शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

दहा महिन्यात 243 अपघातात जिल्ह्यात 117 जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 05:00 IST

भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासह इतर राज्यमार्गावर दररोज कुठे ना कुठे अपघाताची नोंद होते. जिल्ह्यात सर्वाधिक अपघात दुचाकीचे असल्याचे दिसून येते. बहुतांश अपघात समोरील वाहनांना ओव्हरटेक करताना झाल्याचे दिसून येते. नियमांचे पालन न करता अनियंत्रीत वेगाने वाहन चालविणेही अपघाताचे मुख्य कारण आहे. दुचाकीच्या अपघातात हेल्मेट नसणे आणि मोबाईलवर बोलणे हे मुख्य कारण आहे.

ठळक मुद्दे२२३ जखमी : लाॅकडाऊननंतर अपघातांची संख्या घटली

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  अनियंत्रीत वेगाने वाहन चालविणे आणि नियमांचे उल्लंघन केल्याने जिल्ह्यात दहा महिन्यात २४३ अपघातांची नोंद झाली असून त्यात ११७ जणांना आपला जीव गमवावा लागला तर २२३ जण गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे कोरोना लाॅकडाऊननंतर जिल्ह्यात अपघातांची संख्या घटली असुन एप्रिल महिन्यात तर केवळ ९ अपघातांची नोंद झाली होती.भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासह इतर राज्यमार्गावर दररोज कुठे ना कुठे अपघाताची नोंद होते. जिल्ह्यात सर्वाधिक अपघात दुचाकीचे असल्याचे दिसून येते. बहुतांश अपघात समोरील वाहनांना ओव्हरटेक करताना झाल्याचे दिसून येते. नियमांचे पालन न करता अनियंत्रीत वेगाने वाहन चालविणेही अपघाताचे मुख्य कारण आहे. दुचाकीच्या अपघातात हेल्मेट नसणे आणि मोबाईलवर बोलणे हे मुख्य कारण आहे. जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात जिल्ह्यात २४३ अपघाताची नोंद झाली. त्यात तब्बल १२० अपघात दुचाकीचे आहेत. या अपघातात ११७ व्यक्तींचा बळी गेला. तर २२३ व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. जिल्हा पोलीस दलासह वाहतूक शाखेच्या वतीने अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अपघात प्रवण स्थळांची ओळख पटुन ब्लॅकस्पाॅट तयार करण्यात आले आहेत. जिल्ह्यात ३६ ब्लॅकस्पाॅट असून या ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत. वर्दळीच्या ठिकाणी आणि शाळा महाविद्यालयांसमोर गतीरोधकांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र यानंतरही नागरिक नियमांचे पालन करताना दिसत नाही. त्यामुळे प्रामुख्याने अपघात होतात. मद्य प्राशन करुन वाहन चालविल्याने अपघाताचे प्रमाणही मोठे आहे. जिल्ह्यात जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यात ७१ अपघातांची नोंद झाली आहे. मात्र मार्च महिन्यापासून कोरोना संसर्ग वाढायला लागला. एप्रिल महिन्यापासून लाॅकडाऊन सुरु झाले. तेव्हापासुन अपघातांची संख्या घटल्याचे दिसते. एप्रिल महिन्यात तर संपुर्ण लाॅकडाऊन होते. या महिन्यात केवळ नऊ अपघात होऊन चौघांचा मृत्यू झाला आणि सात जण जखमी झाले. मे, जून, जुलै या महिन्यातही अपघाताचे प्रमाण कमी दिसून येत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन केले तर अपघात टाळता येऊ शकतात. परंतु वाहन चालविताना सर्वांनाच विसर पडतो. स्वत:सोबतच इतरांचाही जीव धोक्यात घालतात.

अनियंत्रीत वेगच अपघाताला कारणीभूतजिल्ह्यात आतापर्यंत घडलेल्या अपघाताला अनियंत्रीत वेगच कारणीभूत असल्याचे पुढे आले आहे. राष्ट्रीय महामार्गावरुन सुसाट वेगाने वाहन चालविले जाते. उजव्या बाजूऐवजी डाव्या बाजूने ओव्हरटेक केले जाते. त्यामुळेही अपघात होतात. दुचाकीच्या अपघातात मोबाईलवर बोलणे आणि हेल्मेटचा वापर न करणे कारण आहे. 

 

टॅग्स :Accidentअपघात