलवर बोलणे हे मुख्य कारण आहे. जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात जिल्ह्यात २४३ अपघाताची नोंद झाली. त्यात तब्बल १२० अपघात दुचाकीचे आहेत. या अपघातात ११७ व्यक्तींचा बळी गेला. तर २२३ व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. जिल्हा पोलीस दलासह वाहतूक शाखेच्या वतीने अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अपघात प्रवण स्थळांची ओळख पटुन ब्लॅकस्पाॅट तयार करण्यात आले आहेत. जिल्ह्यात ३६ ब्लॅकस्पाॅट असून या ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत. वर्दळीच्या ठिकाणी आणि शाळा महाविद्यालयांसमोर गतीरोधकांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र यानंतरही नागरिक नियमांचे पालन करताना दिसत नाही. त्यामुळे प्रामुख्याने अपघात होतात. मद्य प्राशन करुन वाहन चालविल्याने अपघाताचे प्रमाणही मोठे आहे. जिल्ह्यात जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यात ७१ अपघातांची नोंद झाली आहे. मात्र मार्च महिन्यापासून कोरोना संसर्ग वाढायला लागला. एप्रिल महिन्यापासून लाॅकडाऊन सुरु झाले. तेव्हापासुन अपघातांची संख्या घटल्याचे दिसते. एप्रिल महिन्यात तर संपुर्ण लाॅकडाऊन होते. या महिन्यात केवळ नऊ अपघात होऊन चौघांचा मृत्यू झाला आणि सात जण जखमी झाले. मे, जून, जुलै या महिन्यातही अपघाताचे प्रमाण कमी दिसून येत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन केले तर अपघात टाळता येऊ शकतात. परंतु वाहन चालविताना सर्वांनाच विसर पडतो. स्वत:सोबतच इतरांचाही जीव धोक्यात घालतात.

अनियंत्रीत वेगच अपघाताला कारणीभूतजिल्ह्यात आतापर्यंत घडलेल्या अपघाताला अनियंत्रीत वेगच कारणीभूत असल्याचे पुढे आले आहे. राष्ट्रीय महामार्गावरुन सुसाट वेगाने वाहन चालविले जाते. उजव्या बाजूऐवजी डाव्या बाजूने ओव्हरटेक केले जाते. त्यामुळेही अपघात होतात. दुचाकीच्या अपघातात मोबाईलवर बोलणे आणि हेल्मेटचा वापर न करणे कारण आहे. 

 

टॅग्स :Accidentअपघात