शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

पन्नाशीनंतर वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मनुष्याची शांती का केली जाते? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 13:02 IST

पन्नास ते शंभर वर्षांपर्यतच्या कालावधीत दर पाच वर्षांनी एक, अशी या शांतीची आखणी केली आहे. ही शांती करण्याचे महत्त्व जाणून घ्या.

साठीशांत, हा शब्द बहुतेकांच्या परिचयाचा आहे. अशाच स्वरूपाच्या वेगवेगळ्या शांती पन्नाशीनंतर कराव्यात, असे शास्त्राने सांगून ठेवलेले आहे. शांती करणे हा एक आचार आहे.

अथर्ववेदातील तिसऱ्या कांडातील काही मंत्रांचा भावार्थ असा सांगितला आहे, की होम हवनामुळे रोग व्याधी यांचा नाश होतो, दु:खाचा नाश होतो. ऐश्वर्यप्राप्ती होते, दीर्घायुष्याचा लाभ होतो आणि मुख्य म्हणजे शांतीचाही लाभ होतो.

हे सगळे फायदे आपल्याला मिळावेत असे कुणाला वाटणार नाही? जन्मापासून ते वयाच्या वीस पंचवीस वर्षांपर्यंत स्त्री पुरुषांचा काळ बाल्यावस्था व नंतर शिक्षण यामध्ये जात असतो. विशी पंचविशीचे सुमारास शिक्षण संपवून तो अर्थार्जन करू लागतो आणि विवाहबद्ध होतो. तेव्हापासून ते पन्नास वर्षाचा होईपर्यंत त्याचा काळ हा स्थूलमानाने चढत्या क्रमाने कर्तृत्वाचा असतो आणि पन्नाशीला सर्वसाधारणपणे त्याचा संसार पूर्ण होऊन त्याच्या जीवनाची वाटचाल उतरत्या दिशेकडे सुरू होत असते. 

उतरत्या दिशेकडे झुकू लागण्याच्या त्याच्या या वयापासून आपल्या शास्त्रकारांनी वेगवेगळ्या शांती सांगितलेल्या आहेत. पन्नास ते शंभर वर्षांपर्यटच्या कालावधीत दर पाच वर्षांनी एक, अशी या शांतीची आखणी केली आहे. त्याला वेगवेगळी नावेदेखील आहे. त्याबद्दल सविस्तर चर्चा पुन्हा कधी तरी...शांतीचे प्रयोजन समजून घेणे हा या लेखामागील हेतू आहे.

मानवी जीवनात संकटे, अरिष्टे कुणाला येत नाहीत? देव देवताही यापासून दूर राहू शकल्या नाहीत, मग मानवाची काय कथा? दुष्ट ग्रह, आरोग्य बिघडणे, दुष्काळ, साथीचे रोग, किडीचा उपद्रव, वाईट स्वप्न पडणे, धन जाणे वगैरे प्रकारच्या अनेक अरिष्टांना माणसाला तोंड द्यावे लागते. परंतु या संकटांशी माणूस मुकाबला करीत असताना त्याला दैवी पाठबळ मिळाले, तर त्याला उत्तम गती मिळते, हा शांतीमागील प्रधान हेतू आहे. 

(माहिती स्रोत : लेखक गजानन खोले यांच्या कुळधर्म कुळाचार कुलदैवत पुस्तकातून साभार)