शहरं
Join us  
Trending Stories
1
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
2
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
3
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
4
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
5
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
6
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
7
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
8
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
9
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
10
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
11
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
13
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
14
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
15
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
16
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
17
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
19
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
20
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली

पन्नाशीनंतर वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मनुष्याची शांती का केली जाते? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 13:02 IST

पन्नास ते शंभर वर्षांपर्यतच्या कालावधीत दर पाच वर्षांनी एक, अशी या शांतीची आखणी केली आहे. ही शांती करण्याचे महत्त्व जाणून घ्या.

साठीशांत, हा शब्द बहुतेकांच्या परिचयाचा आहे. अशाच स्वरूपाच्या वेगवेगळ्या शांती पन्नाशीनंतर कराव्यात, असे शास्त्राने सांगून ठेवलेले आहे. शांती करणे हा एक आचार आहे.

अथर्ववेदातील तिसऱ्या कांडातील काही मंत्रांचा भावार्थ असा सांगितला आहे, की होम हवनामुळे रोग व्याधी यांचा नाश होतो, दु:खाचा नाश होतो. ऐश्वर्यप्राप्ती होते, दीर्घायुष्याचा लाभ होतो आणि मुख्य म्हणजे शांतीचाही लाभ होतो.

हे सगळे फायदे आपल्याला मिळावेत असे कुणाला वाटणार नाही? जन्मापासून ते वयाच्या वीस पंचवीस वर्षांपर्यंत स्त्री पुरुषांचा काळ बाल्यावस्था व नंतर शिक्षण यामध्ये जात असतो. विशी पंचविशीचे सुमारास शिक्षण संपवून तो अर्थार्जन करू लागतो आणि विवाहबद्ध होतो. तेव्हापासून ते पन्नास वर्षाचा होईपर्यंत त्याचा काळ हा स्थूलमानाने चढत्या क्रमाने कर्तृत्वाचा असतो आणि पन्नाशीला सर्वसाधारणपणे त्याचा संसार पूर्ण होऊन त्याच्या जीवनाची वाटचाल उतरत्या दिशेकडे सुरू होत असते. 

उतरत्या दिशेकडे झुकू लागण्याच्या त्याच्या या वयापासून आपल्या शास्त्रकारांनी वेगवेगळ्या शांती सांगितलेल्या आहेत. पन्नास ते शंभर वर्षांपर्यटच्या कालावधीत दर पाच वर्षांनी एक, अशी या शांतीची आखणी केली आहे. त्याला वेगवेगळी नावेदेखील आहे. त्याबद्दल सविस्तर चर्चा पुन्हा कधी तरी...शांतीचे प्रयोजन समजून घेणे हा या लेखामागील हेतू आहे.

मानवी जीवनात संकटे, अरिष्टे कुणाला येत नाहीत? देव देवताही यापासून दूर राहू शकल्या नाहीत, मग मानवाची काय कथा? दुष्ट ग्रह, आरोग्य बिघडणे, दुष्काळ, साथीचे रोग, किडीचा उपद्रव, वाईट स्वप्न पडणे, धन जाणे वगैरे प्रकारच्या अनेक अरिष्टांना माणसाला तोंड द्यावे लागते. परंतु या संकटांशी माणूस मुकाबला करीत असताना त्याला दैवी पाठबळ मिळाले, तर त्याला उत्तम गती मिळते, हा शांतीमागील प्रधान हेतू आहे. 

(माहिती स्रोत : लेखक गजानन खोले यांच्या कुळधर्म कुळाचार कुलदैवत पुस्तकातून साभार)