शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पन्नाशीनंतर वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मनुष्याची शांती का केली जाते? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 13:02 IST

पन्नास ते शंभर वर्षांपर्यतच्या कालावधीत दर पाच वर्षांनी एक, अशी या शांतीची आखणी केली आहे. ही शांती करण्याचे महत्त्व जाणून घ्या.

साठीशांत, हा शब्द बहुतेकांच्या परिचयाचा आहे. अशाच स्वरूपाच्या वेगवेगळ्या शांती पन्नाशीनंतर कराव्यात, असे शास्त्राने सांगून ठेवलेले आहे. शांती करणे हा एक आचार आहे.

अथर्ववेदातील तिसऱ्या कांडातील काही मंत्रांचा भावार्थ असा सांगितला आहे, की होम हवनामुळे रोग व्याधी यांचा नाश होतो, दु:खाचा नाश होतो. ऐश्वर्यप्राप्ती होते, दीर्घायुष्याचा लाभ होतो आणि मुख्य म्हणजे शांतीचाही लाभ होतो.

हे सगळे फायदे आपल्याला मिळावेत असे कुणाला वाटणार नाही? जन्मापासून ते वयाच्या वीस पंचवीस वर्षांपर्यंत स्त्री पुरुषांचा काळ बाल्यावस्था व नंतर शिक्षण यामध्ये जात असतो. विशी पंचविशीचे सुमारास शिक्षण संपवून तो अर्थार्जन करू लागतो आणि विवाहबद्ध होतो. तेव्हापासून ते पन्नास वर्षाचा होईपर्यंत त्याचा काळ हा स्थूलमानाने चढत्या क्रमाने कर्तृत्वाचा असतो आणि पन्नाशीला सर्वसाधारणपणे त्याचा संसार पूर्ण होऊन त्याच्या जीवनाची वाटचाल उतरत्या दिशेकडे सुरू होत असते. 

उतरत्या दिशेकडे झुकू लागण्याच्या त्याच्या या वयापासून आपल्या शास्त्रकारांनी वेगवेगळ्या शांती सांगितलेल्या आहेत. पन्नास ते शंभर वर्षांपर्यटच्या कालावधीत दर पाच वर्षांनी एक, अशी या शांतीची आखणी केली आहे. त्याला वेगवेगळी नावेदेखील आहे. त्याबद्दल सविस्तर चर्चा पुन्हा कधी तरी...शांतीचे प्रयोजन समजून घेणे हा या लेखामागील हेतू आहे.

मानवी जीवनात संकटे, अरिष्टे कुणाला येत नाहीत? देव देवताही यापासून दूर राहू शकल्या नाहीत, मग मानवाची काय कथा? दुष्ट ग्रह, आरोग्य बिघडणे, दुष्काळ, साथीचे रोग, किडीचा उपद्रव, वाईट स्वप्न पडणे, धन जाणे वगैरे प्रकारच्या अनेक अरिष्टांना माणसाला तोंड द्यावे लागते. परंतु या संकटांशी माणूस मुकाबला करीत असताना त्याला दैवी पाठबळ मिळाले, तर त्याला उत्तम गती मिळते, हा शांतीमागील प्रधान हेतू आहे. 

(माहिती स्रोत : लेखक गजानन खोले यांच्या कुळधर्म कुळाचार कुलदैवत पुस्तकातून साभार)