शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाने हटविले जिल्हाभरातील २२५२ फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 06:00 IST

विधानसभा निवडणूक काळात सोशल मिडीयाचा वापर करणाऱ्यांवर सायबर सेलची करडी नजर राहणार आहे. आक्षेपार्ह मजकूर आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम व इतर सोशल साईटवर निवडणूक काळात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणे बेकायदेशीर आहेत. नागरिकांनी संदेश काळजीपूर्वक वाचूनच फॉरवर्ड करावेत.

ठळक मुद्देचौकांनी घेतला मोकळा श्वास : आदर्श आचार संहितेअंतर्गत कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच प्रशासनाने आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासाठी जिल्ह्यातील चौकाचौकात लावलेले २२५२ फलक हटविले आहेत. यात होर्डींग, बॅनर, पोस्टर आणि पॉम्प्लेटचा समावेश आहे. यामुळे गजबजलेल्या चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे.विधानसभा निवडणुकीची शनिवारी घोषणा होताच आदर्श आचारसंहिता सुरु झाली. आचारसंहितेचे काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.नरेश गिते यांनी दिले.या पार्श्वभूमीवर जिल्हापरिषद, नगरपरिषद क्षेत्रातील सार्वजनिक, खासगी व शासकीय कार्यालय परिसरात असलेले होर्डींग, बॅनर, पोस्टर्स ४८ तासाच्या आत हटविण्याची कारवाई निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. साकोली, तुमसर आणि भंडारा विधानसभा क्षेत्रातील तब्बल २२५२ फलक हटविण्यात आले आहेत.तुमसर क्षेत्रात सर्वाधिक १५४९, साकोली ५२४ आणि भंडारा क्षेत्रात १७९ फलकांचा समावेश आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होईल अशा स्वरुपाचे बॅनर, पोस्टर्स, फलक लावण्यावर मनाई करण्यात आली आहे.शासकीय परिसरात लावण्यात आलेले २४ तास, सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले ४८ तास आणि खासगी ठिकाणी लावण्यात आलेले फलक ७२ तासात हटविण्याचे निर्देश निवडणूक आयोगाचे आहेत. या आदेशान्वये जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रातील उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात आली. हटविण्यात आलेल्या जागेवरील फलक पुन्हा लागणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.शहरी भागासह ग्रामीण भागात नेत्यांच्या वाढदिवसापासून ते विविध कार्यक्रमांचे फलक लावण्यात आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतरही महिनोंमहिने फलक दिसून येत होते. आता आदर्श आचारसंहितेने सर्व फलक काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे गजबजलेल्या चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे.सोशल मीडियावर सायबर सेलची नजरविधानसभा निवडणूक काळात सोशल मिडीयाचा वापर करणाऱ्यांवर सायबर सेलची करडी नजर राहणार आहे. आक्षेपार्ह मजकूर आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम व इतर सोशल साईटवर निवडणूक काळात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणे बेकायदेशीर आहेत. नागरिकांनी संदेश काळजीपूर्वक वाचूनच फॉरवर्ड करावेत. कुठल्याही व्यक्तीची, समाजाची, धर्माची, महिलांची, राजकीय व्यक्तींची प्रतिमा मलीन होईल असे मॅसेज फॉरवर्ड करू नये. विशेष म्हणजे सोशल मिडीयावरील मॅसेजला सायबर सेल मॉनीटरींग करणार आहे. अनावधानाने सुद्धा पोस्ट लाईक किंवा शेअर करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019