शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

नदी किंवा संगमाला नमस्कार का करावा? केवळ प्रथा म्हणून नाही, जाणून घ्या त्यामागचा अर्थ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 17:36 IST

लहानात लहान कृतीमागे पूर्वजांचा दूरदृष्टीने केलेला विचार जाणून घ्यायचा असेल, तर केवळ कृती न करता त्याचा भावार्थ जाणून घेण्याची जिज्ञासा कायम ठेवा!

>> हृषीकेश श्रीकांत वैद्य 

आपण पूर्वी बघितले असेल की ट्रेन ने जाताना नदी किंवा खाडी (नदी - समुद्र संगम) लागला की बहुतांश लोकांचे हात आस्थेने जोडले जायचे. काही जण लहान मुलांना त्यात अर्पण करण्यासाठी नाणी द्यायचे. तर, आपले पूर्वज नक्की का करायचे असं? तर, संगम किंवा नदी हे जीव आणि शिवाच्या एकरूप होण्याचे प्रतीक आहे. जसा सागरापासून बाष्पीभवनामुळे तयार झालेला ढग दूर गिरी पर्वतांवर जाऊन बरसतो, त्या प्रत्येक थेंबाला आपल्या मूळ स्वरूपात म्हणजेच सगरात एकरूप होण्याची ओढ लागलेली असते. अनेक पर्वतरांगा, दऱ्या, अरण्य, इ पार करत करत तो थेंब सागराच्या दिशेने धाव घेत असतो व अंततोगत्वा शेवटी तो सागराला जाऊन मिळतो त्यात एकरूप होतो. 

जसा एक छोटा थेंब जिद्दीने सागरात जाऊन एकरूप होतो  त्याचप्रमाणे आपला आत्मा हा त्याच्या मूळ तत्वात म्हणजेच परब्रह्म परमेश्वराशी एकरूप होवो ही नमस्कार करण्यामागची  भावना. आपल्या जीवनाचा नेमका उद्देश्य काय आहे? आपण जन्माला का आलो? आपण नक्की काय करत आहोत ? का करत आहोत ? नक्की काय करायला हवं ? काय साध्य करायला हवं ? हे प्रश्न जो पर्यंत आपल्याला पडत नाहीत व योग्य गुरूंकडून त्याची उत्तरे मिळत नाहीत तो पर्यंत आपला जन्म घेणेच व्यर्थ आहे ! 

गंगेपुढे मन शांत होते. गंगा हे परमेश्वराचे चिन्ह आहे. गंगास्नानाने पापक्षालन होते. परंतु त्यासाठी आपला भाव चांगला असावा लागतो. या गंगास्नानाचे दुसरे महत्त्व असे की, आपल्या पाठीमागे कायम ग्रहपीडा असते. कोणाला शनीपीडा, कोणाला मंगळ पीडा असते, या सर्व पीडा गंगेच्या पाण्याने कमी होत जातात. 

हिमालयात गंगेचा उगम होतो, त्या ठिकाणाला गंगोत्री म्हणतात. तेथूनच ती ऋषिकेश व हरिद्वारला येते. जेव्हा संधी मिळेल तेव्हा तिथे अवश्य जाऊन या. तोवर आपल्या हाती असलेले पाणी गंगेचे पुण्य स्मरण करून तीर्थ समजून प्या व पाण्याची नासाडी न होता ते जपून वापरा. आणि पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व लक्षात घेऊन नदी, संगम किंवा कोणताही जलस्त्रोत्र दिसल्यावर नतमस्तक जरूर व्हा!