शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

तेलाच्या दिव्यावर तुपाचा दिवा का लावू नये, त्यामागे आहे 'हे' कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 17:43 IST

दोन्ही प्रकारचे दिवे एकाच वेळेस लावले, तरी हरकत नाही, फक्त ते वेगवेगळ्या काडीने लावले पाहिजेत, ही बाब लक्षात ठेवावी. 

पूजेमध्ये समई, निरांजन, पणती, दिवे असे नानाविध प्रकार असतात. देव्हारा प्रकाशमान करणे एवढाच त्याचा हेतू असतो. तरीदेखील रोषणाई आकर्षक व्हावी, यासाठी लामणदिवा, दीपमाळा असे दिव्यांचे अनेक प्रकार पूजेमध्ये अंतर्भूत केले जातात. इतर दिवे उत्सवाच्या वेळी वापरले जातात, तर रोजच्या पूजेत समई आणि निरांजनाची वर्णी लागते. त्यातही समई तेलाची आणि निरांजन तुपाने लावण्याचा प्रघात आहे. समईची वात लांब असते तर निरांजनाची वात बसकी गोलाकार असते. निरांजनात एक वात, तर समईत दोनापेक्षा अधिक वाती लावल्या जातात. हे गुणोत्तर उलट करू नये.

यो गोष्टी रोजच्या निरीक्षणातल्या असूनही आपली आई, आजी आपल्याला दिवा लावताना नेहमी हटकते, `एकाच काडीने किंवा तेलाच्या दिव्याने तुपाचा दिवा लावू नको.' आपण त्यांचे म्हणणे ऐकतो, पण त्यामागचे शास्त्र समजून घेत नाही. चला जाणून घेऊ, तसे न करण्यामागचे कारण!

माणसांना ओवाळताना तेलाच्या दिव्याने ओवाळले जाते. त्याला आपण औक्षण म्हणतो. पुण्याहवाचन किंवा इतर वेळी औक्षण करताना तेलाचा दिवा वापरतात. पूर्वी पती युद्धावर जाताना त्याची पत्नी तेलाच्या दिव्याने ओवाळत असे. आजही वाढदिवसाच्या दिवशी मुलांना, मोठ्यांना ओवाळताना तेलाचा दिवा वापरला जातो. तुपाच्या दिव्याच्या तुलनेत तेलाचा दिवा बरात वेळ तेवत असतो. दिव्याच्या ज्योतीचा संबंध मनुष्याच्या आत्मज्योतीशी असल्यामुळे औक्षण करणारी व्यक्ती समोरील व्यक्तीच्या दीर्घायुष्याचे शुभचिंतन करत असते. बहीण भावाला ओवळताना, बायको नवऱ्याला ओवाळताना, आई मुलांना ओवाळताना हाच विचार मनात तेवत असतो. म्हणून औक्षणाच्या वेळेस तेलाचा दिवा वापरला जातो.

देवाला ओवाळताना, त्याची आरती करताना तुपाचा दिवा लावला जातो. देवकार्यात समस्त पवित्र गोष्टींचा वापर केला जातो. तूप हे पवित्र मानले जाते. तुप हे समृद्धीचे प्रतीक आहे. तुपाच्या निरांजनाने देवाला ओवाळून त्याबदल्यात आपले आयुष्य त्याच्या आशीर्वादाने उजळू देत अशी प्रार्थना केली जाते. 

आता प्रश्न येतो, तेलाच्या दिव्यावर तुपाचा दिवा का लावू नये याचा, तर उत्तर हे आहे, की हे दोन्ही घटक भिन्न आहेत. एक खनिज तर दुसरा प्राणिज. त्या दोघांचे एकत्रीकरण होऊ नये, हा त्यामागील हेतू असतो. म्हणून अनेक ठिकाणी दोन्ही प्रकारचे दिवे एकत्र लावणे टाळतात. जर दोन्ही प्रकारचे दिवे एकाच वेळेस लावले, तरी हरकत नाही, फक्त ते वेगवेगळ्या काडीने लावले पाहिजेत, ही बाब लक्षात ठेवावी.