शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आपण फक्त प्रयत्न करायचे बाकी भार देवावर सोडून द्यायचा; तो सगळं सांभाळून घेतो; वाचा महाभारतातील प्रसंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 13:23 IST

आयुष्याच्या युद्धभूमीवर तग धरून राहायचे असेल तर प्रयत्नांना पर्याय नाही!

प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. परंतु, जिथे प्रयत्न संपतात, तिथे देवावर आणि दैवावर भार टाकण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच उरत नाही. जो प्रयत्न करतो, त्याला परमेश्वर साथ देतो. म्हणून प्रयत्नांती परमेश्वर म्हटले आहे. कोणत्याही अवघड परिस्थितीत आपण प्रयत्नच केले नाहीत, ही खंत मनात राहता कामा नये. यासाठी आधी प्रयत्न करा, बाकी परमेश्वरावर सोपवा, जसे या छोट्याशा चिऊताईने सोपवले.

महाभारताचा प्रसंग होता. कुरुक्षेत्राची तयारी केली जात होती. कुठे काही खड्डे, खाच खळगे राहिले नाहीत ना, याची पाहणी करण्यासाठी स्वत: भगवान श्रीकृष्ण अर्जुनासह कुरुक्षेत्रावर पोहोचले. तेवढ्यात एक चिमणी उडत उडत श्रीकृष्णाजवळ आली. ती म्हणाली, 'भगवंता, या मनुष्यांच्या भांडणात आम्हा मूक जीवांना शिक्षा का? मी आणि माझी पिले कुणाच्याही अध्यात मध्यात नसताना या समराचे दुष्पपरिणाम आमच्या कुटुंबालाही झेलावे लागत आहेत. तुमच्या हत्तीदळातल्या एका हत्तीने एका ढुशात रणभूमीवरील झाड पाडले आणि झाडावरील माझे घरटे पिलांसकट जमीनिवर आले. माझ्या तान्ह्या बाळांना घेऊन मी कुठे जाऊ? भगवंता आता तुमच्याच आशेवर आम्ही आहोत. असे म्हणत चिमणी निघून गेली. श्रीकृष्णाचे डोळे पाणावले. अर्जुनाने कारण विचारले. श्रीकृष्ण काहीच बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशीपासून युद्ध सुरू होणार होते.

सगळे रणधुरंधर कुरुक्षेत्रावर पोहोचले. त्यावेळेस श्रीकृष्णाला चिमणीची आठवण झाली. युद्ध सुरू झाले, की ते इवलेसे जीव हकनाक बळी पडतील. या विचाराने कृष्णाने अर्जुनाच्या हातातील धनुष्य आणि बाण घेतले आणि दूर अंतरावर उभ्या असलेल्या हत्तीवर निशाणा धरला. हे पाहून अर्जुनाने कृष्णाला आठवण करून दिली, `भगवंता तुम्ही शस्त्र हाती घेणार नाही, असे वचन घेतले आहे.'

यावर श्रीकृष्णांनी काही न बोलता बाण सोडला. तो बाण हत्तीला न लागता त्याच्या गळ्यातल्या घंटेला लागला आणि गळ्यातली दोरी तुटून घंटा जमीनिवर पडली. काही काळात घमासान युद्ध सुरू झाले. तब्बल अठरा दिवस चालले. अनेकांचे प्राण गेले. कौरव संपले. पांडव जिंकले. 

दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण आणि अर्जुन पुन्हा रणभूमीची पाहणी करण्यासाठी निघाले. कुरुक्षेत्रावर रक्त मांसाचा चिखल पडलेला. ते पाहून अर्जुनाचे मन विदीर्ण झाले. एके ठिकाणी कृष्णाने रथ थांबवून अर्जुनाला रथापुढे आलेली घंटा उचलायला सांगितली. अर्जुनाने प्रतिप्रश्न न करता रथातून उतरून जड घंटा उचलली. घंटा उचलताच त्यातून चिमणी आणि तिची पिल्लं भेदरलेल्या अवस्थेत दिसली. एवढ्या मोठ्या गदारोळातही या इवल्याशा जिवांना जीवदान कसे मिळाले, या विचाराने आश्चर्यचकित होत अर्जुनाने कृष्णाकडे पाहिले, तर त्यावेळेस त्या पिलांची आई उडत कृष्णाजवळ आली आणि त्यांचे जीव वाचवल्याबद्दल आभार मानत होती. 'भगवंता, जे कोणीही करू शकले नसते, ते तू करून दाखवलेस. आमच्यासारख्या चिमुकल्या भक्तांची एवढ्या कठीण प्रसंगात काळजी घेतलीस. माझा विश्वास आणि माझी भक्ती राखलीस. जसा माझ्या मदतीला धावून आलास, तसाच प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून जा. त्यांचे रक्षण कर आणि त्यांच्या प्रयत्नांना, जगण्याच्या उम्मेदीला बळ दे...!'

चिमणीचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आपणही प्रयत्नांची पराकाष्टा केली पाहिजे. तरच आयुष्याच्या युद्धभूमीवर आपणही तग धरून जिवंत राहू शकू.