शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
3
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
4
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
5
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
6
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
7
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
8
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
9
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
10
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
11
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
12
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
13
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
14
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

World environment day 2022: 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' या अभंगातून समजून घेऊया तुकोबारायांचा पर्यावरणविषयक दूरदृष्टीकोन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 07:00 IST

World environment day 2022: आपल्या संतांनी अणुरेणूसकट सर्व चराचराचा किती दूरदृष्टीने विचार केला होता हे या अभंगावरून कळते!

लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण व्हावी, यासाठी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. परंतु, वृक्षवल्ली अन्य कोणी नसून आपलेच सोयरे म्हणजे नातेवाईक आहेत, ही जाणीव आमच्या संतांनी, संस्कृतीने फार आधीपासूनच आमच्या मनात खोलवर रुजवली आहेत. म्हणूनच तुळशीची पूजा, शंकराला बेल, वडाला प्रदक्षिणा, मंगलकार्यात केळीचे खांब, जेवणानंतर गोविंदविडा इ. वृक्षवल्ली अर्थात पर्यावरणाशी निगडित गोष्टी आपल्या आयुष्याच्या अविभाज्य भाग बनल्या आहेत. 

आपल्या संस्कृतीने नदीला पावित्र्य, पृथ्वीला मातृत्त्व, निसर्गाला पितृत्त्व, डोंगरदNयांना बंधुत्त्व बहाल करून मानवाची नाळ निसर्गाशी जोडलेली आहे. मातीतून जन्माला येत, मातीतच आपण मिसळणार आहोत याची जाणीव दिली आहे. त्यामुळे पर्यावरणाचा विचार आपल्या मनात असतोच, फक्त त्याला खतपाणी घालण्यासाठी आजच्या दिवसाचे औचित्य!

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज तर अशा विशेष दिनाची वाट न पाहता वृक्षवल्लींशी थेट घरोबा करतात. शेवटी तेही संसारी माणूसच. संसारी व्यक्ती नातीगोती, प्रपंच, गणगोत याशिवाय राहू शकत नाही. परंतु संतांचा संसारही वेगळा. विषयासक्त नसलेला. म्हणून तर ते निसर्गाशी सोयरिक जोडून म्हणत आहेत,

वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे,पक्षीही सुस्वरे आळविती।

नातेवाईक म्हटले की रुसवे फुगवे , कुरबुरी, राग मत्सर या गोष्टी आल्याच. परंतु तुकोबा रायांचे नातेवाईक सुस्वरात गातात, बोलतात, आनंदाने जगतात व दुसऱ्यांनाही आनंदाने जगायला शिकवतात. 

येणे सुखे रूचे एकान्ताचा वास,नाही गुणदोष अंगा येत।

त्यांच्या सान्निध्यात येण्याने कपाळावर आठ्या येत नाहीत, तर सुखांताचा सहवास लाभतो. त्यांच्याशी बोलून मन रिते होते. गुणदोष अंगाला लागत नाहीत, उलट आत्मानंदाची अनुभूती होते.

आकाश मंडप पृथुवी आसन,रमे तेथे मन क्रिडा करी।

या नातेवाईकांची श्रीमंती तर पहा, आकाश मंडप आणि पृथ्वी आसन आहे. भव्य-दीव्य महालच जणू. परंतु या श्रीमंतीचे मनावर दडपण येत नाही, उलट मन तिथे रमते, मुक्त होते.

कंथाकमंडलु देहउपचारा,जाणवितो वारा अवसरू।

निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर आपल्या नेमक्या गरजा किती याची जाणीव होते. देहरक्षणापुरते कपडे आणि देहउपचाराकरिता पाण्याचा कमंडलू. बाकी गरजांची आठवणही होत नाही. वेळ-काळ याची भान राहत नाही. पण वाहता वारा आणि निसर्गाचे चक्र वेळेचे भान करून देतो.

हरिकथा भोजन परवडी विस्तार,करोनि प्रकार सेवो रुचि।

या नातेवाईकांच्या गोतावळ्यात गेलो, की तहान भूक हरपून जाते. वृक्षवेली, वनचरे हरिकथा हेच भोजन म्हणून सेवन करतात आणि त्यांच्यामुळे आम्हालाही हरिकथेचे विविध प्रकार रुचकर वाटू लागतात.

तुका म्हणे होय मनासि संवाद,आपुलाचि वाद आपणांसि।

आजही मानसिक स्वास्थ्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जा, हवापालट करा, असा वैद्यकिय सल्ला दिला जातो. काळापुढे जाऊन तुकाराम महाराज हेच पथ्य पाळायला सांगत आहेत. निसर्ग आपल्याशी बोलत नाही पण आपणच आपल्याशी संवाद साधायला शिकवतो. त्या एकांतात आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. मन:शांती मिळत़े म्हणून प्रापंचिक नातेवाईकांबरोबर वृक्षवेलींशी सोयरिक जुळवून घ्या आणि दरदिवस पर्यावरण दिवस म्हणून साजरा करा, हीच या अभंगाची फलश्रुती!

टॅग्स :World Environment DayWorld Environment Day