शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

पती-पत्नीनं चुकूनही करू नये एका ताटात जेवण! पितामह भिष्म यांनी सांगितलं होतं या मागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 22:50 IST

कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून भोजन करायला हवे. यामुळे कुटुंबात परस्पर प्रेम वाढते. पण असं अन्न चुकूनही खाऊ नेय...

बहुतेक घरांमध्ये पती-पत्नी एकाच ताटात जेवण करतात. एका ताटात जेवण केल्याने परस्पर प्रेम वाढते, असे त्यांना वाटते. तथापि, वडीलधारी मंडळी आणि धर्मशासत्राचे जाणकारही सांगतात, की पती-पत्नीने एका ताटात जेवण करू नये. पण असे का म्हटले जाते? या संदर्भात लोकांना अनेकदा माहिती नसते. खरे तर, महाभारतातही याचा उल्लेख करण्यात आला आहे. तर जाणून घेऊया पती-पत्नीने एका ताटात का जेवू नये.

पती-पत्नीने एकाताटात जेवण करू नये... -एकत्र जेवण केल्याने प्रेम वाढते, हे मुळीच नाकारता येणार नाही. पितामह भीष्म यांनाही हे माहीत होते. पण त्यांचे म्हणणे होते, की प्रत्येक व्यक्तीची त्याच्या कुटुंबाप्रती अनेक कर्तव्ये असतात. यामुळे, जर ही कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडायची असतील आणि कुटुंबात सौहार्दपूर्ण संबंध ठेवायचे असतील, तर पती-पत्नीने एका ताटात जेवण करू नये. खरे तर, पत्नीसोबत एका ताटात जेवण केल्याने पतीसाठी, कुटुंबातील इतर नातेसंबंधांच्या तुलनेत तिच्याबद्दलचे प्रेम सर्वोपरि होते. यामुळे व्यक्तीची बुद्धी भ्रष्ट होते आणि तो योग्य आणि अयोग्य यात फरक करू शकत नाही. जर पतीचे पत्नीवरील प्रेम सर्वोपरि झाले तर कुटुंबात विसंवादाची स्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे पत्नीसोबत ताटात जेवण करू नये.

कुटुंबाने सोबत बसून जेवण करायला हवे - कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून भोजन करायला हवे. यामुळे कुटुंबात परस्पर प्रेम वाढते. सोबतच एकमेकांप्रती त्याग आणि समर्पण भावनाही प्रबळ असते. यामुळे कुटुंबाची प्रगतीही होते, असे भीष्म पितामह यांचे मत होते. असं अन्न चुकूनही खाऊ नेय - भीष्म पितामह यांच्या मते, जर कुणी जेवणाचे ताट ओलांडले तर ते चिखलाप्रमाणे दूषित होते. ते जनावरांना द्यायला हवे. याशिवाय, जर कुणी जेवणाच्या ताटाला पाय मारून गेले, तर अशा अन्नाला हात जोडून नमस्कार करावा व ते टाकून द्यावे. असे अन्न दारिद्र आणते.

 

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारfoodअन्नFamilyपरिवार