शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

वास्तूदोष दूर ठेवण्यासाठी घरात आवराआवर करताना स्वच्छतेचे 'हे' नियम अवश्य पाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 17:25 IST

वास्तूमध्ये मंगल लहरी निर्माण होण्यासाठी प्रसन्न संगीत, सुगंध, फुलझाडं यांचा वापर करा. मंद स्वरात देवाचा नामजप सुरु ठेवा. त्यामुळे वातावरणात सहजता राहते. 

आपले घर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण सगळेच जण रोज प्रयत्न करतो. स्वच्छ घरात वातावरण प्रसन्न राहते आणि प्रसन्न वातावरणामुळे मनही प्रसन्न राहते. म्हणजेच स्वच्छतेचा परिणाम थेट आपल्या तना-मनावर होत असतो. यासाठी वास्तू शास्त्रात दिलेले पुढील नियम अवश्य पाळा. त्याचा लाभ होऊन वास्तू दोष निर्माण होणार नाहीत आणि असल्यास दूर होतील. 

ब्रह्म मुहूर्तावर आणि तिन्ही सांजेला घरात केर काढू नये. हे दोन्ही मुहूर्त लक्ष्मीच्या आगमनाचे मुहूर्त मानले जातात. त्यामुळे स्वच्छता करायची असल्यास या मुहूर्ताच्या आधी किंवा नंतर केर काढावा. 

घरातील कोपरे स्वच्छ ठेवावेत. विशेषतः ईशान्य, उत्तर, वायव्य या दिशांचे कोपरे स्वच्छ असावेत. 

घरात कचरा टाकू नका. घर नेहमी स्वच्छ ठेवा. तसेच केराचा डबा वेळच्या वेळी धुवून स्वच्छ ठेवा. 

गुरुवार सोडून आठवड्यातून एकदा पाण्यात मीठ टाकून घराची जागा पुसा. त्यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होईल. वादविवाद संपतील. तसेच लक्ष्मी घरात स्थिर राहील. 

घराच्या स्वच्छतेइतकेच घरातल्या प्रसाधन गृहालाही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. जाळे, जळमट लागू देऊ नका. तसेच तिथली फरशी स्वच्छ ठेवा. वास्तू मध्ये नकारात्मकता तिथून प्रवेश करते. म्हणून तेथील स्वच्छतेला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. 

घरात फार काळ अडगड साचू देऊ नका. अडगळ साचल्यामुळे घरात वाद विवाद होतात. घरातल्या लक्ष्मीचा क्षय होतो. घरात अडगळ असणे, हे वास्तूच्या दृष्टीने घातक मानले जाते. म्हणून पेपरची रद्दी असो नाहीतर जुन्या आणि वापरात नसलेल्या तुटक्या वस्तू असोत. त्यांची वेळोवेळी विल्हेवाट लावायला शिका. 

वास्तूमध्ये मंगल लहरी निर्माण होण्यासाठी प्रसन्न संगीत, सुगंध, फुलझाडं यांचा वापर करा. मंद स्वरात देवाचा नामजप सुरु ठेवा. त्यामुळे वातावरणात सहजता राहते. 

घराइतकाच महत्त्वाचा आहे घराचा उंबरठा. तो रोजच्या रोज स्वच्छ करून, शक्य असल्यास सायंकाळी उंबरठ्याजवळ दिवा लावून त्याची हळद कुंकू वाहून पूजा करा. तसेच रोज सकाळी दोन बोटं रांगोळी काढा. तो लक्ष्मीच्या आगमनाचा मार्ग असल्याने तेथील स्वच्छताही महत्त्वाची आहे. 

नीटनेटके आवरलेले घर जसे आपल्याला आवडते, तसे देवालाही आवडते. अशा घरात सुख, शांती, समृद्धी सदैव नांदते.